शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शेतकऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचे टॅब देऊन कौतुक होणार; लातूर बाजार समितीचा स्तुत्य उपक्रम

By हरी मोकाशे | Updated: January 18, 2024 19:38 IST

लातूरच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी लातूर उच्चतम कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या गुणवंत पाल्यांसाठी विविध योजना आखल्या आहेत.

लातूर : शेतकऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचे कौतुक करुन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी टॅब देण्याची अनोखी योजना लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीने हाती घेतली आहे. दहावी, बारावी व विविध स्पर्धा परीक्षेतील टॉप टेन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

लातूरच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी लातूर उच्चतम कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या गुणवंत पाल्यांसाठी विविध योजना आखल्या आहेत. माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आ. अमित देशमुख, आ. धीरज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर बाजार समितीने आपल्या कार्यक्षेत्रातील (लातूर तालुका) शेतकऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचे कौतुक करून प्रोत्साहन देण्यासाठी ‘गुणवंत विद्यार्थ्यांना टॅब भेट’ देण्याची योजना हाती घेतली आहे. त्याचा लाभासाठी लातूर तालुक्यातील इयत्ता दहावी, बारावी परीक्षेतील गुणवंत, तसेच नीट, जेईई परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी अर्ज करु शकतात. त्यातील टाॅप टेन विद्यार्थांचा गौरव करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

योजनेच्या सहभागासाठी नियम...विद्यार्थ्याचे पालक लातूर तालुक्यातील शेतकरी असावेत. स्वत:च्या अथवा वडिलांच्या नावे लातूर तालुक्यात जमीन क्षेत्र असावे. विद्यार्थी दहावी अथवा बारावी उत्तीर्ण असावा. व्यवसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा (नीट, जेईई परीक्षा पात्र). या आलेल्या अर्जांतून गुणानुक्रमे टॉप टेन विद्यार्थी निवडले जाणार आहेत.

लवकरात लवकर अर्ज करावेत...

अर्जासोबत विद्यार्थ्याच्या स्वतःच्या अथवा पालकांच्या नावावर लातूर तालुक्यात जमीन असलेला ७/१२ व ८ अ उतारा जोडावा. शेतकऱ्यांच्या पाल्यांनी गुणपत्रिकेच्या झेरॉक्सची सत्यप्रत जोडावी. ही कागदपत्रे आणि अर्ज ५ फेब्रुवारीपर्यंत प्रशासकीय कार्यालय, उच्चतम कृषि उत्पन्न बाजार समिती, लातूर येथे सादर करावेत, असे आवाहन बाजार समिती सभापती जगदीश बावणे, उपसभापती सुनील पडीले आणि सचिव भगवान दुधाटे यांनी केले आहे.

 

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरी