शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

प्रतिकूल परिस्थितीतही बळीराजा हरला नाही; एक एकरात घेतले १५ क्विंटल हरभरा उत्पादन

By आशपाक पठाण | Updated: February 8, 2024 13:13 IST

चाकूर तालुक्यातील सुगाव येथील योगेश्वर शिंदे यांचा प्रयोग

लातूर : रब्बी हंगामातील पिकांचे बहुतांश उत्पादन निसर्गाच्या कृपेवर अवलंबून असते. त्यामुळे अनेकदा अपेक्षित उत्पादन मिळत नाही. मात्र, चाकूर तालुक्यातील सुगाव येथील योगेश्वर श्रीकृष्ण शिंदे या तरुण शेतकऱ्याने एक एकर क्षेत्रावर तब्बल १५ क्विंटल हरभऱ्याचे उत्पादन घेतले आहे. हवामानाची प्रतिकूल परिस्थिती असतानाही एकरी १५ क्विंटलचा उतारा दिलासादायक आहे.

चाकूर तालुक्यातील सुगावचे शेतकरी श्रीकृष्ण शिंदे हे प्रयोगशील शेतकरी आहेत. देशभरात विविध ठिकाणच्या कृषी संशोधन केंद्रांना भेटी देऊन नवीन वाण, उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळे उपक्रम राबवितात. यावर्षी त्यांनी रब्बी हंगामात आंध्र प्रदेशातील नंदियाल येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रातून हरभऱ्याचे एनबीईजी ७७६ हे बियाणे आणले होते. १०५ दिवसांचे पीक असलेल्या हरभऱ्याला पेरणीनंतर एकदाही पाणी देण्याची गरज भासली नाही. पेरणीनंतर दोन वेळा पाऊस झाला. वातावरणातील बदलामुळे अळीचा प्रादुर्भावही झाला होता.

मात्र, फवारणीनंतर पिकाने जोर धरला. ऑक्टोबर महिन्यात पेरणी झालेला हरभरा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात काढण्यात आला. पीक कापणी प्रयोग प्रात्यक्षिकात एक एकर क्षेत्रावर तब्बल १५ क्विंटलचे उत्पादन झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा ५ एकरी पाच क्विंटलही उत्पादन निघेल की नाही, अशी भीती असताना शिंदे यांना भरघोस उत्पादन झाले आहे.

पीक कापणी प्रयोगात उतारारब्बी हंगामातील हरभऱ्याला साधारणत: दहा क्विंटलचे उत्पादन निघते. तेही हवामान चांगले असायला हवे. सुगाव येथील शेतकरी योगेश्वर श्रीकृष्ण शिंदे या शेतकऱ्याने पेरणी केलेल्या हरभऱ्याचे मंडळ कृषी अधिकारी शिरीष खंदारे यांच्या उपस्थितीत पीक कापणी प्रयोग करण्यात आला. यात एका एकरात १५ क्विंटल हरभरा निघाला आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीOsmanabadउस्मानाबाद