शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो बियाणे, खतांच्या दर्जाबाबत शंका आल्यास करा बिनधास्त तक्रार!

By हरी मोकाशे | Updated: May 21, 2024 18:37 IST

कृषी विभागाकडून खरीप हंगामात जिल्हा, तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्ष

लातूर : खरिपासाठी बियाणे, खते, कीटकनाशकांसह कृषी निविष्ठा खरेदी करताना गुणवत्ता व दर्जाबाबत काही शंका आल्यास थेट तक्रार करता येणार आहे. त्यासाठी जिल्हास्तरावर एक आणि तालुकास्तरावर दहा असे एकूण ११ तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

खरिपासाठी शेतकऱ्यांना आवश्यक त्या प्रमाणात आणि गुणात्मक दर्जाच्या कृषी निविष्ठा एमआरपी दराने उपलब्ध होण्यासाठी आणि शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी कृषी विभागातील गुणनियंत्रण निरीक्षकांमार्फत नियमित कृषी निविष्ठा विक्री केंद्रांची आणि कृषी निविष्ठांची तपासणी करण्यात येते. त्यानंतरही शेतकऱ्यांना कृषी निविष्ठांची खरेदी करताना काही अडचण अथवा खरेदी पश्चात हंगाम संपेपर्यंत दर्जा व गुणवत्ता आदींबाबत संशय आल्यास अथवा फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यास तक्रार करता येते. त्यासाठी एकूण ११ तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी कृषी निविष्ठांबाबत तक्रार नोंदविताना संबंधित गुणनियंत्रण निरीक्षकांकडे, तक्रार निवारण कक्ष प्रमुखाकडे लेखी तक्रारीबरोबर खरेदी पावती, ७/१२, होल्डिंग आदी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांनी अर्जावर आपला संपूर्ण पत्ता, गाव, तालुका व भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवावा. तसेच तालुका कृषी अधिकारी अथवा पंचायत समितीच्या कृषी अधिकारी कार्यालयात तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. टी. जाधव व जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुभाष चोले यांनी केले आहे.

कृषि निविष्ठा खरेदी करताना घ्या काळजीगुणवत्ता व दर्जेदार निविष्ठा मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडून निविष्ठा खरेदी कराव्यात. खरेदीवेळी पक्की पावती घ्यावी. त्यात बियाण्याची जात, लॉट नंबर, उत्पादक दिनांक आदी मजकूर असल्याची खात्री करावी. खताच्या किमतीत कोणत्याही प्रकरची वाढ झाली नसून चढ्या भावाने विक्री केल्यास विक्रेत्यांवर कार्यवाही करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जाधव व कृषी विकास अधिकारी चोले यांनी सांगितले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रlaturलातूर