शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दारूच्या नशेने तोल जाऊन तरुण विहिरीत पडला; वाचविण्यास गेलेले वडीलही बुडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 17:20 IST

नशेमुळे तोल गेला आणि तो विहिरीत पडला़

ठळक मुद्देदुसऱ्या भावाने विहिरीत उडी घेऊन वाचविण्याचा प्रयत्न केला

उदगीर (जि़ लातूर) : वडील आणि दोन मुले, असे तिघे जण निडेबन शिवारातील विहिरीच्या काठावर गुरूवारी रात्री दारू पीत बसले होते़ तोल गेल्याने एक मुलगा विहिरीत पडला़ त्याला वाचविण्यासाठी वडिलांनी उडी घेतली़; परंतु दोघेही बुडाले़  वडील, भावाला वाचविण्यासाठी तिसऱ्याने उडी घेतली. मात्र, दोघांना वाचविण्यात यश आले नाही़ बालाजी मारुती मामूलवार (२०), मारुती गंगाराम मामूलवार (५८), अशी मृतांची नावे आहेत.  

मारूती गंगाराम मामूलवार, बालाजी मारुती मामूलवार व गंगाधर मारुती मामूलवार या तिघा बाप-लेकांनी गुरूवारी रात्री राजकुमार पांचाळ यांच्या शेतातील विहिरीच्या काठावरून बसून दारू प्राशन केली़ मामूलवार कुटुंबिय हे मजुरी करून उदनिर्वाह करतात़ रात्री ९ वाजण्याच्या सुमारास बालाजीचा नशेमुळे तोल गेला आणि तो विहिरीत पडला़ त्याला वाचविण्यासाठी वडिल मारुती यांनी विहिरीत उडी घेतली़  त्या दोघांना वाचविण्यासाठी दूसरा मुलगा गंगाधर यानेही विहिरीत उडी मारली़ परंतु, गंगाधरला वडील व भावाला वाचविण्यात यश आले नाही़ या घटनेत मारुती मामूलवार, मुलगा बालाजी यांचा बुडून मृत्यू झाला़ रात्री उशिरा दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले़ याप्रकरणी निडेबनचे पोलीस पाटील मधूकर रंगवाळ यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली़ 

टॅग्स :Deathमृत्यूlaturलातूर