शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

वादळी वारे, पावसामुळे व्यावसायिकांची उडाली धांदल

By आशपाक पठाण | Updated: March 24, 2024 20:29 IST

आंब्याला फटका : गंजगोलाई, भाजीपाला बाजारात धावपळ.

लातूर : वादळी वारे, विजांचा कडकडाट अन् अचानक आलेल्या पावसामुळे लातूर शहरातील व्यावसायिकांची चांगलीच धांदल उडाली. सायंकाळी ६.२० वाजण्याच्या सुमारास पावसाने सुरूवात केली. त्यातच वीजही गुल झाली. दिवसभर वातावरणात उकाडा होता, सायंकाळी पाच वाजेपासून ढगाळ वातावरण झाले होते. अवकाळी पावसामुळे काहीअंशी दिलासा मिळाला असला तरी ग्रामीण भागात आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

गंजगोलाई भागात नेहमीप्रमाणे बाजारात ग्राहकांची वर्दळ होती. रमजान महिना सुरू असल्याने या भागात अनेकांनी दुकाने थाटली आहे. सायंकाळी ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत या भागात खरेदीसाठी गर्दी असते. त्यामुळे अनेकजण विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल लावतात. रविवारी सायंकाळी ग्राहकांची गर्दी सुरू असताना अचानक जोरदार वारे अन् पावसाने सुरूवात केल्याने धावपळ उडाली. अनेक फळविक्रेते, भाजीपाला, खाद्यपदार्थ विक्रेत्यांना याचा मोठा फटका असल्याचे फळविक्रेते शादुल शेख यांनी सांगितले.

भाजीपाला भिजला, पालही उडाले...

बार्शी रोडवर दयानंद गेट ते संविधान चौक समांतर रस्त्यावर भाजीपाला बाजारातही व्यावसायिकांची धावपळ झाली. अनेकांनी नजीकच्या दुकानांत पावसापासून बचावासाठी आश्रय घेतला. शेतकऱ्यांचा भाजीपाला मात्र उघडा पडला. पावसाने उघडीप दिल्यावर काही शेतकऱ्यांनी ग्राहकांच्या मागणीनुसार भाजीपाल्यांची विक्री केली. उन्हापासून बचावासाठी लावण्यात आलेल्या पालांचे प्लास्टिक वादळी वाऱ्यात उडून गेले. अवकाळी पावसाने नुकसान झाल्याचे भाजीपाला विक्रेते गफूर शेख, सुनंदा माने यांनी सांगितले.

रस्त्यांवर पाणीच पाणी...वादळी वारे थांबल्यावर सायंकाळी ६.३५ ते ७.२० वाजण्याच्या सुमारास रिमझिम पाऊस सुरू होता. लातूर शहरातील प्रमुख मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याने पाणी वाहत होते. पाच नंबर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, राजीव गांधी चौक, जुना रेणापूर नाका, बार्शी रोडवरील भाजीपाला, फळबाजार, नांदेड रोडवरील स्वामी विवेकानंद चौकातील व्यावसायिकांना या पावसाचा फटका बसला आहे. रविवार सुटीचा दिवस असल्याने दुपारनंतर खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ असते, त्यामुळे अनेकजण मालाची खरेदी करून दुकानात सजावट करून बसतात. मात्र, ऐनवेळी आलेल्या पावसाने चांगलीच धावपळ झाली.

आंबा, टरबूज, ज्वारीचे नुकसान...

रबी हंगामातील ज्वारीची काढणी तसेच राशीचे काम सध्या केले जात आहे. वातावरण उष्णतेचे असल्याने शेतकऱ्यांनी उघड्यावर ठेवलेली ज्वारी कणसं पावसात भिजली आहेत. तर ज्यांची काढणी शिल्लक आहे, अशा शेतकऱ्यांची उभी ज्वारी वादळी वाऱ्यात आडवी झाली आहे, पावसामुळे ज्वारी काळी पडणार, दर कमी मिळाल्याने आर्थिक फटका बसण्याची भिती शेतकरी महादेव भिसे यांनी सांगितले. वादळी वाऱ्यात आंब्याच्या कैऱ्या झडून गेल्या आहेत.

टॅग्स :laturलातूर