शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

शेतकऱ्यांनो बियाणे, खतांच्या दर्जाबाबत शंका आल्यास करा बिनधास्त तक्रार!

By हरी मोकाशे | Updated: May 21, 2024 18:37 IST

कृषी विभागाकडून खरीप हंगामात जिल्हा, तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्ष

लातूर : खरिपासाठी बियाणे, खते, कीटकनाशकांसह कृषी निविष्ठा खरेदी करताना गुणवत्ता व दर्जाबाबत काही शंका आल्यास थेट तक्रार करता येणार आहे. त्यासाठी जिल्हास्तरावर एक आणि तालुकास्तरावर दहा असे एकूण ११ तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

खरिपासाठी शेतकऱ्यांना आवश्यक त्या प्रमाणात आणि गुणात्मक दर्जाच्या कृषी निविष्ठा एमआरपी दराने उपलब्ध होण्यासाठी आणि शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी कृषी विभागातील गुणनियंत्रण निरीक्षकांमार्फत नियमित कृषी निविष्ठा विक्री केंद्रांची आणि कृषी निविष्ठांची तपासणी करण्यात येते. त्यानंतरही शेतकऱ्यांना कृषी निविष्ठांची खरेदी करताना काही अडचण अथवा खरेदी पश्चात हंगाम संपेपर्यंत दर्जा व गुणवत्ता आदींबाबत संशय आल्यास अथवा फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यास तक्रार करता येते. त्यासाठी एकूण ११ तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी कृषी निविष्ठांबाबत तक्रार नोंदविताना संबंधित गुणनियंत्रण निरीक्षकांकडे, तक्रार निवारण कक्ष प्रमुखाकडे लेखी तक्रारीबरोबर खरेदी पावती, ७/१२, होल्डिंग आदी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांनी अर्जावर आपला संपूर्ण पत्ता, गाव, तालुका व भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवावा. तसेच तालुका कृषी अधिकारी अथवा पंचायत समितीच्या कृषी अधिकारी कार्यालयात तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. टी. जाधव व जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुभाष चोले यांनी केले आहे.

कृषि निविष्ठा खरेदी करताना घ्या काळजीगुणवत्ता व दर्जेदार निविष्ठा मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडून निविष्ठा खरेदी कराव्यात. खरेदीवेळी पक्की पावती घ्यावी. त्यात बियाण्याची जात, लॉट नंबर, उत्पादक दिनांक आदी मजकूर असल्याची खात्री करावी. खताच्या किमतीत कोणत्याही प्रकरची वाढ झाली नसून चढ्या भावाने विक्री केल्यास विक्रेत्यांवर कार्यवाही करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जाधव व कृषी विकास अधिकारी चोले यांनी सांगितले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रlaturलातूर