शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

लॉकडाऊनमध्येही ३ हजार टपालांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:18 IST

चापोली : सोशल मीडियाच्या काळातही टपालाद्वारे सुख-दुःखाचा निरोप घरपोच पोहोचविण्याचे कार्य पोस्टमन करीत आहेत. कोरोनाच्या संकटाच्या काळातही हे काम ...

चापोली : सोशल मीडियाच्या काळातही टपालाद्वारे सुख-दुःखाचा निरोप घरपोच पोहोचविण्याचे कार्य पोस्टमन करीत आहेत. कोरोनाच्या संकटाच्या काळातही हे काम अविरत सुरू आहे. चापोली पोष्टाअंतर्गत दीड महिन्यात ३ हजार टपालांचे वितरण करण्यात आले आहे.

डाक विभागाची सेवा अत्यावश्यक सेवेत आहे. नातेवाइकांनी आपल्या दुसऱ्या नातेवाइकांना टपालाद्वारे पाठविलेले निरोप पोस्टमन पायाच्या टाचा झिजवित कोरोनाच्या संकटातही सुरूच आहे. गेल्या वर्षीपासून कोरोनाचे संकट सुरू आहे. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करीत टपाल कर्मचारी एकही पत्र अथवा इतर टपाल गहाळ न करता नागरिकांच्या दारापर्यंत पोहोच करीत आहेत.

चापोली पोस्ट कार्यालयाअंतर्गत एक पोस्टमन, एक पोस्ट मास्तर तसेच हिप्पळनेर व उमरगा कोर्ट येथे प्रत्येकी एक एबीएम असे ४ कर्मचारी आहेत. नागरिकांना त्यांचे महत्त्वाचे टपाल, रजिस्टर स्पीड पोस्ट, पार्सल वितरण, ज्येष्ठांचे पेन्शन घरपोच देणे, सरकारच्या विविध योजनांचे पैसे नागरिकांना घरपोच देणे तसेच औषधींही घरपोच देण्याचे काम संकटकाळातही पोस्टमन करीत आहेत.

चेहऱ्यास मास्क लावून सकाळी पोस्ट कार्यालयात आलेला पोस्टमन प्रथम सॅनिटायझर करतात. मग पोस्टात आलेल्या टपालांची क्रमवारी करण्यासाठी बीटनिहाय त्यांचे वेगवेगळे गट तयार करतात. त्यानंतर संगणकीय नोंदणी करून बीटनुसार वितरणासाठी तयार होतात. सध्या कोरोनाच्या संकटात पोस्टाकडून विंडो डिलेव्हरी सेवा सुरू आहे. आपल्या पिशवीत सॅनिटायझर बाटली ठेऊन पोस्टमन घरोघरी जाऊन टपाल वाटप करीत आहेत.

तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा...

गत दीड वर्षांपासून कोरोनाचे संकट आहे. प्रतिबंधासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र, टपाल कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून सेवा देत आहे. चाकूर तालुक्यात ३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर ते ठणठणीत बरे होऊन आपले कर्तव्य पार पाडत आहेत.

निष्ठेने कर्तव्य सुरू...

दीड वर्षापासून कोरोनाचे संकट सुरू आहे. त्यात प्रशासनाकडून कडक निर्बंध लागू करण्यात येत आहेत. कोरोनामुळे मनात भीती होती. सुरुवातीचे आणि आताचे दिवस भीतीदायक वातावरण आहेत. पण, कर्तव्य तर पार पाडावेच लागणार. कुटुंबातील सदस्यांनाही नेहमी काळजी रहायची. पण, आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावले.

- बालाजी होनराव, पोस्ट मास्टर, चापोली.

विविध प्रश्न भेडसावयाचे...

कोरोनाच्या संकटात नागरिकांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना पत्र देणे हे खरोखरच खूप कठीण होते. लोक काय म्हणतील, आपल्यावर दारात उभे करतील की नाही, ही भीती सतत मनात राहत होती; पण कोरोनाच्या संकटातही आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत आहे.

- सुखदेव जाधव, पोस्टमन