शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

ई-केवायसी रखडली; ३३७० शेतकरी ‘प्रोत्साहन’पासून वंचित!

By संदीप शिंदे | Updated: February 17, 2023 22:15 IST

कर्जमुक्ती योजना : ८६ हजार जणांना २८९ कोटींचे अनुदान वितरित

- संदीप शिंदेलातूर : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत ५० हजारांपर्यंत प्रोत्साहन अनुदान वितरित करण्यात येत आहे. त्यानुसार आतापर्यंत ८६ हजार ५८० जणांना २८९ कोटी ६४ लाखांचे अनुदानही दिले आहे. मात्र, ३ हजार ३७० शेतकऱ्यांनी अद्यापही ई-केवायसी केलेली नाही. त्यामुळे हे शेतकरी प्रोत्साहनच्या लाभापासून वंचित आहेत.

जिल्ह्यात मागील तीन वर्षांत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या १ लाख ८४ हजार ९५६ आहे. त्यानुसार या शेतकऱ्यांची यादी प्रोत्साहन अनुदानासाठी शासनाकडे पाठविण्यात आली आहे. आतापर्यंत दोन याद्या जाहीर झाल्या असून, यामध्ये १ लाख ३० हजार ३८४ जणांचा समावेश आहे. यातील १ लाख २७ हजार १४ जणांनी ई-केवायसी केलेली आहे. त्यापैकी ८६ हजार ५८० शेतकऱ्यांच्या खात्यावर २८९ कोटी ६४ लाखांचे अनुदान वर्ग करण्यात आले आहे.

पहिल्या यादीत ४८ हजार शेतकऱ्यांची नावे आली होती. यातील ४५ हजार जणांच्या खात्यावर १५४ कोटी वर्ग करण्यात आले. दुसऱ्या यादीत ८३ हजार शेतकऱ्यांची नावे आली असून, त्यातील ४१ हजार जणांच्या खात्यावर १३२ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. २०१८-१९, २०१९-२० आणि २०२०-२१ या तीन वर्षांमध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्यात येत आहे. दरम्यान, अद्यापही तिसरी यादी जाहीर झालेली नाही. त्यामुळे ५४ हजार शेतकरी या यादीच्या प्रतीक्षेत आहेत.

७३२ शेतकऱ्यांनी मांडल्या तक्रारी...यादीत नाव आल्यास संबंधित शेतकऱ्यास बँकेत संपर्क साधावा लागतो. तेथे विशिष्ट क्रमांक देऊन कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. त्यानंतर प्रोत्साहनापोटी मिळणारी रक्कम मंजूर असल्यास शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्यात येते. त्यानुसार आतापर्यंत ८६ हजार जणांना २८९ कोटींचे अनुदान मिळालेले आहे.

तहसीलस्तरावर २१५ तक्रारी प्राप्त...जिल्ह्यात एकूण ७३२ तक्रारी प्राप्त आहेत. त्यानुसार ९५ तक्रारी जिल्हास्तरावर आहेत. २७४ तक्रारी प्रलंबित आहेत, तर तहसीलस्तरावर २१५ तक्रारी सोडविण्यात आल्या आहेत. तहसीलस्तरावर १४८ तक्रारी रखडलेल्या असून, त्या तातडीने सोडविण्याच्या सूचना शासनाकडून करण्यात आलेल्या आहेत.

ई-केवायसी करण्याचे आवाहन...ज्या शेतकऱ्यांचे प्रोत्साहन अनुदानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या यादीत नाव आले आहे. त्यांनी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. ई-केवायसी केल्यावरच पुढील प्रक्रिया केली जाणार आहे. सध्या ३३७० शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही. त्यांनी तातडीने ई-केवायसी करण्याचे आवाहन उपनिबंधक कार्यालयाने केले आहे.

अशी आहे प्रोत्साहनची आकडेवारी...पात्र शेतकरी - १,८४,९५६पहिली यादी - ४८,०००दुसरी यादी - ८३,०००विशिष्ट क्रमांक - १,३०,३८४ई-केवायसी झालेले - १,२७,०१४ई-केवायसी रखडली - ३,३७०अनुदान मिळालेले - ८६,५८०अनुदान रक्कम - २८९ कोटी ६४ लाख

टॅग्स :Farmerशेतकरीlaturलातूर