शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
4
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
5
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
6
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
7
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
8
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
9
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
10
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
11
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
12
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
13
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
14
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
15
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
16
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
17
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

लातूर जिल्ह्यात आठ गावांनी एसटीच पाहिली नाही! तीन किमी पायपीट करून यावे लागते बसथांब्यावर

By हणमंत गायकवाड | Updated: August 12, 2022 20:36 IST

Latur News: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असलो तरी अनेक गावांमध्ये दळणवळणाची साधने नाहीत. त्यामुळे विकास साधता आलेला नाही. जिल्ह्यातील आठ गावांमध्ये अद्याप एसटीच पोहोचली नाही.

- हणमंत गायकवाडलातूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असलो तरी अनेक गावांमध्ये दळणवळणाची साधने नाहीत. त्यामुळे विकास साधता आलेला नाही. जिल्ह्यातील आठ गावांमध्ये अद्याप एसटीच पोहोचली नाही. त्यामुळे या गावांतील ग्रामस्थांना टमटम, काळी-पिवळी अशा खाजगी वाहनांचा प्रवासासाठी आधार घ्यावा लागतो आहे.

जिल्ह्यातील चाटगाव, मोरवड, लिंगदाळ, मोहनाळ, आरी, सर्फराजपूर, गुणेवाडी, जोतवाडी या गावांमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी अद्याप पोहोचली नाही. तीन किलोमीटर अंतरापर्यंत पायपीट किंवा खाजगी वाहनांचा आधार घेऊन त्यांना बस गाठण्यासाठी यावे लागते. प्रस्तुत आठ गावांना तीन किलोमीटर अंतरापर्यंत चांगला रस्ता नसल्यामुळे या गावांमध्ये एसटी पोहोचलेली नाही. जिल्ह्यात ९३५ गावे आहेत. त्यापैकी या आठ गावांमध्ये दळणवळणाची सुविधा नाही. त्यांना ऑटो अथवा काळी-पिवळी जीपचा सहारा घ्यावा लागतो. किंवा तीन कि.मी. पायी अंतर जाऊन एसटीच्या थांब्याजवळ यावे लागते.

६० ते ७० गाड्या नादुरुस्तएसटी महामंडळाच्या जिल्ह्यातील पाच आगारांसाठी ४४० बसेस आहेत. त्यापैकी ६० ते ७० गाड्या नादुरुस्त आहेत. दुरुस्तीसाठी आगारात असतात. गाव तिथे एसटी पोहोचणार असा उपक्रम असला तरी या आठ गावांमध्ये बसेस नाहीत. नादुरुस्त बसेस दुरुस्त करून ज्या गावात एसटी जात नाही, त्या गावात बसेस सोडाव्यात, अशी मागणी होते.

जिल्ह्यात लातूर, अहमदपूर, औसा आणि निलंगा असे पाच आगार आहेत. या आगारांसाठी एकूण ४४० बसेस आहेत. लातूर ११३, अहमदपूर ८९, उदगीर ९५, निलंगा ७२, औसा ७१ अशी बसेसची संख्या आहे. त्याद्वारे प्रवासी सेवा सुरू आहे. जिल्ह्याची लोकसंख्या आणि गावांची संख्या लक्षात घेता बसेस वाढविण्याचीही गरज प्रवाशांतून व्यक्त केली जात आहे.

एसटी गावात जाण्यासाठी रस्ता चांगला नसल्यामुळे आठ गावांमध्ये एसटी जात नाही. त्या गावांच्या तीन कि.मी. अंतरापासून एसटी जाते. असे आपल्या जिल्ह्यात आठ गावे आहेत. ९३५ गावांपैकी ही संख्या नगण्य आहे. त्या गावांतही पुढील काळात एसटी धाऊ शकते. - अभय देशमुख, वाहतूक नियंत्रक

टॅग्स :state transportएसटीlaturलातूर