शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
3
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
4
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
5
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
6
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
7
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
8
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
9
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
10
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
11
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
13
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
14
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
15
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
16
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
18
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
19
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
20
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला

आग्रीम खात्यावर जमा होत नसल्याने शेतकरी हतबल! पीकविमा कंपनीची आता केंद्राकडे धाव

By हरी मोकाशे | Updated: January 5, 2024 17:45 IST

नुकसानग्रस्त शेतकरी सातत्याने बँकेत चौकशी करीत आहेत.

लातूर : ४३ महसूल मंडळातील सोयाबीन पीकविमाधारकांना तात्काळ २५ टक्के आग्रीम देण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिवाळीपूर्वी दिले होते. मात्र, पीकविमा कंपनीने बहाणे करीत ३२ मंडळांना देण्यास सुरुवात केली. पावणेदाेन महिने उलटले तरी अद्यापही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर २२ कोटी जमा झाले नाहीत. बँकेत वारंवार चौकशी करुन शेतकरी हतबल झाले आहेत.

गत खरीपात जिल्ह्यात ५ लाख ८५ हजार ९७७ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला होता. ऑगस्टमध्ये पावसाने ताण दिल्याने उत्पादनात ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सप्टेंबरमध्ये जिल्ह्यातील ६० महसूल मंडळांतील सोयाबीन पीकविमाधारकांना २५ टक्के आगाऊ रक्कम देण्याचे आदेश दिले. दरम्यान, पीकविमा कंपनीने विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली. तेव्हा विभागीय आयुक्तांसमोर कंपनीने ४३ मंडळांना आग्रीम देण्यास तयार असल्याचे सांगितले. उर्वरित १७ मंडळांसाठी पुनर्मूल्यांकन करुन सुधारित निर्णय घेण्यासाठी मुदत मागितली. वास्तवात, कंपनीने ३२ मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आग्रीम जमा करण्यास सुरुवात केली.

आतापर्यंत १८३ कोटींचे वितरण...पीकविमा कंपनीने ३२ मंडळातील २ लाख १९ हजार शेतकऱ्यांसाठी २०५ कोटी ८८ लाख ६६ हजार ६८१ रुपये मंजूर केले. पावणेदोन महिन्यांच्या कालावधीत १८३ कोटी ७४ लाख २६ हजार १९७ रुपये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. अद्यापही २२ कोटी १४ लाख ४० हजार ४८४ रुपये थकित राहिले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी सातत्याने बँकेत चौकशी करीत आहेत. मात्र, पीकविमा जमा झाले नसल्याचे बँकेकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे हे शेतकरी हतबल झाले आहेत.

चाकूर तालुक्याची सर्वाधिक थकित रक्कम...तालुका - मंजूर रक्कम - थकित रक्कमऔसा - ४८ कोटी १२ लाख - ४ कोटी ९ लाखचाकूर - ३८ कोटी ७४ लाख - ७ कोटी २७ लाखजळकोट - ६ कोटी ८७ लाख - ३० लाख ३१ हजारलातूर - ५३ कोटी ७३ लाख - १ कोटी ९९ लाखनिलंगा - ३७ कोटी १ लाख - ३ कोटी ७६ लाखरेणापूर - ६ कोटी ८४ लाख - १ कोटी ९५ लाखशिरुर अनं. - ६ कोटी ७२ लाख - २ कोटी ४४ लाखउदगीर - ७ कोटी ८२ लाख - ३२ लाख १९ हजारएकूण - २०५ कोटी ८८ लाख - २२ कोटी १४ लाख

२८ महसूल मंडळातील शेतकऱ्यांचा प्रश्न प्रलंबित...विभागीय आयुक्तांसमोरील बैठकीत पीकविमा कंपनीने ४३ मंडळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आग्रीम देण्याचे मान्य केले होते. मात्र, ऐनवेळी केवळ ३२ मंडळातील शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम देण्यास सुरुवात केली. मान्य केलेल्यापैकी ११ आणि उर्वरित १७ अशा एकूण २८ मंडळातील शेतकऱ्यांचा प्रश्न प्रलंबित आहे.

कंपनीची केंद्राकडे याचिका...पीकविमा कंपनीने राज्य शासनाकडे धाव घेतली होती. मात्र, ती शासनाने फेटाळली. दरम्यान, कंपनीने आता केंद्र सरकारकडे धाव घेतली आहे. त्यामुळे आग्रीमचा पेच आणखीन वाढला असल्याचे दिसून येत आहे.

लवकरच वाटप हाेणार...३२ महसूल मंडळातील काही शेतकरी आग्रीमपासून वंचित आहेत. कंपनीस सूचना करण्यात आल्या आहेत. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील.- शिवसांब लाडके, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

टॅग्स :laturलातूरCrop Insuranceपीक विमा