शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
2
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
3
Mumbai Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार
4
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
5
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
6
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
7
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
8
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
9
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
10
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
11
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
12
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
13
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
14
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
15
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
16
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
17
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
18
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
19
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
20
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्येही ३ हजार टपालांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:18 IST

चापोली : सोशल मीडियाच्या काळातही टपालाद्वारे सुख-दुःखाचा निरोप घरपोच पोहोचविण्याचे कार्य पोस्टमन करीत आहेत. कोरोनाच्या संकटाच्या काळातही हे काम ...

चापोली : सोशल मीडियाच्या काळातही टपालाद्वारे सुख-दुःखाचा निरोप घरपोच पोहोचविण्याचे कार्य पोस्टमन करीत आहेत. कोरोनाच्या संकटाच्या काळातही हे काम अविरत सुरू आहे. चापोली पोष्टाअंतर्गत दीड महिन्यात ३ हजार टपालांचे वितरण करण्यात आले आहे.

डाक विभागाची सेवा अत्यावश्यक सेवेत आहे. नातेवाइकांनी आपल्या दुसऱ्या नातेवाइकांना टपालाद्वारे पाठविलेले निरोप पोस्टमन पायाच्या टाचा झिजवित कोरोनाच्या संकटातही सुरूच आहे. गेल्या वर्षीपासून कोरोनाचे संकट सुरू आहे. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करीत टपाल कर्मचारी एकही पत्र अथवा इतर टपाल गहाळ न करता नागरिकांच्या दारापर्यंत पोहोच करीत आहेत.

चापोली पोस्ट कार्यालयाअंतर्गत एक पोस्टमन, एक पोस्ट मास्तर तसेच हिप्पळनेर व उमरगा कोर्ट येथे प्रत्येकी एक एबीएम असे ४ कर्मचारी आहेत. नागरिकांना त्यांचे महत्त्वाचे टपाल, रजिस्टर स्पीड पोस्ट, पार्सल वितरण, ज्येष्ठांचे पेन्शन घरपोच देणे, सरकारच्या विविध योजनांचे पैसे नागरिकांना घरपोच देणे तसेच औषधींही घरपोच देण्याचे काम संकटकाळातही पोस्टमन करीत आहेत.

चेहऱ्यास मास्क लावून सकाळी पोस्ट कार्यालयात आलेला पोस्टमन प्रथम सॅनिटायझर करतात. मग पोस्टात आलेल्या टपालांची क्रमवारी करण्यासाठी बीटनिहाय त्यांचे वेगवेगळे गट तयार करतात. त्यानंतर संगणकीय नोंदणी करून बीटनुसार वितरणासाठी तयार होतात. सध्या कोरोनाच्या संकटात पोस्टाकडून विंडो डिलेव्हरी सेवा सुरू आहे. आपल्या पिशवीत सॅनिटायझर बाटली ठेऊन पोस्टमन घरोघरी जाऊन टपाल वाटप करीत आहेत.

तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा...

गत दीड वर्षांपासून कोरोनाचे संकट आहे. प्रतिबंधासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र, टपाल कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून सेवा देत आहे. चाकूर तालुक्यात ३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर ते ठणठणीत बरे होऊन आपले कर्तव्य पार पाडत आहेत.

निष्ठेने कर्तव्य सुरू...

दीड वर्षापासून कोरोनाचे संकट सुरू आहे. त्यात प्रशासनाकडून कडक निर्बंध लागू करण्यात येत आहेत. कोरोनामुळे मनात भीती होती. सुरुवातीचे आणि आताचे दिवस भीतीदायक वातावरण आहेत. पण, कर्तव्य तर पार पाडावेच लागणार. कुटुंबातील सदस्यांनाही नेहमी काळजी रहायची. पण, आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावले.

- बालाजी होनराव, पोस्ट मास्टर, चापोली.

विविध प्रश्न भेडसावयाचे...

कोरोनाच्या संकटात नागरिकांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना पत्र देणे हे खरोखरच खूप कठीण होते. लोक काय म्हणतील, आपल्यावर दारात उभे करतील की नाही, ही भीती सतत मनात राहत होती; पण कोरोनाच्या संकटातही आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत आहे.

- सुखदेव जाधव, पोस्टमन