शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

बोअरवेल्सच्या गाडीखाली चिरडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

By संदीप शिंदे | Updated: March 25, 2024 18:10 IST

देवणी तालुक्यातील हेळंब येथील घटना

वलांडी (जि. लातूर) : देवणी तालुक्यातील हेळंब येथे एका शेतकऱ्याने शेतात बोअर घेण्यासाठी बोअरवेल गाडी मागवली होती. शनिवारी संध्याकाळी बोअरही घेण्यात आला. बोअर घेतल्यानंतर गाडीच्या पाठीमागे पाच शेतकरी झोपले होते. पहाटेच्या सुमारास ड्रायव्हरने हयगयीने निष्काळजीपणे गाडी चालु करुन रिव्हर्स घेतल्याने गाडीखाली शेतकरी चिरडल्याची घटना घडली. याबाबत देवणी पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा नोंद आहे. अंगद गोपाळ साळुंखे (वय ३८ रा. हेळंब ता. देवणी) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले, हेळंब येथे गाडी क्रमांक जि.जे. ०३ एच.ई. ४५०४ ने हेळंब येथे बोअर घेण्यात आला. पाच शेतकरी शेतातच झोपले होते. मात्र, बोअरवेलचे वाहन शेतातून बाहेर काढताना चालकाने हयगय व निष्काळजीपणे वाहन चालवून शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन घातले. त्यात अन्य चार शेतकरी उठुन पळाल्याने त्यांचा जीव वाचला. तर अंगद साळुंखे यांचा चिरडून मृत्यू झाला. याबाबत  भगवान बालाजी पवार (रा. मस्की जि.नांदेड) यांच्याविरोधात वाहन निष्काळजीपणे व हयगयीने चालवल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सपोउपनि गोंड हे करत आहेत. मयताचे पार्थिव शवविच्छेदनासाठी वलांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहे. मयताच्या पश्च्यात आई , भाऊ , पत्नी, दोन लहान मुले असा परिवार आहे. मयत अंगद सोळंखे यांना केवळ दोन एकर शेती आहे. शेजारच्या शेतात बोअर घेत असल्याने बोअर पहाण्यासाठी गेला होता. बोअरला पाणीही लागले. रात्री उशिर झाल्याने पाच जण तेथेच झोपले होते. 

टॅग्स :laturलातूर