शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

दिलीप नागरगोजे यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:17 IST

मुक्तांगण इंग्लिश स्कुलमध्ये जयंती साजरी लातूर : विशालनगर परिसरातील मुक्तांगण इंग्लिश स्कुलमध्ये राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती ...

मुक्तांगण इंग्लिश स्कुलमध्ये जयंती साजरी

लातूर : विशालनगर परिसरातील मुक्तांगण इंग्लिश स्कुलमध्ये राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी श्रीकृष्ण लाटे, कविता लाटे, प्राचार्या सुमेरा शेख, अश्विनी केंद्रे यांची उपस्थिती होती. प्राचार्या सुमेरा शेख यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली.

रस्ता सुरक्षा जीवन सुरक्षा अभियान

लातूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने सोमवारपासून पाच आगारात रस्ता सुरक्षा जीवन रक्षा अभियान राबविले जाणार आहे. या अभियानात रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने मार्गदर्शन केले जाणार आहे. लातुर विभागात औसा, निलंगा, उदगीर, लातुर आणि अहमदपूर अशी पाच आगार आहेत. तसेच जनजागृतीसाठी प्रत्येक आगारात बॅनर लावण्यात येणार असल्याचे लातुर विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

ग्रंथ देऊन करण्यात आला सत्कार

लातूर : पालकमंत्री अमित देशमुख यांचा ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, पृथ्वीराज शिरसाठ, हरीरराम कुलकर्णी, राजकुमार जाधव, ऍड. बाबासाहेब गायकवाड, राजकुमार पाटील, ऍड. दीपक सुळ, रविशंकर जाधव, सचिन बंडापल्ले आदींसह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

आरोग्य विभागाच्या वतीने चाचण्यांवर भर

लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, आरोग्य विभागाच्या वतीने प्रयोगशाळेतील चाचण्या आणि रॅपिड अँटीजन चाचण्यावर अधिक भर दिला जात आहे. दररोज दीड हजार व्यक्तींच्या चाचण्या केल्या जात आहेत. तसेच बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची तपासणी केली जात आहे. मनपाच्या वतीने विविध सेंटरवर रॅपिड अँटीजन चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत.

एसटी बसच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी

लातूर : कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करीत शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. ग्रामीण भागातुन शहर तसेच तालुकास्तरावर विद्यार्थी अपडाऊन करतात. मात्र, बसेसच्या फेऱ्या कमी असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. एसटी बसच्या फेऱ्या वाढविल्यास विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने बसच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधून होत आहे.

महापालिकेच्या वतीने कचऱ्याचे संकलन

लातूर : शहर महापालिकेच्या वतीने रस्त्याच्या कडेला टाकलेला कचरा संकलन करण्याची मोहीम राबविली जात आहे. त्याअंतर्गत स्वतंत्र घंटागाडी नियुक्त करण्यात आली आहे. शहरातील गांधी चौक, बार्शी रोड, औसा रोड, रेणापूर नाका आदी रस्त्यावर नियमित कचरा संकलित केला जात आहे. तसेच रस्त्याची स्वछता मोहीम राबविली जात आहे.

पाच नंबर बसविले चौकात बॅरिकेट्स

लातूर : एमआयडीसी परिसरातील पाच नंबर चौकात अवजड वाहनाची रेलचेल असते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असते. परिणामी, दुचाकी चालकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असते. यावर पर्याय म्हणून पाच नंबर चौकात बॅरिकेट्स बसविण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी दूर होण्यास मदत होत असल्याचे चित्र आहे.

तेलबियांच्या पेरणी क्षेत्रात झाली वाढ

लातूर : जिल्ह्यात सोयाबीनसह तेलबियांच्या उत्पादनात वाढ होत असल्याचे चित्र आहे. गत खरीप हंगामात ४ लाख ५० हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला होता. यंदाच्या रब्बी हंगामातही करडई, जवस, सूर्यफुल आदी तेलबियांच्या पेरणीत वाढ झाली आहे. कृषी विभागाच्या तेलबियाच्या फवारणीबाबत मार्गदर्शन केले जात आहे. तसेच उत्पादन वाढीसाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याचे सांगण्यात आले.

मुबलक पाण्यामुळे बांधकामांना वेग

लातूर : यंदा चांगला पाऊस झाला असल्याने जलस्रोतांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे लातुर शहरासह ग्रामीण भागात बांधकामांना वेग आला आहे. लॉकडाऊन काळात अनेक बांधकामे मजुराअभावी रखडली होती. आता परिस्थिती पूर्वपदावर आली असून, बांधकामांना वेग आला आहे. शहरात आबेक नागरिकांनी मनपाची परवानगी घेत बांधकामे सुरू केली आहेत.

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांची कसरत

लातुर : तालुक्यातील जेवळी, बसवंतपुरकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तसेच पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे. नादुरुस्त रस्त्याची तात्काळ डागडुजी करावी, अशी मागणी जेवळी आणि बसवंतपुर येथील नागरिकांमधून होत आहे.

शहरातील बाजारात भाजीपाल्याची आवक

लातूर : शहरातील बाजारात भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, दरात काही प्रमाणात घट झाली असल्याचे चित्र आहेत. सध्या मिरची, लसूण, गवार, टोमॅटो, शेपू, मेथी, पालक, कोबी आदी भाज्यांची आवक होत आहे. तसेच फळबाजारात सफरचंद, केळी, चिकू, मोसंबी, संत्री आदी फळांची आवक होत आहे.

अतिवृष्टीच्या मदतीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

लातूर : जिल्ह्यात गतवर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते. शासनाच्या वतीने पहिल्या टप्यातील अनुदान वितरित करण्यात आले. तर दुसऱ्या टप्यातील अनुदान जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केले आहे. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीमुळे अनुदान वाटप रखडले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना तात्काळ अतिवृष्टीचे वाटप करण्याची मागणी ग्रामीण भागातून होत आहे.

बसस्थानक परिसरात स्वच्छतेची मागणी

लातूर : शहरातील मध्यवर्ती आणि रेणापूर नाका परिसरातील बसस्थानाक परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे प्रवाश्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. स्वच्छतागृहाची नियमित सफाई होत नसल्याची ओरड आहे. याकडे एसटी महामंडळ प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.