शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

‘नीट’ची बनावट गुणपत्रिका, पण जीवनात खरी हानी; ‘खरे’ उघड होताच विद्यार्थ्याने जीवन संपवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 12:59 IST

बनावट यशासाठी विद्यार्थी आयुष्याला मुकला ! पालक, मित्रांसमोर कसे जावे, कमी गुण मिळाल्यास पडतो प्रश्न, ‘नीट’ विद्यार्थ्याच्या आत्महत्येला जबाबदार कोण?

लातूर : नीटमध्ये कमी गुण मिळाले, आता घरच्यांना, मित्रांसमोर काय सांगायचे, असा प्रश्न कमी गुण मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांना पडतो. अशा प्रश्न लातुरात आत्महत्या केलेल्या दीपककुमारला ही पडला होता. खोट्या यशामागे धावताना मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे वाढीव गुण दर्शविले. असे करणारा तो पहिला विद्यार्थी नव्हता. अनेकांनी पालकांची समजूत निघावी, परीक्षा पुन्हा देण्याची संधी मिळावी, यासाठी असे प्रयोग केल्याचे समुपदेशकांजवळ उघड झाले आहेत. मात्र नैराश्याने दीपककुमारला आत्महत्येपर्यंत नेले.

कृषी महाविद्यालयात बीएस्सी. ॲग्री प्रथम वर्षातील द्वितीय सत्रात राजस्थानचा दीपककुमार शिकत होता. गेल्या शैक्षणिक वर्षात भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या कोट्यातून त्याचा प्रवेश झाला होता. दरम्यान, त्याने नीटची तयारी केली अन् यंदा परीक्षा दिली. त्याला १७० गुण मिळाले आणि १९ जून रोजी त्याने गळफास घेतला. त्यावेळी खोलीत ५४५ गुणांची आणखी एक गुणपत्रिका सापडली होती.

व्हॉटस्ॲप ग्रुपवर कौतुक...दीपककुमारने ५४५ गुण असलेली पीडीएफ मित्रांच्या ग्रुपवर शेअर केली. त्याचे कौतुक झाले. परंतु, अर्ज क्र. १३ अंकी, क्यूआर कोड स्कॅन न होणे या कारणाने त्याचे १७० मार्क सर्वांना समजले. याच नैराश्यातून त्याने गळफास घेतला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.

मित्रांचा जबाब, नेमके काय घडले?पोलिसांनी शनिवारी दीपककुमारच्या मित्रांशी संवाद साधला. पीडीएफ अथवा फोटोशॉप एडिटिंगद्वारे मोबाइल ॲप्लिकेशनचा वापर करून गुणपत्रिकेत बदल केल्याचा अंदाज आहे. राजस्थान, सिकरमधून बनावट गुणपत्रिका मिळवली, अशी कोणतीही माहिती त्याच्या मित्रांकडे नाही. केवळ अधिक मार्क दाखविणे इतकाच उद्देश ठेऊन मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे बदल केलेला दिसतो. त्यामुळे बनावट गुणपत्रिका, रॅकेट किंवा इतर कोणतेही धागेदोरे नाहीत.- संतोष पाटील, पोलिस निरीक्षक.

विद्यार्थ्यांना सामाजिक दबाव, प्रतिष्ठेपासून दूर ठेवादीपककुमार एकटाच नव्हे तर निकालानंतर आठ-दहा विद्यार्थ्यांनी पालकांची समजूत काढावी अथवा रीपीटरसाठी पालकांनी संधी द्यावी, म्हणून मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे गुणपत्रिकेत बदल केल्याचे आढळले आहे. पालक, विद्यार्थ्यांचा संवाद उत्तम असेल तर हे घडत नाही. अशी प्रकरणे दुर्मीळ असली तरी त्या विद्यार्थ्यांनाही समजून घेतले पाहिजे. पालकांचा अथवा सामाजिक दबाव, प्रतिष्ठा यापासून विद्यार्थ्यांना अलिप्त ठेवले पाहिजे. समुपदेशनासाठी पालकांबरोबर शिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस यांचा पुढाकार गरजेचा आहे.- सचिन बांगड, नीट समुपदेशक

टॅग्स :NEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकालlaturलातूर