शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
12
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
13
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
14
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
15
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
16
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
17
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
18
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
19
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

वाहनचालकांचे उत्पन्न घटले, खर्च वाढला; भागवायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:18 IST

गॅरेजचालकांवर संकट लातूर जिल्ह्यात गॅरेज सुरू करण्यास परवानगी आहे; परंतु त्यासाठी ७ ते ११ चा कालावधी आहे. या वेळेत ...

गॅरेजचालकांवर संकट

लातूर जिल्ह्यात गॅरेज सुरू करण्यास परवानगी आहे; परंतु त्यासाठी ७ ते ११ चा कालावधी आहे. या वेळेत वाहने येणे अशक्य आहे. परिणामी, वाहनेच येत नसल्याने उत्पन्नाचे स्रोत बंद झाले आहेत. कामासाठी असलेली मुले, दुकानाचे भाडे कसे भरावे, असा प्रश्न गॅरेजचालकांमधून उपस्थित केला जात आहे.

वाहनचालकांसमोर अडचणींचा डोंगर

फायनान्स कंपनीकडून लोन घेऊन अनेकांनी चारचाकी वाहने घेतली आहेत. त्याचे हप्ते थकत आले आहेत. त्यातच प्रवासी वाहतूक बंद आहे. विवाह समारंभासाठी नियम असल्याने मोजकीच उपस्थिती राहत आहे. परिणामी, गाड्यांचा दरवर्षीचा हंगाम यावर्षी थंडावला आहे. त्यामुळे वाहनचालकांसमोर अडचणींचा डोंगर निर्माण झाला आहे.

वाहने उभी असल्याने गॅरेजवर शुकशुकाट

प्रवासी वाहने एकाच जागी उभी आहेत. परिणामी, गॅरेजवर वाहनेच येत नसल्याचे चित्र आहे. मोजक्याच वेळेत किती वाहनांची दुरुस्ती करणार. शासनाने अत्यावश्यक सेवेमध्ये समावेश करून गॅरेज पूर्णवेळ उघडे ठेवण्यास मुभा द्यावी.

-जावेद सय्यद, गॅरेज मालक

गेल्या दोन महिन्यांपासून संचारबंदी आहे. त्यामुळे हाताला काम मिळत नाही. ज्यादिवशी गाडी दुरुस्तीसाठी येईल, त्याचदिवशी बोलावले जात आहे. कोरोनामुळे अर्थचक्र कोलमडले आहे. गॅरेज पूर्णवेळ उघडण्यास मुभा द्यावी.

- इस्राईल शेख

वाहने पार्किंगमध्येच

चारचाकी वाहने गेल्या दोन महिन्यांपासून पार्किंगमध्येच आहेत. बाहेर जाण्याचा योगच आलेला नाही. दुचाकी असल्याने त्यावरच बाहेर जातो. मात्र, सध्या संचारबंदी असल्याने कुठेही जाणे अशक्य आहे.

-ऋषिकेश महामुनी

घरी केवळ दुचाकी आहे. संचारबंदी असल्याने बाहेर जाणे टाळावे लागत आहे. त्यामुळे गाडी दुरुस्तीसाठी, नियमित सर्व्हिसिंगसाठी नेली नाही. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर गाडीची दुरुस्ती करू.

-महेश पाटील