शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
2
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
3
“प्रशांत जगतापांनी अनेक पक्षांची ऑफर धुडकावून विचारासाठी काँग्रेस मार्ग पत्करला”: वडेट्टीवार
4
"अल्पसंख्याकांवरील अत्याचार खपवून घेणार नाही" २,९०० हून अधिक हल्ल्यांचा पुरावा; भारताचा बांगलादेशला गंभीर इशारा
5
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
6
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
7
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
8
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
9
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
10
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
11
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
12
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
13
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
14
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
15
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
16
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
17
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
18
MNS: गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
19
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
20
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणातून सुसंस्कारक्षम नागरिक घडावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:15 IST

लातूर : आजच्या शिक्षणामध्ये व्यावहारिक ज्ञान, विज्ञान आणि अध्यात्माचा आधार घेऊन विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व संस्कृतीचा संस्कार होणे ...

लातूर : आजच्या शिक्षणामध्ये व्यावहारिक ज्ञान, विज्ञान आणि अध्यात्माचा आधार घेऊन विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व संस्कृतीचा संस्कार होणे गरजेचे आहे. शिक्षणातून सुसंस्कारक्षम नागरिक घडला पाहिजे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी येथे व्यक्त केले.

महात्मा बसवेश्वर महाविद्यालय व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने २३ वा दीक्षांत समारंभ महाविद्यालयाच्या सभागृहात सोमवारी पार पडला, यावेळी ते बोलत होते. मंचावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूरच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, स्वा. रा. ती. म. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, शैलेश पाटील चाकूरकर, प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे, डॉ. यशवंत वळवी उपस्थित होते. डॉ. शिवराज पाटील चाकूरकर म्हणाले, समृद्ध भारत बनवायचा असेल तर आपल्याला महापुरुषांचे विचारकार्य व तत्त्वज्ञान सर्वांपर्यंत रुजवणे आवश्यक आहे. शिक्षणाच्या माध्यमातून एकमेकांमध्ये बंधुभाव वाढला पाहिजे. आपले कर्तव्यही आपण ओळखले पाहिजे.

प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे यांनी महाविद्यालयाच्या विकासाचा आलेख सर्वांसमोर मांडला. या कार्यक्रमामध्ये एकूण ४२४पैकी निवडक गुणवंतांना पदवी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. रत्नाकर बेडगे व डॉ. उमा कडगे यांनी केले तर रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. संजय गवई यांनी आभार मानले. यावेळी प्रा. बी. व्ही. मोतीपवळे, माजी आमदार ॲड. सोनकवडे, माजी प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे, डॉ. एम. एस. दडगे, घाडगे, डॉ. यू. व्ही. बिरादार, प्रा. गिरजप्पा मुचाटे, सिनेट सदस्य प्रा. सुरज दामरे आदींसह प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमात प्रारंभी प्रा. विजयकुमार धायगुडे, प्रा. विश्वनाथ स्वामी, प्रा. गीता गिरवलकर, प्रा. अश्विनी रोडे यांनी विद्यापीठ गीत सादर केले.

नवीन शिक्षण क्षेत्राची निर्मिती करावी...

आपल्या देशात तरुणांची संख्या सर्वाधिक असून, तरुणांनी आपल्यामधील उणिवा व संधी शोधून नवनवीन शिक्षण क्षेत्राची निर्मिती केली पाहिजे. तसेच आव्हानांना पेलण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण केली पाहिजे, असे मत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी व्यक्त केले.