शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

विजेच्या तांत्रिक दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात; आजपासून शहराचा पाणी पुरवठा होणार सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:24 IST

लातूर : लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणावर तसेच हरंगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्रावर विजेचा बिघाड झाला होता. त्यामुळे ...

लातूर : लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणावर तसेच हरंगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्रावर विजेचा बिघाड झाला होता. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून पाणी पुरवठा बंद होता. हरंगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील वीज दुरूस्तीचे काम पूर्ण झाले असून, मांजरा धरणावरील काम अंतिम टप्प्यात आहे. रात्री उशिरापर्यंत हे काम पूर्ण होणार असून, आज (शनिवार)पासून लातूर शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे.

धनेगाव धरण आणि हरंगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्रावर बुधवारी विजेचा बिघाड झाला. त्यामुळे मांजरा प्रकल्पातून पाणी उचलण्याची प्रक्रिया बंद झाली होती. धरणावरील दोन्ही पंप बंद होते. दरम्यान, इकडे हरंगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड झाला. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून शहराचा पाणी पुरवठा ठप्प झाला होता. आता हरंगुळ येथील दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून, धनेगाव येथील काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. अधून-मधून पावसाच्या सरी पडत असल्यामुळे काम करण्यात व्यत्यय येत आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम होईल, असे लातूर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील कार्यकारी अभियंता नागनाथ कलवले यांनी सांगितले. शुक्रवारी रात्री उशिरा पंप सुरू करून शहरातील सर्व जलकुंभ भरून घेतले जाणार आहेत. त्यानंतर शनिवारी सकाळपासून नवीन वेळापत्रकानुसार पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

तीन दिवसांनी वेळापत्रक पुढे ढकलले...

पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक तीन दिवसांनी पुढे ढकलले गेले आहे. ज्या नगरांत शुक्रवारी पाणी येणार होते, त्या नगरांत सोमवारी पाणी येईल. जिथे सोमवारी पाणी येणार होते, तिथे गुरुवारी पाणी येणार आहे. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वेळापत्रकात बदल केला आहे. पाणी पुरवठ्याची एक फेरी पूर्ण झाल्यानंतर पूर्वीच्या वेळापत्रकानुसार पाणी सोडले जाईल, असेही अभियंता कलवले यांनी सांगितले.

शहरात आठ दिवसाआड पाणी...

मांजरा प्रकल्पात यंदाच्या पावसाळ्यात तेरा ते पंधरा एमएलडी नवीन पाणीसाठा झाला असून, पूर्वीप्रमाणेच शहरात आठ दिवसाआड पाणी देण्यात येत आहे. मागील दोन महिन्यांत वीजबिल थकल्यामुळे पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले होते. महावितरणने वीज पुरवठा खंडित केल्यामुळे पाणी उचलणे बंद झाले होते तर आता विजेचा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पाणी पुरवठा बंद झाला आहे. यंदाच्या पावसाळ्यात या ना त्या कारणाने शहरवासीयांची दोनवेळा गैरसोय झाली आहे. पावसाळ्यापूर्वी दुरूस्तीचे काम करणे आवश्यक असते. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे नागरिकांना गैरसोय सहन करावी लागली आहे.