शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

शिक्षणातून सुसंस्कारक्षम नागरिक घडावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:15 IST

लातूर : आजच्या शिक्षणामध्ये व्यावहारिक ज्ञान, विज्ञान आणि अध्यात्माचा आधार घेऊन विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व संस्कृतीचा संस्कार होणे ...

लातूर : आजच्या शिक्षणामध्ये व्यावहारिक ज्ञान, विज्ञान आणि अध्यात्माचा आधार घेऊन विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व संस्कृतीचा संस्कार होणे गरजेचे आहे. शिक्षणातून सुसंस्कारक्षम नागरिक घडला पाहिजे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी येथे व्यक्त केले.

महात्मा बसवेश्वर महाविद्यालय व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने २३ वा दीक्षांत समारंभ महाविद्यालयाच्या सभागृहात सोमवारी पार पडला, यावेळी ते बोलत होते. मंचावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूरच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, स्वा. रा. ती. म. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, शैलेश पाटील चाकूरकर, प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे, डॉ. यशवंत वळवी उपस्थित होते. डॉ. शिवराज पाटील चाकूरकर म्हणाले, समृद्ध भारत बनवायचा असेल तर आपल्याला महापुरुषांचे विचारकार्य व तत्त्वज्ञान सर्वांपर्यंत रुजवणे आवश्यक आहे. शिक्षणाच्या माध्यमातून एकमेकांमध्ये बंधुभाव वाढला पाहिजे. आपले कर्तव्यही आपण ओळखले पाहिजे.

प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे यांनी महाविद्यालयाच्या विकासाचा आलेख सर्वांसमोर मांडला. या कार्यक्रमामध्ये एकूण ४२४पैकी निवडक गुणवंतांना पदवी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. रत्नाकर बेडगे व डॉ. उमा कडगे यांनी केले तर रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. संजय गवई यांनी आभार मानले. यावेळी प्रा. बी. व्ही. मोतीपवळे, माजी आमदार ॲड. सोनकवडे, माजी प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे, डॉ. एम. एस. दडगे, घाडगे, डॉ. यू. व्ही. बिरादार, प्रा. गिरजप्पा मुचाटे, सिनेट सदस्य प्रा. सुरज दामरे आदींसह प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमात प्रारंभी प्रा. विजयकुमार धायगुडे, प्रा. विश्वनाथ स्वामी, प्रा. गीता गिरवलकर, प्रा. अश्विनी रोडे यांनी विद्यापीठ गीत सादर केले.

नवीन शिक्षण क्षेत्राची निर्मिती करावी...

आपल्या देशात तरुणांची संख्या सर्वाधिक असून, तरुणांनी आपल्यामधील उणिवा व संधी शोधून नवनवीन शिक्षण क्षेत्राची निर्मिती केली पाहिजे. तसेच आव्हानांना पेलण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण केली पाहिजे, असे मत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी व्यक्त केले.