शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

शहर युवक काँग्रेसच्यावतीने मास्क, सॅनिटाझयर वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:20 IST

दयानंद विज्ञान महाविद्यालयात सत्कार कार्यक्रम लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागातील प्रा. वैशाली चांडक, प्रा. अक्षता माने ...

दयानंद विज्ञान महाविद्यालयात सत्कार कार्यक्रम

लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागातील प्रा. वैशाली चांडक, प्रा. अक्षता माने यांनी गेट परीक्षेत यश मिळविल्याबद्दल त्यांचा व पीएच.डी. कोर्स वर्क पूर्ण केल्याबद्दल प्रा. श्वेता लोखंडे, प्रा. लहू काथवटे यांचा प्राचार्य जयप्रकाश दरगड यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. ललित ठाकरे, डॉ. युवराज सारणीकर, डॉ. अण्णाराव चौगुले, डॉ. जमन अणगुलवार, प्रा. मंगेश आवाळे, प्रा. भाग्यश्री काळे, प्रा. नवनाथ ढेकणे, डॉ. गजानन बने, डॉ. रामशेट्टी शेटकार आदींसह प्राध्यापक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

जागतिक जल दिनानिमित्त न्यायालय परिसरात उपक्रम

लातूर : जागतिक जल दिनाचे औचित्य साधून जिल्हा विधि सेवा प्राधिकरण व प्रभुराज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय परिसरात पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी येळण्या बांधण्यात आल्या. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश तिवारी, जिल्हा विधि प्राधिकरणाच्या सचिव न्या. एस. डी. कंकनवाडी, न्या. यु. के. गंगणे, मल्लिकार्जुन कलशेट्टी, बालाजी दळवी, संध्या कुलकर्णी, ज्योती चौधरी, ॲड. अजय कलशेट्टी, ॲड. सचिन पंचाक्षरी, ॲड. मीरा कुलकर्णी, ॲड. कल्पना भुरे, ॲड. किरण चिंते, ॲड. शहाबुद्दीन शेख, ॲड. फारुख शेख, ॲड. शिंदे, ॲड. देविदास बोरुळे, ॲड. सारिका वायबसे, ॲड. तृप्ती इटकरी, ॲड. हर्षदा जोशी, कैलास गरुडकर, विकास ढमाले, दगडू देशमाने, गजानन पांचाळ, बापू बेस्के आदींची उपस्थिती होती.

ऑनलाईन अभ्यासावर विद्यार्थ्यांचा भर

लातूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्ह्यात शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे शाळांच्यावतीने ऑनलाईन अभ्यासक्रम राबविला जात आहे. परीक्षा जवळ आल्या असल्याने विद्यार्थ्यांची उपस्थिती समाधानकारक आहे. ऑफलाईन वर्गांना विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने शाळा बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त

लातूर : सध्या उन्हाचा कडाका वाढला असून, दुपारच्यावेळी विजेचा लपंडाव होत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. नियमित बिल भरूनही वीज पुरवठा खंडित होत असल्याने ऐन उकाड्यात गैरसोय होत आहे. महावितरणने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.