शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

लस घेण्यापूर्वी करा रक्तदान, नंतर दोन महिने थांबावे लागणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:18 IST

गतवर्षी कोराेनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे राज्य शासनाने रक्तदानाचे आवाहन केले होते. त्यास जिल्ह्यात उत्स्फूर्त ...

गतवर्षी कोराेनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे राज्य शासनाने रक्तदानाचे आवाहन केले होते. त्यास जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील सहाही रक्तपेढ्यांमध्ये विपुल रक्तसाठा झाला होता. यंदा कोरोना लसीकरण सुरू झाले आहे. दरम्यान, आरोग्य विभागाने लसीचा दुसरा डोस घेतल्यापासून २८ दिवसांनंतर रक्तदान करावे, अशा मार्गदर्शन सूचना केल्या आहेत. त्याचा रक्त संकलनावर परिणाम होण्याची शक्यता रक्तपेढ्यांच्या प्रमुखांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी लसीकरणापूर्वी रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन केले आहे.

मार्च ते जून या कालावधीत तापमान वाढते. त्यामुळे सतत थकवा जाणवतो. तसेच परीक्षांचा कालावधी असतो आणि महाविद्यालयांना सुट्ट्या असतात. त्यामुळे युवकांकडून रक्तदानाचे प्रमाण कमी होते. याउलट या कालावधीत अपघात वाढतात. त्यामुळे रक्ताची अधिक गरज भासत असते. रक्तदानासाठी समाजात जनजागृतीची गरज आहे.

दुसऱ्या डोसनंतर २८ दिवसांनी करा रक्तदान...

कोरोना लसीकरणाचा पहिला डोस घेल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागतो. दुसरा डोस घेतल्यापासून २८ दिवसांनंतर रक्तदान करता येते. त्यामुळे लस घेतल्यापासून ५६ दिवस रक्तदान करता येत नाही. त्यामुळे लसीकरणापूर्वी रक्तदान करणे महत्त्वाचे ठरत आहे.

संकलित केलेले रक्त हे दुसऱ्या व्यक्तीस दिले जाते. त्यामुळे रक्त लागणाऱ्यावर कुठलाही परिणाम होऊ नये, म्हणून शासनाने या सूचना केल्या आहेत. ५५ वर्षांपुढील व्यक्तींचे शक्यतो रक्त घेतले जात नाही. रक्तदानासाठी जनजागृती आवश्यक आहे.

कोरोना लसीकरणाआधी मी केले रक्तदान, तुम्हीही करा...

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान म्हणून संबोधले जाते. त्यामुळे मी नियमितपणे रक्तदान करतो. दरम्यान, वैद्यकीय संस्थेतील प्राध्यापकांनी लस घेतल्यानंतर रक्तदान करता येत नाही, असे सांगितले. त्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवू नये म्हणून मी रक्तदान केले आणि त्यानंतर लस घेतली. तुम्हीही रक्तदान करुन लस घ्या, असे गगन समुखराव याने सांगितले.

ब्लड बँक प्रमुख म्हणतात...

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लस घेतल्यानंतर २८ दिवसांनी रक्तदान करणे आवश्यक आहे. त्याचा परिणाम रक्तदानावर होण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात रक्तदानाचे प्रमाण कमी असते. त्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून शासनाबरोबर सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन रक्तदानाची जनजागृती करणे आवश्यक आहे.

- डॉ. उमेश कानडे, शासकीय रक्तपेढी प्रमुख.

नव्या मार्गदर्शक सूचनांमुळे रक्तदानाचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे लसीकरणापूर्वी रक्तदान करणे गरजेेच ठरत आहे. शासनाने मोबाईल ब्लड डोनेशन व्हॅन सुरू केल्यास कुठेही ५ ते ६ जणही रक्तदान करू इच्छिणारे असतील तर तिथे जाऊन रक्तसंकलन करता येईल. शासकीय अधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

- डॉ. के. टी. दळवे, रक्तपेढी प्रमुख