शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना खर्चाचा ताळमेळ लागेना; सोयाबीनला एकरी खर्च १७ हजार, उत्पन्न  २१ हजार

By आशपाक पठाण | Updated: October 25, 2023 19:42 IST

यंदा रब्बीची पेरणी उसनवारीवर करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे

लातूर : मागील दोन वर्षांपासून सोयाबीनचे दर पडल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही पदरी पडत नसल्याची ओरड आहे. यंदा तर एकरी उत्पादन ४ ते ५ क्विंटल निघत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. पेरणी ते काढणीपर्यंत एकरी १७ हजारांचा खर्च झाला असून उत्पादन कुठे ४ तर कुठे ५ क्विंटल निघत असल्याने २० ते २३ हजार रुपये पदरी पडत आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना रब्बीचा पेराही उसनवारी करण्याची वेळ आली आहे.

पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनच्या शेंगाची वाढही झाली नाही. मध्यंतरी जवळपास एक महिना पावसाने ओढ दिल्याने माळरानावरील पिकांनी माना टाकल्या. फुलेही गळून पडली. त्यात आणखीन भर म्हणून पिकावर पडलेल्या येलो मोझॅक रोगाने वाटोळे केले. काही भागात शेतकऱ्यांनी उपलब्ध पाणी साठ्यावर पिके जगविण्याचा प्रयत्न केला. सध्या जिल्हाभरात राशीचे काम सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकरी तुमचा उतारा किती अन् भाव किती यावर चर्चा करीत आहे.

जेवढा खर्च तेवढेच उत्पन्न...सोयाबीन बियाण्याची एक बॅग खरेदी केली ३ हजार रुपयाला खत, १२५० रुपयाच फवारणी खर्च ४ हजार रुपये, नांगरणी २ हजार रुपये, पेरणी १२०० रुपये, काढणी ३ हजार, मळणी १ हजार ७५० रुपये, वाहतूक ३५० रुपये, एकूण खर्च एकरी १७ हजार २५० रुपये आला. एकरी उतारा ५ क्विंटलचा निघाला असून बाजारात चांगला माल ४ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल गेला. डागी असेल तर ४ हजार दर मिळत आहे. आता रब्बीची पेरणी उसनवारीवर करायची वेळ आली आहे. पावसाने ओढ दिल्याने पीक विम्याची अपेक्षा होती, याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. - नवनाथ शिंदे, शेतकरी, खुंटेफळ.

पामतेलाची आयात बंद करायला हवी...देशात मागच्या दोन वर्षांपासून पामतेल आयातीचा ओघ सुरूच आहे. त्याचा फटका सोयाबीन उत्पादकांना बसतोय. ऐन हंगामात हमी भावाच्या खाली सोयाबीनचे भाव आलेत. त्यातून उत्पादन खर्चही वसूल होत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च आणि मिळणाऱ्या भावाचं गणित जुळत नाही. राज्यातले सोयाबीन उत्पादक शेतकरी हैराण झालेत. सरकार निवडणुकांसाठी शेतमालाचे भाव पाडायला लागलंय, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सत्तार पटेल, अरुण दादा कुलकर्णी, नवनाथ शिंदे, रामदास गिरी, गोरोबा मोदी, राजेंद्र मोरे, अशोक दहिफळे यांनी केला आहे.

२८ ऑक्टोबरला आंदोलनाची दिशा ठरणार...आता शेतकऱ्यांना लोकप्रतिनिधीला प्रश्न विचारावे लागतील. अन्यथा आपल्या शेतमालाचे भाव मातीमोल केल्याशिवाय सरकार थांबणार नाही. म्हणून या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तूपकर २८ ऑक्टोबर लातूरला येत आहे. शासकीय विश्रामगृहात ते शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जाईल, असे प्रदेश उपाध्यक्ष सत्तार पटेल यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र