शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

कृषीपंपाची जोडणी न देताच वीज बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:25 IST

तालुक्यातील एकुर्का रोड येथील वीजग्राहक त्रिशलाबाई कैलास जाधव, रुक्मीनबाई उत्तमराव शेवाळे, दिगंबर गुंडा गडदे या शेतकऱ्यांनी तीन एचपी चे ...

तालुक्यातील एकुर्का रोड येथील वीजग्राहक त्रिशलाबाई कैलास जाधव, रुक्मीनबाई उत्तमराव शेवाळे, दिगंबर गुंडा गडदे या शेतकऱ्यांनी तीन एचपी चे डिमांड सन २००७ साली भरले आहे. मात्र, अद्याप यांना जोडणी दिली गेली नसल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले. वीज जोडणी न देताच बिल मात्र दिले गेल्याने संबंधित शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत. अनुक्रमे २६ हजार, ९ हजार व १० हजार रुपये बिल संबंधित शेतकऱ्यांना आकारण्यात आले आहे. वारंवार संबंधित विभागाची याबाबतीत कल्पना देऊनही बिल दिले गेल्यामुळे शेतकऱ्यांनी शेवटी उपोषणाचा मार्ग अवलंबिला आहे. सदरील शेतजमीन मलकापूर येथील संतराम महादू भालके यांनी खरेदी केली असून त्यांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी अखिल भारतीय सेनेच्या वतीने २३ ऑगस्ट निवेदन देऊन सबंधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची करण्यात आली होती. निवेदनावर जिल्हा संपर्कप्रमुख विश्वनाथ गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. डॉ. श्रवणकुमार माने, संतराम भालेराव यांच्यासह संबंधित शेतकऱ्यांनी स्वाक्षरी केली आहे. मात्र, अद्याप यावर मार्ग निघाला नसल्यामुळे सोमवारपासून अखिल भारतीय सेनेच्यावतीने वीज वितरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांसोबत उपोषण सुरू करण्यात आले आहे.