शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

पावसामुळे लातूर जिल्ह्यात मग्रारोहयोची कामे घटली !

By हरी मोकाशे | Updated: July 15, 2024 19:27 IST

लातूर जिल्ह्यात २ हजार ४३ कामांवर १ लाख ४० हजार २८९ मजूर काम करीत आहेत.

लातूर : यंदा वरुणराजाने दमदार बरसात केल्याने खरीपातील पेरण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. सध्या शेती कामे सुरु असल्याने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे घटली आहेत. जिल्ह्यात २ हजार ४३ कामांवर १ लाख ४० हजार २८९ मजूर काम करीत आहेत.

कुठल्याही मजुराची उपासमार होऊ नये. तसेच त्यांना गावातच हाताला काम मिळावे म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे मजुरांच्या स्थलांतर थांबण्यास मदत होत आहे. यंदा जिल्ह्यात वेळेवर पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पेरण्यांना वेग आला. आतापर्यंत जवळपास ९८ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सतत रिमझिम, मध्यम स्वरुपाचा पाऊस होत असल्याने पिकेही चांगली बहरली असून सध्या पिकांत तण वाढले आहे. त्यामुळे आंतरमशागतीच्या कामांना वेग आला आहे. तसेच खुरपणी, फवारणीची कामे सुरु आहेत. परिणामी, मग्रारोहयोवरील मजुरांची संख्या घटली आहे.

४४६ गावांमध्ये २ हजार कामे...जिल्ह्यात एकूण ७८६ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी ४४६ ग्रामपंचायतीअंतर्गत २ हजार ४३ कामे सुरु आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत हाताला काम नसल्याने मजुरांची भटकंती होत होती. त्यामुळे मग्रारोहयाेच्या कामांची संख्या वाढली होती. आता शेती कामांमुळे ही कामे कमी झाल्याचे पहावयास मिळत आहे.

सिंचन विहिरींची सर्वाधिक कामे...कामे - मजूरसिंचन विहीर - ८६५०२बांबू लागवड - १९३२घरकुल - ९७१०वृक्ष लागवड - ३६८०रस्ता - ३१११४शेततळे - ९०जनावरांचा गोठा - ६६३१ग्रामपंचायत भवन - ६३०

११ लाख मजूर क्षमतेची कामे सुरु...सध्या जिल्ह्यात ११ लाख ७७ हजार १३९ मजूर क्षमतेची २ हजार ४३ कामे सुरु आहेत. प्रत्यक्षात त्यावर १ लाख ४० हजार २८९ मजूर काम करीत आहेत. शेती कामे सुरु असल्याने मजूर संख्या घटली आहे.- दत्तात्रय गिरी, डेप्युटी सीईओ.

टॅग्स :laturलातूर