शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

प्रयोगशील शेतीने दुहेरी फायदा; सीताफळ बागेतून लाखोंचे उत्पन्न, तर आंतरपिक ठरले बोनस

By संदीप शिंदे | Updated: November 28, 2023 18:53 IST

कमी खर्चात मिळविले अधिकचे उत्पन्न; सिताफळाच्या विक्रीतून शेतकऱ्याने साधली आर्थिक प्रगती !

रेणापूर : तालुक्यातील खानापूर शिवारात माधव इगे या शेतकऱ्याने खरबड रानावर सीताफळ लागवड करून शेतकऱ्यांसाठी नवा आदर्श उभा केला आहे. बांधावरील सीताफळाची व्यावसायिक रूपाने लागवड करून अत्यंत कमी खर्चात उत्पादन काढत चांगला नफा मिळविला आहे. सध्याच्या दोन तोड्यात १४०० किलो शेतमाल हैद्राबाद येथील बाजारपेठेत पाठवला असून, त्याला प्रति किलो १४५ रुपये भाव मिळत आहे.

पारंपरिक पिकांबरोबर फळशेतीला इगे यांनी अधिक महत्त्व दिलेले आहे. तीन एकर क्षेत्रावर गोल्डन या सीताफळाच्या वाणाची लागवड केली आहे. त्यासाठी ठिंबकचा वापर केला असून, तीन वर्षात एकरी ४० हजार रुपयांचा खर्च केला. इतर पिकांच्या तुलनेत खत, औषधी व मजुरी कमी लागत असल्याने त्यांचा खर्च वाचला. इगे यांनी सीताफळातून प्रगतीची वाट धरली असून, सध्या सीताफळाची काढणी सुरू आहे. पहिल्याच दोन तोड्यात दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यांचा हा यशस्वी प्रयोग इतर फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरत आहे. सध्या प्रतिकिलोला १४५ रुपयांचा दर मिळत आहे. पहिल्याच दोन तोड्यात १४०० किलो उत्पादन घेतले आहे. अजूनही सुमारे ४ ते ५ टन उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे साधारण साडेसहा टन उत्पादन निघाल्यास ७ ते ९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळून खर्च वगळता ७ लाख रुपयांचा निव्वळ नफा होणे अपेक्षित आहे.

सिताफळामध्ये खरीप, रबीची घेतली पिके...लागवड केलेली जमीन हे मध्यम स्वरूपाची खरबड आहे. या जमिनीवर लागवड केलेल्या तीन एकर सिताफळाला ठिंबकद्वारे पाणीपुरवठा करून कमी पाण्यावर व कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न यातून केला आहे. तीन वर्षांपूर्वी लागवड केलेल्या सिताफळाबरोबरच आंतरपीक म्हणून खरीप हंगामात सोयाबीन तर रब्बी हंगामात हरभरा याही पिकाचे दुहेरी उत्पन्न यातून घेतले जात आहे. खरीप हंगाम सोयाबीन पेरणी केली होती. उतारा कमी आला मात्र तरीही यातून वीस कट्टे सोयाबीनचे झाले असल्याचे इगे म्हणाले.

खर्च सव्वा लाखांचा, उत्पन्न मिळणार ७ लाखांचे...गट नं. ९३ मध्ये खानापुर शिवार आहे. सिताफळाची तीन वर्षाखाली लागवड केली. उत्पन्नाचे हा पहिलाच तोडा आहे. दोन तोड्यात १४०० किलो विक्री झाली आहे. एकूण ५ ते ६ हजार किलो माल निघण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत फवारणी, खत व इतर खर्च असा १ लाख २० हजार खर्च आला असून, सध्या हा माल हैद्राबाद येथे विक्रीला जात आहे. तेथे १४५ किलो रुपयाप्रमाणे विक्री होत आहे. यातून खर्च जाऊन ७ लाख रुपयाचे नफा होईल असे शेतकरी माधव इगे यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र