शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

शेतकऱ्यांना खर्चाचा ताळमेळ लागेना; सोयाबीनला एकरी खर्च १७ हजार, उत्पन्न  २१ हजार

By आशपाक पठाण | Updated: October 25, 2023 19:42 IST

यंदा रब्बीची पेरणी उसनवारीवर करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे

लातूर : मागील दोन वर्षांपासून सोयाबीनचे दर पडल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही पदरी पडत नसल्याची ओरड आहे. यंदा तर एकरी उत्पादन ४ ते ५ क्विंटल निघत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. पेरणी ते काढणीपर्यंत एकरी १७ हजारांचा खर्च झाला असून उत्पादन कुठे ४ तर कुठे ५ क्विंटल निघत असल्याने २० ते २३ हजार रुपये पदरी पडत आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना रब्बीचा पेराही उसनवारी करण्याची वेळ आली आहे.

पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनच्या शेंगाची वाढही झाली नाही. मध्यंतरी जवळपास एक महिना पावसाने ओढ दिल्याने माळरानावरील पिकांनी माना टाकल्या. फुलेही गळून पडली. त्यात आणखीन भर म्हणून पिकावर पडलेल्या येलो मोझॅक रोगाने वाटोळे केले. काही भागात शेतकऱ्यांनी उपलब्ध पाणी साठ्यावर पिके जगविण्याचा प्रयत्न केला. सध्या जिल्हाभरात राशीचे काम सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकरी तुमचा उतारा किती अन् भाव किती यावर चर्चा करीत आहे.

जेवढा खर्च तेवढेच उत्पन्न...सोयाबीन बियाण्याची एक बॅग खरेदी केली ३ हजार रुपयाला खत, १२५० रुपयाच फवारणी खर्च ४ हजार रुपये, नांगरणी २ हजार रुपये, पेरणी १२०० रुपये, काढणी ३ हजार, मळणी १ हजार ७५० रुपये, वाहतूक ३५० रुपये, एकूण खर्च एकरी १७ हजार २५० रुपये आला. एकरी उतारा ५ क्विंटलचा निघाला असून बाजारात चांगला माल ४ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल गेला. डागी असेल तर ४ हजार दर मिळत आहे. आता रब्बीची पेरणी उसनवारीवर करायची वेळ आली आहे. पावसाने ओढ दिल्याने पीक विम्याची अपेक्षा होती, याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. - नवनाथ शिंदे, शेतकरी, खुंटेफळ.

पामतेलाची आयात बंद करायला हवी...देशात मागच्या दोन वर्षांपासून पामतेल आयातीचा ओघ सुरूच आहे. त्याचा फटका सोयाबीन उत्पादकांना बसतोय. ऐन हंगामात हमी भावाच्या खाली सोयाबीनचे भाव आलेत. त्यातून उत्पादन खर्चही वसूल होत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च आणि मिळणाऱ्या भावाचं गणित जुळत नाही. राज्यातले सोयाबीन उत्पादक शेतकरी हैराण झालेत. सरकार निवडणुकांसाठी शेतमालाचे भाव पाडायला लागलंय, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सत्तार पटेल, अरुण दादा कुलकर्णी, नवनाथ शिंदे, रामदास गिरी, गोरोबा मोदी, राजेंद्र मोरे, अशोक दहिफळे यांनी केला आहे.

२८ ऑक्टोबरला आंदोलनाची दिशा ठरणार...आता शेतकऱ्यांना लोकप्रतिनिधीला प्रश्न विचारावे लागतील. अन्यथा आपल्या शेतमालाचे भाव मातीमोल केल्याशिवाय सरकार थांबणार नाही. म्हणून या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तूपकर २८ ऑक्टोबर लातूरला येत आहे. शासकीय विश्रामगृहात ते शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जाईल, असे प्रदेश उपाध्यक्ष सत्तार पटेल यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र