शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
3
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
4
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
5
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
6
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
7
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
8
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
9
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
10
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
11
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
12
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
13
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
14
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट
15
दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत उद्या बँका बंद राहणार का, पाहा काय म्हटलंय RBI नं?
16
'युक्रेनमधील शांततेसाठी भारतावर कर लावणे आवश्यक', ट्रम्प प्रशासनाचा न्यायालयात युक्तिवाद
17
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
18
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
19
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
20
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...

दुधाच्या दरात घसरण झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:18 IST

नागरसोगा : शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात; परंतु, गेल्या वर्षीपासून सुरू असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दुधाला कमी-जास्त ...

नागरसोगा : शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात; परंतु, गेल्या वर्षीपासून सुरू असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दुधाला कमी-जास्त दर मिळत आहे. सध्या दुधाचा दर २२ रुपये प्रतिलिटर आहे. परिणामी, दूध उत्पादक आर्थिक अडचणी सापडले असून पशुपालन करणे कठीण झाले आहे.

औसा तालुक्यातील नागरसोगा, दापेगाव, तुंगी बु., तुंगी खु., फत्तेपूर, वानवडा, जवळगा, दावतपूर येथील काही सुशिक्षित बेरोजगार व शेतकऱ्यांनी बँक आणि फायनान्सचे कर्ज काढून दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे. त्यांचा व्यवसाय सुरळीत सुरू होता. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्याने २८ रुपये प्रतिलिटर विक्री होणाऱ्या दुधाच्या दरात घसरण होऊन २२ रुपयांपर्यंत भाव आले आहेत. गेल्या वर्षी लॉकडाऊनपूर्वी दुधाचा दर प्रतिलिटर ३२ रुपये होता. यंदा मात्र मोठी घट झाली आहे.

दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत पशुखाद्याचे दर व चाऱ्याचे भाव वाढले आहेत. त्यामुळे पशुपालकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दूध उत्पादकांपासून विक्रेते २२ रुपये प्रतिलिटर दराने दूध खरेदी करून ग्राहकांना ४० रुपये दराने विक्री करतात. सध्या नागरसोगा पशुवैद्यकीय केंद्राअंतर्गत १ हजार ६३७ पशुधन आहे. परिसरातील गावांत शासकीय व खासगी दूध डेअऱ्या आहेत. मात्र, सर्वच ठिकाणी दुधाला दर कमी मिळत आहे. अशा परिस्थितीत एका दुधाळ गायीस हिरवा मका व चारा असा एकूण दररोज २५ ते ३० किलो खुराक लागतो. त्यासाठी १५० ते १६० रुपये खर्च येतो. पशुखाद्य दररोज ६ किलो लागते. त्यासाठी १५६ रुपये आणि इतर पावडरसाठी ५० रुपये असा एकूण असा अंदाजे जवळपास ३५६ रुपये खर्च होतो. संकरित गाय दररोज १४ ते १५ लिटर दूध देते. त्यास २२ रु. प्रतिलिटर दराने ३३० रुपये होतात. यात संगोपन, बँक कर्जाच्या व्याजासह हप्ता असतो. या परिसरातील बहुतांश शेतकरी दूध उत्पादनावर अवलंबून असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. शासनाने दुधाला प्रतिलिटर ४० ते ४२ रुपये भाव द्यावा, अशी मागणी दूध उत्पादकांतून होत आहे.

शासनाने अनुदान द्यावे

माझ्याकडे सहा संकरित गायी आहेत. त्यांच्यापासून दररोज ८० लिटर दूध मिळते. प्रतिलिटर २२ रुपये दराने डेअरीला देतो. गायीचा चारा व खुराकावर रोख दोन हजार ५० रुपये खर्च येतो. सध्या दुधाचे भाव कमी झाल्याने पदरमोड करावी लागत आहे. हा व्यवसाय तोट्यात सापडला आहे. शासनाने लक्ष देऊन अनुदान द्यावे, अशी मागणी येथील दूध उत्पादक शेतकरी बालाजी मेलगर यांनी केली आहे.