शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

करपा रोगाने बटाटा, हाळद पीक धाेक्यात, उत्पादनात हाेणार घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:24 IST

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डिगोळ परिसरात काही शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामात बटाटा, आद्रक, हळदीचे उत्पादन घेण्यासाठी माेठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. ...

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डिगोळ परिसरात काही शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामात बटाटा, आद्रक, हळदीचे उत्पादन घेण्यासाठी माेठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. मात्र, हळद आणि बटाट्यावर तांबेरा पिवळसर राेगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी कमालीचा अडचणीत आला आहे. परिणामी, यंदा बटाटा, हळद आणि आद्रकाचे उत्पादन घटणार आहे. यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पावसाने हजेरी लावली. त्याचबराेबर परतीच्या पावसानेही जिल्ह्याला झाेडपून काढले. यामुळे तालुक्यातील नदी-नाले, पाझर तलाव, विंधन विहिरी आणि मध्यम, लघु प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली. याच पाण्यावर शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत नवनवे प्रयाेग करत उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला आहे. डिगाेळ शिवारातही यंदा बटाटा, आद्रक, हळदीची लागवड माेठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. या पिकावर तांबेरा, बुरशी राेगाचा प्रादुर्भाव झाल्याने हे पीक धाेक्यात आले आहे. हे पीक कसे वाचवायचे, हीच चिंता आता शेतकऱ्यांना सतावत आहे. पाने पिवळी पडून जाग्यावरच करपून जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

लातूर जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्या अधिक आहे. यातून आर्थिक परिस्थिती सुधारेल म्हणून शेतकऱ्यांनी उसाची लागवड माेठ्या प्रमाणावर केली आहे. बदलत्या तंत्राबरोबरच गेल्या काही वर्षांपासून रोगांचा प्रादुर्भाव कायम राहिला आहे. निलंगा तालुक्यात तांबेरा बुरशी रोगाचा प्रादुर्भाव माेठ्या प्रमाणात झाला आहे. उसावर तांबेरा हा कवकजन्य रोग बुरशीमुळे होत असल्याचे समाेर आले आहे. उसाच्या पानावर सुरुवातीला तांबडे, काळे ठिपके पडतात. त्यानंतर ठिपक्यांचा आकार वाढत जातो आणि उसाच्या पानांचा भुगा होताे. उसाची पाने तांबडी पडल्याने पानाच्या खालील बाजूस तांबूस पिटळी पडते. परिणामी, पीकच धाेक्यात येत असल्याने शेतकऱ्यांचे माेठे नुकसान हाेत आहे. यातून उसाची वाढ खुंटत जाते अन् वजन कमी भरते. सध्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस खराब झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.

शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार...

डिगोळ येथील साेसायटीचे चेअरमन बाबासाहेब पाटील यांनी एक एकरात बटाटा, एका एकरमध्ये आद्रक आणि एक एकरावर हळदीचे पीक घेतले आहे. डोंगरभागातील शेतीमध्ये बटाटा पिकाचे प्रमाण अधिक आहे. सतत रासायनिक खतांचा वापर, युरियाचा अधिक वापर यामुळे तांबेरा रोग पडला आहे. असे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले. यावर आता औषधांची फवारणी करण्याची गरज आहे. याबाबत आम्ही माहिती घेत असून, शेतकऱ्यांना फवारणीसाठी मार्गदर्शन करू, शिवाय वेळाेवेळी माहती देऊ, असे कृषी सहायक संभाजी सूर्यवंशी म्हणाले.