शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आरटीई अर्जासाठी २५ मार्चपर्यंत मुदतवाढ; जिल्ह्यात ६३०० बालकांचे अर्ज !

By संदीप शिंदे | Updated: March 17, 2023 18:42 IST

२०० शाळांची नोंदणी झाली असून १ हजार ६६९ जागांवर मोफत प्रवेश होणार

लातूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील बालकांना मोफत शिक्षण मिळावे, यासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी १७ मार्चची अंतिम मुदत होती. मात्र, पालकांच्या मागणीमुळे आता अर्ज करण्यासाठी २५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, आतापर्यंत जिल्ह्यात ६२२० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत.

आरटीई प्रक्रियेसाठी जिल्ह्यात २०० शाळांनी शिक्षण विभागाकडे नाेंदणी केली आहे. या शाळांमध्ये १ हजार ६६९ जागा असून, आतापर्यंत ६ हजार २२० जणांनी अर्ज सादर केले आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांचा संप सुरु असल्याने कागदपत्रे काढण्यासाठी पालकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी होती. त्यास प्राथमिक शिक्षण संचालकांनी प्रतिसाद देत २५ मार्च रोजी रात्री १२ वाजेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ अंतिम राहणार असून, यानंतर अर्ज करण्यासाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. तसेच पालकांनी वेळेत अर्ज भरण्याचे आवाहनही शिक्षण संचालकांनी केले आहे.

आरटीई प्रवेशासाठी मागील वर्षी ४३०० विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले होते. यंदा मात्र, वाढता प्रतिसाद दिसून येत आहे. एक मार्चपासून अर्ज भरण्यासाठी सुरुवात झाली होती. मागील १७ दिवसांत ६२२० पालकांनी आपल्या पाल्यांचे अर्ज सादर केले आहेत. दरम्यान, मुदतवाढ देण्यात आल्याने पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

प्रवेशासाठी राज्यस्तरावर निघणार सोडत...२५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याने एप्रिल किंवा मे महिन्यात राज्यस्तरावर सोडत काढण्यात येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संबधित शाळेत प्रवेश निश्चित करावे लागणार आहे. साेबतच पंचायत समिती स्तरावर कागदपत्रांची पडताळणी करावी लागणार आहे. त्यानंतरच शाळांमध्ये प्रवेश निश्चित होणार आहेत.

संपामुळे कागदपत्रे काढण्यास विलंब...सध्या शासकीय कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प आहे. परिणामी, आरटीई प्रवेशासाठी लागणारे उत्पन्न, रहिवासी, सामाजिक आरक्षणाचा दाखला काढण्यासाठी पालकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पालकांनी अर्जास मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यानुसार २५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

टॅग्स :Educationशिक्षणlaturलातूर