शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

स्वाधार योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी मुदतवाढ; आता १६ मार्चपर्यंत करता येणार अर्ज

By हणमंत गायकवाड | Updated: March 8, 2023 18:07 IST

शासकीय वसतिगृहामध्ये पात्र असूनही प्रवेश न मिळाल्यामुळे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांचे मॅट्रिकेत्तर शिक्षण अपूर्ण राहू नये म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबवली जाते.

लातूर : शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र, मात्र प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. दरम्यान, परीक्षा असल्यामुळे विद्यार्थ्यांना या योजनेत अर्ज करण्यास अडचणी येत असल्याने १६ मार्चपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

शासकीय वसतिगृहामध्ये पात्र असूनही प्रवेश न मिळाल्यामुळे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांचे मॅट्रिकेत्तर शिक्षण अपूर्ण राहू नये म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबवली जाते. या योजनेत विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा दिल्या जातात. त्याबाबतची रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरित करण्यात येते. २९२२-२३ या शैक्षणिक वर्षातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज १ फेब्रुवारी २०२३ ते ७ मार्च २०२३ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडून स्वीकारण्यात आलेले आहेत. तथापि सद्यस्थितीत विद्यार्थ्यांचा परीक्षा कालावधी असल्याने अनेक विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा अर्ज भरण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे स्वाधार योजनेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. १६ मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना आता या योजनेमध्ये अर्ज करता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा अर्ज करता आलेला नाही, त्यांनी त्वरित ऑनलाईन अर्ज करून त्याची हार्ड कॉपी सहाय्यक आयुक्त कार्यालयात सादर करावी, असे आवाहन समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त एस. एन. चिकुर्ते यांनी केले आहे.

पाच दिवसांत अर्ज सादर कराविद्यार्थ्यांच्या घरापासून पाच किमी अंतराच्या पुढे शहरात महाविद्यालय आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. आतापर्यंत ११३५ विद्यार्थ्यांनी या योजनेअंतर्गत अर्ज सादर केलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी या योजनेत अर्ज सादर केलेला नाही, त्यांनी पुढील पाच दिवसांमध्ये ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्तांनी केले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणlaturलातूर