शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
2
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
3
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
4
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
5
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
6
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
7
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
8
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
9
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
10
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
11
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
12
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
13
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
14
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
15
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
16
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
17
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?
18
तरुणीनं पायावर गोंधवला माता कालीचा टॅटू, व्हिडिओ बघून युजर्स भडकले, तुमचाही संताप होईल
19
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
20
"...असे जीवन जगत राहा"; 'मिसेस मुख्यमंत्र्यां'ची देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी खास पोस्ट

लस घेण्यापूर्वी करा रक्तदान, नंतर दोन महिने थांबावे लागणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:18 IST

गतवर्षी कोराेनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे राज्य शासनाने रक्तदानाचे आवाहन केले होते. त्यास जिल्ह्यात उत्स्फूर्त ...

गतवर्षी कोराेनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे राज्य शासनाने रक्तदानाचे आवाहन केले होते. त्यास जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील सहाही रक्तपेढ्यांमध्ये विपुल रक्तसाठा झाला होता. यंदा कोरोना लसीकरण सुरू झाले आहे. दरम्यान, आरोग्य विभागाने लसीचा दुसरा डोस घेतल्यापासून २८ दिवसांनंतर रक्तदान करावे, अशा मार्गदर्शन सूचना केल्या आहेत. त्याचा रक्त संकलनावर परिणाम होण्याची शक्यता रक्तपेढ्यांच्या प्रमुखांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी लसीकरणापूर्वी रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन केले आहे.

मार्च ते जून या कालावधीत तापमान वाढते. त्यामुळे सतत थकवा जाणवतो. तसेच परीक्षांचा कालावधी असतो आणि महाविद्यालयांना सुट्ट्या असतात. त्यामुळे युवकांकडून रक्तदानाचे प्रमाण कमी होते. याउलट या कालावधीत अपघात वाढतात. त्यामुळे रक्ताची अधिक गरज भासत असते. रक्तदानासाठी समाजात जनजागृतीची गरज आहे.

दुसऱ्या डोसनंतर २८ दिवसांनी करा रक्तदान...

कोरोना लसीकरणाचा पहिला डोस घेल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागतो. दुसरा डोस घेतल्यापासून २८ दिवसांनंतर रक्तदान करता येते. त्यामुळे लस घेतल्यापासून ५६ दिवस रक्तदान करता येत नाही. त्यामुळे लसीकरणापूर्वी रक्तदान करणे महत्त्वाचे ठरत आहे.

संकलित केलेले रक्त हे दुसऱ्या व्यक्तीस दिले जाते. त्यामुळे रक्त लागणाऱ्यावर कुठलाही परिणाम होऊ नये, म्हणून शासनाने या सूचना केल्या आहेत. ५५ वर्षांपुढील व्यक्तींचे शक्यतो रक्त घेतले जात नाही. रक्तदानासाठी जनजागृती आवश्यक आहे.

कोरोना लसीकरणाआधी मी केले रक्तदान, तुम्हीही करा...

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान म्हणून संबोधले जाते. त्यामुळे मी नियमितपणे रक्तदान करतो. दरम्यान, वैद्यकीय संस्थेतील प्राध्यापकांनी लस घेतल्यानंतर रक्तदान करता येत नाही, असे सांगितले. त्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवू नये म्हणून मी रक्तदान केले आणि त्यानंतर लस घेतली. तुम्हीही रक्तदान करुन लस घ्या, असे गगन समुखराव याने सांगितले.

ब्लड बँक प्रमुख म्हणतात...

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लस घेतल्यानंतर २८ दिवसांनी रक्तदान करणे आवश्यक आहे. त्याचा परिणाम रक्तदानावर होण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात रक्तदानाचे प्रमाण कमी असते. त्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून शासनाबरोबर सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन रक्तदानाची जनजागृती करणे आवश्यक आहे.

- डॉ. उमेश कानडे, शासकीय रक्तपेढी प्रमुख.

नव्या मार्गदर्शक सूचनांमुळे रक्तदानाचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे लसीकरणापूर्वी रक्तदान करणे गरजेेच ठरत आहे. शासनाने मोबाईल ब्लड डोनेशन व्हॅन सुरू केल्यास कुठेही ५ ते ६ जणही रक्तदान करू इच्छिणारे असतील तर तिथे जाऊन रक्तसंकलन करता येईल. शासकीय अधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

- डॉ. के. टी. दळवे, रक्तपेढी प्रमुख