शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

प्रतिकूल परिस्थितीतही बळीराजा हरला नाही; एक एकरात घेतले १५ क्विंटल हरभरा उत्पादन

By आशपाक पठाण | Updated: February 8, 2024 13:13 IST

चाकूर तालुक्यातील सुगाव येथील योगेश्वर शिंदे यांचा प्रयोग

लातूर : रब्बी हंगामातील पिकांचे बहुतांश उत्पादन निसर्गाच्या कृपेवर अवलंबून असते. त्यामुळे अनेकदा अपेक्षित उत्पादन मिळत नाही. मात्र, चाकूर तालुक्यातील सुगाव येथील योगेश्वर श्रीकृष्ण शिंदे या तरुण शेतकऱ्याने एक एकर क्षेत्रावर तब्बल १५ क्विंटल हरभऱ्याचे उत्पादन घेतले आहे. हवामानाची प्रतिकूल परिस्थिती असतानाही एकरी १५ क्विंटलचा उतारा दिलासादायक आहे.

चाकूर तालुक्यातील सुगावचे शेतकरी श्रीकृष्ण शिंदे हे प्रयोगशील शेतकरी आहेत. देशभरात विविध ठिकाणच्या कृषी संशोधन केंद्रांना भेटी देऊन नवीन वाण, उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळे उपक्रम राबवितात. यावर्षी त्यांनी रब्बी हंगामात आंध्र प्रदेशातील नंदियाल येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रातून हरभऱ्याचे एनबीईजी ७७६ हे बियाणे आणले होते. १०५ दिवसांचे पीक असलेल्या हरभऱ्याला पेरणीनंतर एकदाही पाणी देण्याची गरज भासली नाही. पेरणीनंतर दोन वेळा पाऊस झाला. वातावरणातील बदलामुळे अळीचा प्रादुर्भावही झाला होता.

मात्र, फवारणीनंतर पिकाने जोर धरला. ऑक्टोबर महिन्यात पेरणी झालेला हरभरा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात काढण्यात आला. पीक कापणी प्रयोग प्रात्यक्षिकात एक एकर क्षेत्रावर तब्बल १५ क्विंटलचे उत्पादन झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा ५ एकरी पाच क्विंटलही उत्पादन निघेल की नाही, अशी भीती असताना शिंदे यांना भरघोस उत्पादन झाले आहे.

पीक कापणी प्रयोगात उतारारब्बी हंगामातील हरभऱ्याला साधारणत: दहा क्विंटलचे उत्पादन निघते. तेही हवामान चांगले असायला हवे. सुगाव येथील शेतकरी योगेश्वर श्रीकृष्ण शिंदे या शेतकऱ्याने पेरणी केलेल्या हरभऱ्याचे मंडळ कृषी अधिकारी शिरीष खंदारे यांच्या उपस्थितीत पीक कापणी प्रयोग करण्यात आला. यात एका एकरात १५ क्विंटल हरभरा निघाला आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीOsmanabadउस्मानाबाद