शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

वादळी वारे, पावसामुळे व्यावसायिकांची उडाली धांदल

By आशपाक पठाण | Updated: March 24, 2024 20:29 IST

आंब्याला फटका : गंजगोलाई, भाजीपाला बाजारात धावपळ.

लातूर : वादळी वारे, विजांचा कडकडाट अन् अचानक आलेल्या पावसामुळे लातूर शहरातील व्यावसायिकांची चांगलीच धांदल उडाली. सायंकाळी ६.२० वाजण्याच्या सुमारास पावसाने सुरूवात केली. त्यातच वीजही गुल झाली. दिवसभर वातावरणात उकाडा होता, सायंकाळी पाच वाजेपासून ढगाळ वातावरण झाले होते. अवकाळी पावसामुळे काहीअंशी दिलासा मिळाला असला तरी ग्रामीण भागात आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

गंजगोलाई भागात नेहमीप्रमाणे बाजारात ग्राहकांची वर्दळ होती. रमजान महिना सुरू असल्याने या भागात अनेकांनी दुकाने थाटली आहे. सायंकाळी ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत या भागात खरेदीसाठी गर्दी असते. त्यामुळे अनेकजण विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल लावतात. रविवारी सायंकाळी ग्राहकांची गर्दी सुरू असताना अचानक जोरदार वारे अन् पावसाने सुरूवात केल्याने धावपळ उडाली. अनेक फळविक्रेते, भाजीपाला, खाद्यपदार्थ विक्रेत्यांना याचा मोठा फटका असल्याचे फळविक्रेते शादुल शेख यांनी सांगितले.

भाजीपाला भिजला, पालही उडाले...

बार्शी रोडवर दयानंद गेट ते संविधान चौक समांतर रस्त्यावर भाजीपाला बाजारातही व्यावसायिकांची धावपळ झाली. अनेकांनी नजीकच्या दुकानांत पावसापासून बचावासाठी आश्रय घेतला. शेतकऱ्यांचा भाजीपाला मात्र उघडा पडला. पावसाने उघडीप दिल्यावर काही शेतकऱ्यांनी ग्राहकांच्या मागणीनुसार भाजीपाल्यांची विक्री केली. उन्हापासून बचावासाठी लावण्यात आलेल्या पालांचे प्लास्टिक वादळी वाऱ्यात उडून गेले. अवकाळी पावसाने नुकसान झाल्याचे भाजीपाला विक्रेते गफूर शेख, सुनंदा माने यांनी सांगितले.

रस्त्यांवर पाणीच पाणी...वादळी वारे थांबल्यावर सायंकाळी ६.३५ ते ७.२० वाजण्याच्या सुमारास रिमझिम पाऊस सुरू होता. लातूर शहरातील प्रमुख मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याने पाणी वाहत होते. पाच नंबर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, राजीव गांधी चौक, जुना रेणापूर नाका, बार्शी रोडवरील भाजीपाला, फळबाजार, नांदेड रोडवरील स्वामी विवेकानंद चौकातील व्यावसायिकांना या पावसाचा फटका बसला आहे. रविवार सुटीचा दिवस असल्याने दुपारनंतर खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ असते, त्यामुळे अनेकजण मालाची खरेदी करून दुकानात सजावट करून बसतात. मात्र, ऐनवेळी आलेल्या पावसाने चांगलीच धावपळ झाली.

आंबा, टरबूज, ज्वारीचे नुकसान...

रबी हंगामातील ज्वारीची काढणी तसेच राशीचे काम सध्या केले जात आहे. वातावरण उष्णतेचे असल्याने शेतकऱ्यांनी उघड्यावर ठेवलेली ज्वारी कणसं पावसात भिजली आहेत. तर ज्यांची काढणी शिल्लक आहे, अशा शेतकऱ्यांची उभी ज्वारी वादळी वाऱ्यात आडवी झाली आहे, पावसामुळे ज्वारी काळी पडणार, दर कमी मिळाल्याने आर्थिक फटका बसण्याची भिती शेतकरी महादेव भिसे यांनी सांगितले. वादळी वाऱ्यात आंब्याच्या कैऱ्या झडून गेल्या आहेत.

टॅग्स :laturलातूर