शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

वीज कनेक्शन तोडल्यामुळे पाणी पुरवठ्यात व्यत्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:15 IST

लातूर : लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पावरील वीजबिलासाठी कनेक्शन तोडल्यामुळे शहराच्या पाणी पुरवठ्यात व्यत्यय आला होता. दरम्यान, ...

लातूर : लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पावरील वीजबिलासाठी कनेक्शन तोडल्यामुळे शहराच्या पाणी पुरवठ्यात व्यत्यय आला होता. दरम्यान, तीन महिन्यांचे बिल भरल्यानंतर वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला असून, रविवारी दुपारनंतर शहराचा पाणी पुरवठा सुरू करण्यात आला असल्याची माहिती मनपाच्या पाणी पुरवठा विभागातून देण्यात आली. मांजरा प्रकल्पावरील वीज पुरवठ्याचे १ कोटी ९२ लाखांचे बिल थकले होते. त्यामुळे महावितरणने वीज पुरवठा खंडित केला होता.

दरम्यान, रविवारी सकाळी लातूर मनपाने मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांचे वीजबिल भरणा केल्यानंतर महावितरणने वीज पुरवठा पूर्ववत केला. त्यानंतर लातूर शहराला पाणी पुरवठा सुरू झाला. राजधानी, महात्मा बसवेश्वर चौक आणि शासकीय कॉलनी येथील जलकुंभावरून पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. वीजबिल थकल्यामुळे यापूर्वी दोनवेळा शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. परंतु, गेल्या तीन दिवसांपासून वीजबिलामुळेच पाणी पुरवठा बंद होता. धनेगाव, हरंगुळ आणि आर्वी येथील वीजबिल थकले आहे. धनेगाव येथील वीज पुरवठा सुरळीत झाला असून, हरंगुळ व आर्वी येथील वीजबिलाबाबत महावितरणने मनपाला वीजबिल भरण्यासंदर्भात नोटीस पाठवली असल्याचेही सांगण्यात आले.

तीन दिवसांपासून पाणी पुरवठा होता ठप्प

लातूर शहराचा पाणी पुरवठा गेल्या तीन दिवसांपासून ठप्प होता. ज्या भागामध्ये शुक्रवारी पाणी येणार होते, त्या भागामध्ये आता तीन दिवसांनंतर उशिरा पाणी येणार आहे. सध्या शासकीय कॉलनी, महात्मा बसवेश्वर चौक आणि राजधानी जलकुंभावरून पाणी पुरवठा सुरू झालेला आहे. पहिल्या टप्प्यातील हा पाणी पुरवठा रविवारी पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात सोमवारी अन्य जलकुंभांवरून पाणी सोडले जाणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाचे अभियंता कलवले यांनी सांगितले.