शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

करपा रोगाने बटाटा, हाळद पीक धाेक्यात, उत्पादनात हाेणार घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:24 IST

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डिगोळ परिसरात काही शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामात बटाटा, आद्रक, हळदीचे उत्पादन घेण्यासाठी माेठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. ...

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डिगोळ परिसरात काही शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामात बटाटा, आद्रक, हळदीचे उत्पादन घेण्यासाठी माेठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. मात्र, हळद आणि बटाट्यावर तांबेरा पिवळसर राेगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी कमालीचा अडचणीत आला आहे. परिणामी, यंदा बटाटा, हळद आणि आद्रकाचे उत्पादन घटणार आहे. यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पावसाने हजेरी लावली. त्याचबराेबर परतीच्या पावसानेही जिल्ह्याला झाेडपून काढले. यामुळे तालुक्यातील नदी-नाले, पाझर तलाव, विंधन विहिरी आणि मध्यम, लघु प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली. याच पाण्यावर शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत नवनवे प्रयाेग करत उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला आहे. डिगाेळ शिवारातही यंदा बटाटा, आद्रक, हळदीची लागवड माेठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. या पिकावर तांबेरा, बुरशी राेगाचा प्रादुर्भाव झाल्याने हे पीक धाेक्यात आले आहे. हे पीक कसे वाचवायचे, हीच चिंता आता शेतकऱ्यांना सतावत आहे. पाने पिवळी पडून जाग्यावरच करपून जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

लातूर जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्या अधिक आहे. यातून आर्थिक परिस्थिती सुधारेल म्हणून शेतकऱ्यांनी उसाची लागवड माेठ्या प्रमाणावर केली आहे. बदलत्या तंत्राबरोबरच गेल्या काही वर्षांपासून रोगांचा प्रादुर्भाव कायम राहिला आहे. निलंगा तालुक्यात तांबेरा बुरशी रोगाचा प्रादुर्भाव माेठ्या प्रमाणात झाला आहे. उसावर तांबेरा हा कवकजन्य रोग बुरशीमुळे होत असल्याचे समाेर आले आहे. उसाच्या पानावर सुरुवातीला तांबडे, काळे ठिपके पडतात. त्यानंतर ठिपक्यांचा आकार वाढत जातो आणि उसाच्या पानांचा भुगा होताे. उसाची पाने तांबडी पडल्याने पानाच्या खालील बाजूस तांबूस पिटळी पडते. परिणामी, पीकच धाेक्यात येत असल्याने शेतकऱ्यांचे माेठे नुकसान हाेत आहे. यातून उसाची वाढ खुंटत जाते अन् वजन कमी भरते. सध्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस खराब झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.

शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार...

डिगोळ येथील साेसायटीचे चेअरमन बाबासाहेब पाटील यांनी एक एकरात बटाटा, एका एकरमध्ये आद्रक आणि एक एकरावर हळदीचे पीक घेतले आहे. डोंगरभागातील शेतीमध्ये बटाटा पिकाचे प्रमाण अधिक आहे. सतत रासायनिक खतांचा वापर, युरियाचा अधिक वापर यामुळे तांबेरा रोग पडला आहे. असे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले. यावर आता औषधांची फवारणी करण्याची गरज आहे. याबाबत आम्ही माहिती घेत असून, शेतकऱ्यांना फवारणीसाठी मार्गदर्शन करू, शिवाय वेळाेवेळी माहती देऊ, असे कृषी सहायक संभाजी सूर्यवंशी म्हणाले.