शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पाणी नसल्याने ‘जलदूत’ला ब्रेक!

By admin | Updated: May 22, 2016 00:33 IST

पाणीपुरवठा खंडित : म्हैसाळ योजना बंद, वारणेतून पाणी सोडले

मिरज : म्हैसाळ (ता. मिरज) गावाजवळ कृष्णा नदीपात्रात पाणी नसल्याने म्हैसाळ योजना गुरुवारपासून बंद पडली आहे, मिरजेतून लातूरला ‘जलदूत’ रेल्वेने होणारा पाणीपुरवठा शनिवारपासून खंडित झाला आहे. मालगावसह अन्य गावांतील नळपाणी पुरवठा बंद पडण्याची शक्यता आहे. वारणा धरणातून पाणी सोडण्यात येत असून, आज, रविवारपर्यंत नदीपात्रात पुरेसा पाणीसाठा झाल्यास म्हैसाळ योजनेचे पंप पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कर्नाटकात पाणी टंचाईमुळे कोयना धरणातून दोन टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. कर्नाटकात पाणी पोहोचण्यासाठी कृष्णा नदीपात्रात ठिकठिकाणी असलेल्या बंधाऱ्यांचे दरवाजे उघडण्यात आल्याने गेले आठवडाभर नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. म्हैसाळ योजनेचे पंप सुरू ठेवण्यासाठी आठ फूट पाणीसाठा आवश्यक असताना पाणीपातळी खालावल्याने गुरुवारपासून म्हैसाळ योजनेचे ६५ पंप बंद झाले आहेत. म्हैसाळच्या पहिल्या टप्प्यातील पंपगृहाच्या पंधरा पंपांद्वारे पाणी उपसा करण्यात येत असल्याने म्हैसाळ बंधाऱ्यात आठ फूट पाणीसाठ्याची आवश्यकता आहे. म्हैसाळचे पंप बंद पडल्याने कालव्यातून जतपर्यंत जाणारे पाणी थांबले आहे. मिरजेत कृष्णा घाटावर रेल्वेच्या पाणीपुरवठा योजनेचा जॅकवेल उघडा पडल्याने रेल्वेसाठी होणारा पाणी उपसा बंद झाला आहे. रेल्वेचा पाणीपुरवठा सुरू रहावा, यासाठी नदीपात्रात पोकलॅनद्वारे जॅकवेलजवळील गाळ काढून पाणीसाठा करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. नदीतून पाणी उपसा थांबल्याने शनिवारी लातूरला पाठविण्यासाठी पाणी टँकर भरले नाहीत. गेले चाळीस दिवस सुरू असलेला लातूरचा पाणीपुरवठा खंडित झाला असून, आणखी दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे. कृष्णा घाटावर नदीपात्रातील जॅकवेलजवळ पाणी नसल्याने मालगाव व टाकळी येथील पाणीपुरवठाही अडचणीत येणार आहे. नदीपात्रात पाणीसाठा होण्यासाठी वारणा धरणातून पाणी सोडण्यात येत असून, आज रविवारपर्यंत म्हैसाळ बंधाऱ्यापर्यंत पाणी येण्याची शक्यता असल्याचे पाटबंधारे अधिकाऱ्यांनी सांगितले. गेले दोन महिने म्हैसाळ योजनेचे पंप सुरू असल्याने मिरजेसह कवठेमहांकाळ, तासगाव, जत परिसरात पाणी उपलब्ध झाले आहे. कर्नाटकसाठी कोयनेतून पाणी सोडण्यात आल्यानंतर नदीपात्रातील पाणीसाठा कमी झाला आहे. यामुळे म्हैसाळ योजना बंद पडल्याने पंप कधी सुरू होणार याची प्रतीक्षा आहे. वारणेचे पाणी आल्यानंतरच टँकर पाण्याअभावी लातूरला पाणीपुरवठा बंद करून मिरज रेल्वेस्थानक व रेल्वे वसाहतीचा पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री रेल्वे टँकर भरले नसल्याने शनिवारी सकाळी टँकर भरण्यासाठी कशीबशी पाण्याची व्यवस्था करून ५० रेल्वे टँकर लातूरला रवाना करण्यात आले. मात्र त्यानंतर पाणीपुरवठा थांबविण्यात आला असून, वारणेचे पाणी उपलब्ध झाल्यानंतरच लातूरसाठी टँकर भरण्याचे काम सुरू होणार आहे. दि. ११ एप्रिलपासून सुमारे ८ कोटी २० लाख लिटर पाणी मिरजेतून लातूरला पाठविण्यात आले आहे. अधिकाऱ्यांत समन्वयाचा अभाव : देशपांडे पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने आणखी पंधरा दिवस लातूरला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे. नदीत पुरेसा पाणीसाठा रहावा यासाठी प्रशासन व पाटबंधारे अधिकाऱ्यांत समन्वय नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप भाजपचे नेते मकरंद देशपांडे यांनी केला. प्रशासनाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे वेळेत पाणी उपलब्ध झाले नसल्याचेही देशपांडे यांनी सांगितले.