शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या तांत्रिक दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात; आजपासून शहराचा पाणी पुरवठा होणार सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:24 IST

लातूर : लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणावर तसेच हरंगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्रावर विजेचा बिघाड झाला होता. त्यामुळे ...

लातूर : लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणावर तसेच हरंगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्रावर विजेचा बिघाड झाला होता. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून पाणी पुरवठा बंद होता. हरंगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील वीज दुरूस्तीचे काम पूर्ण झाले असून, मांजरा धरणावरील काम अंतिम टप्प्यात आहे. रात्री उशिरापर्यंत हे काम पूर्ण होणार असून, आज (शनिवार)पासून लातूर शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे.

धनेगाव धरण आणि हरंगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्रावर बुधवारी विजेचा बिघाड झाला. त्यामुळे मांजरा प्रकल्पातून पाणी उचलण्याची प्रक्रिया बंद झाली होती. धरणावरील दोन्ही पंप बंद होते. दरम्यान, इकडे हरंगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड झाला. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून शहराचा पाणी पुरवठा ठप्प झाला होता. आता हरंगुळ येथील दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून, धनेगाव येथील काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. अधून-मधून पावसाच्या सरी पडत असल्यामुळे काम करण्यात व्यत्यय येत आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम होईल, असे लातूर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील कार्यकारी अभियंता नागनाथ कलवले यांनी सांगितले. शुक्रवारी रात्री उशिरा पंप सुरू करून शहरातील सर्व जलकुंभ भरून घेतले जाणार आहेत. त्यानंतर शनिवारी सकाळपासून नवीन वेळापत्रकानुसार पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

तीन दिवसांनी वेळापत्रक पुढे ढकलले...

पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक तीन दिवसांनी पुढे ढकलले गेले आहे. ज्या नगरांत शुक्रवारी पाणी येणार होते, त्या नगरांत सोमवारी पाणी येईल. जिथे सोमवारी पाणी येणार होते, तिथे गुरुवारी पाणी येणार आहे. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वेळापत्रकात बदल केला आहे. पाणी पुरवठ्याची एक फेरी पूर्ण झाल्यानंतर पूर्वीच्या वेळापत्रकानुसार पाणी सोडले जाईल, असेही अभियंता कलवले यांनी सांगितले.

शहरात आठ दिवसाआड पाणी...

मांजरा प्रकल्पात यंदाच्या पावसाळ्यात तेरा ते पंधरा एमएलडी नवीन पाणीसाठा झाला असून, पूर्वीप्रमाणेच शहरात आठ दिवसाआड पाणी देण्यात येत आहे. मागील दोन महिन्यांत वीजबिल थकल्यामुळे पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले होते. महावितरणने वीज पुरवठा खंडित केल्यामुळे पाणी उचलणे बंद झाले होते तर आता विजेचा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पाणी पुरवठा बंद झाला आहे. यंदाच्या पावसाळ्यात या ना त्या कारणाने शहरवासीयांची दोनवेळा गैरसोय झाली आहे. पावसाळ्यापूर्वी दुरूस्तीचे काम करणे आवश्यक असते. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे नागरिकांना गैरसोय सहन करावी लागली आहे.