शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

सकाळी धुक्यांची चादर, हरभऱ्यावर घाटेअळीच्या हल्ल्याने शेतकरी चिंताग्रस्त

By हरी मोकाशे | Updated: December 8, 2023 18:25 IST

सध्या काही ठिकाणचा हरभरा फुलोऱ्यात आहे तर काही ठिकाणी घाटे लागण्यास सुरुवात झाली आहे.

लातूर : आठवडाभरापासून वातावरणात बदल झाल्याने सातत्याने ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. शुक्रवारी सकाळी ८ वा. पर्यंत तर सर्वत्र धुके पडल्याचे पहावयास मिळाले. दरम्यान, किमान तापमानात मोठी घट होऊन १०.७ अं. से. असे नोंदले गेले आहे. ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर घाटेअळीने हल्ला चढविला आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

जिल्ह्याचे रबीचे सरासरी क्षेत्र ३ लाख १७ हजार २३ हेक्टर आहे. आतापर्यंत ३ लाख २२ हजार २५४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात सर्वाधिक पेरा हरभऱ्याचा झाला असून तो २ लाख ६४ हजार ४४३ हेक्टर असा आहे. त्यापाठोपाठ ज्वारीचा ३१ हजार ३४४ हेक्टरवर तर गव्हाचा ८ हजार ५९३ हेक्टरवर झाला आहे. दरम्यान, पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन मिचाँग चक्रीवादळ आल्याने त्याचा परिणाम जिल्ह्यातील वातावरणावर झाला आहे. जवळपास आठवडाभरापासून ढगाळ वातावरण निर्माण होऊन रिमझिम पाऊसही झाला. शुक्रवारी सकाळी धुके पडले होते. त्यानंतर सूर्यनारायणाचे दर्शन झाले. त्यामुळे हवेतील थंडी कमी झाली असली तरी किमान तापमान १०.७ अं.से. असल्याचे येथील गळीत धान्य संशोधन केंद्रात नोंदले गेले आहे.

शुक्रवारी सर्वात कमी तापमान...दिनांक - किमान - कमाल तापमान१ डिसेंबर - १५.९ - २५.५२ डिसेंबर - २० - २५.८३ डिसेंबर - १५.५ - २५४ डिसेंबर - २०.१ - २५.४५ डिसेंबर - १५.१ - २५६ डिसेंबर - १५.४ - २०.४७ डिसेंबर - १५.३ - २०.५८ डिसेंबर - १०.७ - २५.२

हरभऱ्यावर तीन- चार रंगाच्या आळ्या...काही दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. त्याचा परिणाम हरभरा आणि ज्वारीच्या पिकावर झाला आहे. सध्या काही ठिकाणचा हरभरा फुलोऱ्यात आहे तर काही ठिकाणी घाटे लागण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, वातावरणातील बदलामुळे हरभऱ्यावर तीन- चार रंगाच्या अळी प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. तसेच ज्वारीवरही अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.

अळीच्या नियंत्रणासाठी या औषधांची करा फवारणी...ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याच्या नियंत्रणासाठी इमॅमेक्टिन बेंझोएट ५ टक्के, एससी ४ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच ज्वारीवरील पोंगा मर रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी थायमेथॉक्सम (१२.५ टक्के) आणि लिंबडॅसालॉट्रीन (९.५) झिंकचा वापर करावा. कृषी विभागाचा सल्ला घेऊन औषधांची फवारणी करावी.- दिलीप जाधव, उपविभागीय कृषी अधिकारी.

टॅग्स :Farmerशेतकरीlaturलातूर