शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

आग्रीम खात्यावर जमा होत नसल्याने शेतकरी हतबल! पीकविमा कंपनीची आता केंद्राकडे धाव

By हरी मोकाशे | Updated: January 5, 2024 17:45 IST

नुकसानग्रस्त शेतकरी सातत्याने बँकेत चौकशी करीत आहेत.

लातूर : ४३ महसूल मंडळातील सोयाबीन पीकविमाधारकांना तात्काळ २५ टक्के आग्रीम देण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिवाळीपूर्वी दिले होते. मात्र, पीकविमा कंपनीने बहाणे करीत ३२ मंडळांना देण्यास सुरुवात केली. पावणेदाेन महिने उलटले तरी अद्यापही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर २२ कोटी जमा झाले नाहीत. बँकेत वारंवार चौकशी करुन शेतकरी हतबल झाले आहेत.

गत खरीपात जिल्ह्यात ५ लाख ८५ हजार ९७७ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला होता. ऑगस्टमध्ये पावसाने ताण दिल्याने उत्पादनात ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सप्टेंबरमध्ये जिल्ह्यातील ६० महसूल मंडळांतील सोयाबीन पीकविमाधारकांना २५ टक्के आगाऊ रक्कम देण्याचे आदेश दिले. दरम्यान, पीकविमा कंपनीने विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली. तेव्हा विभागीय आयुक्तांसमोर कंपनीने ४३ मंडळांना आग्रीम देण्यास तयार असल्याचे सांगितले. उर्वरित १७ मंडळांसाठी पुनर्मूल्यांकन करुन सुधारित निर्णय घेण्यासाठी मुदत मागितली. वास्तवात, कंपनीने ३२ मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आग्रीम जमा करण्यास सुरुवात केली.

आतापर्यंत १८३ कोटींचे वितरण...पीकविमा कंपनीने ३२ मंडळातील २ लाख १९ हजार शेतकऱ्यांसाठी २०५ कोटी ८८ लाख ६६ हजार ६८१ रुपये मंजूर केले. पावणेदोन महिन्यांच्या कालावधीत १८३ कोटी ७४ लाख २६ हजार १९७ रुपये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. अद्यापही २२ कोटी १४ लाख ४० हजार ४८४ रुपये थकित राहिले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी सातत्याने बँकेत चौकशी करीत आहेत. मात्र, पीकविमा जमा झाले नसल्याचे बँकेकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे हे शेतकरी हतबल झाले आहेत.

चाकूर तालुक्याची सर्वाधिक थकित रक्कम...तालुका - मंजूर रक्कम - थकित रक्कमऔसा - ४८ कोटी १२ लाख - ४ कोटी ९ लाखचाकूर - ३८ कोटी ७४ लाख - ७ कोटी २७ लाखजळकोट - ६ कोटी ८७ लाख - ३० लाख ३१ हजारलातूर - ५३ कोटी ७३ लाख - १ कोटी ९९ लाखनिलंगा - ३७ कोटी १ लाख - ३ कोटी ७६ लाखरेणापूर - ६ कोटी ८४ लाख - १ कोटी ९५ लाखशिरुर अनं. - ६ कोटी ७२ लाख - २ कोटी ४४ लाखउदगीर - ७ कोटी ८२ लाख - ३२ लाख १९ हजारएकूण - २०५ कोटी ८८ लाख - २२ कोटी १४ लाख

२८ महसूल मंडळातील शेतकऱ्यांचा प्रश्न प्रलंबित...विभागीय आयुक्तांसमोरील बैठकीत पीकविमा कंपनीने ४३ मंडळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आग्रीम देण्याचे मान्य केले होते. मात्र, ऐनवेळी केवळ ३२ मंडळातील शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम देण्यास सुरुवात केली. मान्य केलेल्यापैकी ११ आणि उर्वरित १७ अशा एकूण २८ मंडळातील शेतकऱ्यांचा प्रश्न प्रलंबित आहे.

कंपनीची केंद्राकडे याचिका...पीकविमा कंपनीने राज्य शासनाकडे धाव घेतली होती. मात्र, ती शासनाने फेटाळली. दरम्यान, कंपनीने आता केंद्र सरकारकडे धाव घेतली आहे. त्यामुळे आग्रीमचा पेच आणखीन वाढला असल्याचे दिसून येत आहे.

लवकरच वाटप हाेणार...३२ महसूल मंडळातील काही शेतकरी आग्रीमपासून वंचित आहेत. कंपनीस सूचना करण्यात आल्या आहेत. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील.- शिवसांब लाडके, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

टॅग्स :laturलातूरCrop Insuranceपीक विमा