शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
6
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
7
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
8
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
9
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
10
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
11
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
12
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
13
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
14
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
15
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
16
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
17
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
18
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
19
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
20
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?

कृषी महाविद्यालयात मूल्यांकन कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:15 IST

या कार्यशाळेचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एल. व्ही. पिंपळपल्ले यांनी केले तर सादरीकरण डॉ. जी. डी. रेडे ...

या कार्यशाळेचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एल. व्ही. पिंपळपल्ले यांनी केले तर सादरीकरण डॉ. जी. डी. रेडे यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एम. पाटील यांनी मूल्यांकनासंदर्भात सखोल माहिती दिली तसेच संस्थेचे सचिव गंगाधरराव दापकेकर यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना मूल्यांकनासंदर्भात मार्गदर्शन केले. डॉ. सचिन मुळे यांनी आभार मानले.

मुख्याधिकारी भारत राठोड यांचा सत्कार

उदगीर : येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड यांनी उदगीर शहरात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्यावतीने केंद्रप्रमुख महानंदा बहेनजी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्याधिकारी राठोड यांनी उदगीर शहरात स्वच्छता अभियान, माझी वसुंधरा अभियान यासह कोरोना काळात पुढाकार घेऊन उदगीर शहराला नामांकन प्राप्त करून दिले आहे. त्यांनी शहरात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला राम मोतीपवळे, रश्मी बहेनजी उपस्थित होत्या.

सुनेगाव शेंद्री येथे शिवराज्याभिषेक दिन

अहमदपूर : तालुक्यातील सुनेगाव शेंद्री ग्रामपंचायतीतर्फे शिवराज्याभिषेक सोहळा दिन साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच उषा जायभाये, सदस्य आरती बेले, गोपीनाथ जायभाये, राम जायभाये, माजी सरपंच सोपान जायभाये, ग्रामसेवक बिरादार, गोविंद काळे, गोपाळ काळे, सगरबाई जायभाये, श्रीकांत केंद्रे, बाळू काळे, अशोक जायभाये, सखाराम जायभाये, बालाजी वाघमारे, नारायण जायभाये, राजू थगनर, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

जलसंपदा शासकीय वसाहतीत वृक्ष लागवड

लातूर : पर्यावरण सप्ताहानिमित्त मंगळवारी पाटबंधारे उपविभाग क्रमांक ३ व वृक्ष प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणातून सुशोभिकरण मोहिमेची सुरुवात शासकीय पाटबंधारे तेरणा वसाहत, जुना औसा रोड, लातूर येथे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे व कार्यकारी अभियंता रोहित जगताप यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. यावेळी अभियंता एस. जी. कोन्गे, नितीन पाटील, वृक्ष प्रतिष्ठानच्या सुनंदा जगताप, एस. पी. जावळी, एस. वाय. वाघमारे, अभिजीत नितनवरे, भीमाशंकर हुलसुरे, गोरख जाधव, चांद शेख, आर. के. पाटील, संभाजी मोरे, स्वामी, पृथ्वीराज पवार उपस्थित होते.

शेतकऱ्यांकडून खते, बियाण्यांची जुळवाजुळव

लातूर : खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असून, शेतकऱ्यांकडून बियाणे, खतांचे नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात तूर, सोयाबीन, आदी पिकांना सर्वाधिक पसंती असते. दरम्यान, यंदा हवामान विभागाने चांगल्या पावसाचा अंदाज सांगितला असल्याने शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. दरम्यान, कृषी सेवा केंद्रावर बियाणे, खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. शेतकऱ्यांनी जमीन चांगली ओली होईपर्यंत पेरणी करु नये, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रवासी निवारा उभारण्याची मागणी

लातूर : कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने अनलॉक करण्यात आले आहे. दरम्यान, राज्य परिवहन महामंडळाची बससेवा पूर्ववत झाली आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करत एस. टी. सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, पावसाचे दिवस असल्याने एस. टी. प्रवाशांसाठी प्रवासी निवारा शेड आवश्यक आहे. दरम्यान, अनेक गावांमधील ग्रामस्थांनी बसथांब्याच्या ठिकाणी प्रवासी निवारा शेड उभारण्याची मागणी केली आहे. याकडे एस. टी. महामंडळ प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

जेवळी रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी

लातूर : तालुक्यातील जेवळी, साई, हरंगूळ खु. आदी गावांकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या मार्गावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी संबंधित विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र, त्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. दरम्यान, पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.