शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
4
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
5
धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
6
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
7
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
8
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
9
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
10
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
11
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
12
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
13
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
14
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
15
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
16
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
17
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
18
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार
19
"माझ्यासाठीच नाही, तर १४० कोटी भारतीयांसाठीही..."; ब्राझीलचा सर्वोच्च सन्मान मिळाल्यावर काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
20
अरे देवा! ज्या सावत्र आईचा आशीर्वाद घ्यायचा, तिच्यासोबत पळाला अल्पवयीन मुलगा; केलं लग्न

बळीराजा हतबल! दुष्काळी यादीत समावेश होऊनही पीकविम्याच्या आग्रीमचा दुष्काळ

By हरी मोकाशे | Updated: December 1, 2023 18:28 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व म्हणजे साठही महसूल मंडळातील सोयाबीन पीकविमाधारकांना २५ टक्के आग्रीम देण्याचे आदेश दिले होते.

लातूर : राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत जिल्ह्यातील एकमेव रेणापूर तालुक्याचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्यातील पाचही मंडळातील सोयाबीन उत्पादकांना पीकविमा कंपनीकडून आग्रीम मिळण्याची आशा होती. परंतु, प्रत्यक्षात केवळ एकाच मंडळातील शेतकऱ्यांना लाभ दिला जात असल्याने शासनापेक्षा पीकविमा कंपनी मोठी आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

खरीपात पावसाने महिनाभरापेक्षा अधिक दिवसांचा ताण दिल्याने सोयाबीन उत्पादनात ६० टक्क्यांपेक्षा अधिकची घट झाल्याचे हंगाम मध्य परिस्थितीच्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व म्हणजे साठही महसूल मंडळातील सोयाबीन पीकविमाधारकांना २५ टक्के आग्रीम देण्याचे आदेश दिले होते. तेव्हा पीकविमा कंपनीने आक्षेप घेतल्याने छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समितीची बैठक झाली. त्यात पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधीने ६० पैकी ४३ महसूल मंडळांना आग्रीम देण्यास तयार असल्याचे सांगितले. उर्वरित १७ मंडळासाठी पुनर्मुल्यांकन करुन सुधारित निर्णय घेण्यासाठी मुदत मागितली. तद्नंतर मात्र ४३ ऐवजी ३२ मंडळातील शेतकऱ्यांना अग्रीम देण्यास सुरुवात केली.

शेतकऱ्यांबरोबर अधिकारीही गाेंधळात...दीपावलीपूर्वी शासनाने राज्यातील दुष्काळग्रस्त तालुके जाहीर केले. त्यात जिल्ह्यातील केवळ रेणापूर तालुक्याचा समावेश आहे. या तालुक्यात रेणापूर, पोहरेगाव, पानगाव, कारेपूर आणि पळशी अशी पाच मंडळे आहेत. त्यामुळे या पाच मंडळातील शेतकऱ्यांना २५ टक्के आग्रीम मिळण्याची उत्सुकता लागली. परंतु, पीकविमा कंपनीने केवळ कारेपूर मंडळातील शेतकऱ्यांना भरपाई देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबर अधिकारीही गोंधळात पडले आहेत.

३२ मंडळातील काही शेतकऱ्यांना प्रतीक्षा...पीकविमा कंपनीने ३२ मंडळातील २ लाख १९ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर २१५ कोटी जमा करण्यात येत असल्याचे सांगितले. काही शेतकऱ्यांच्या खात्यावर आग्रीम जमाही झाला. मात्र, आठवडा उलटला तरी अजूनही बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावर आगाऊ रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे चौकशी करण्यात येत आहे.

पीकविमा, बँक कर्मचाऱ्यांची बैठक...३२ मंडळातील काही शेतकऱ्यांच्या खात्यावर आग्रीम जमा झाली नसल्याने पीकविमा कंपनी व बँक कर्मचाऱ्यांची आजच बैठक घेऊन सूचना केल्या. सोमवारपासून खात्यावर आग्रीम जमा होण्यास वेग येईल.- शिवसांब लाडके, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

कृषीपेक्षा पीकविमा कंपनी दोन पावले पुढे...जिल्ह्यातील ६० पैकी ३२ मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आग्रीम जमा करण्यात येत आहे. उर्वरित २८ मंडळातील अग्रीमसंदर्भातचा निर्णय राज्य शासनस्तरावर होणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत होते. परंतु, प्रत्यक्षात बुधवारपर्यंत पीकविमा कंपनीने शासनाकडे आक्षेप सादर केला नव्हता. केवळ कांगावा केला जात होता. गुरुवारी आक्षेप सादर केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कृषीपेक्षा पीकविमा कंपनी दोन पावले पुढे असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :laturलातूरCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी