शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात रोहयोच्या कामांना मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:17 IST

टंचाई निवारणासाठी कृती आराखडा लातूर : जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी पाणीपुरवठा विभागाच्या कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याअंतर्गत ...

टंचाई निवारणासाठी कृती आराखडा

लातूर : जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी पाणीपुरवठा विभागाच्या कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याअंतर्गत नवीन विंधन विहीर घेणे, विहीर, विंधन विहिरीचे अधिग्रहण करणे, टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, गाळ काढणे, प्रगतिपथावरील नळयोजनेची दुरुस्ती करणे, नवीन नळ योजना राबविणे आदी उपाययोजना राबविल्या जाणार आहे. ज्या गावात पाणीटंचाई आहे त्या ग्रामपंचायतीला पंचायत समिती स्तरावर प्रस्ताव सादर करावे लागणार असल्याचे टंचाई निवारण कक्षाच्या वतीने सांगण्यात आले.

जेवळी रस्त्याची दुरवस्था ; वाहनधारक त्रस्त

लातूर : तालुक्यातील जेवळी ते लातूर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त आहेत. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांच्या वतीने संबंधित विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

नवीन बांधकामांना आला वेग

लातूर : शहरासह नजीकच्या वसाहतीमध्ये नवीन बांधकामांना वेग आला आहे. हरंगूळ नाविम वसाहत परिसरात जलस्रोतांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने बांधकामे वेगात सुरू आहेत. लॉकडाऊनपासून अनेकांनी आपल्या प्लॉटवर बांधकाम करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बांधकामावर काम करणाऱ्या मजुरांच्या हाताला काम उपलब्ध झाले आहे.

मोकळ्या प्लॉटवर कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले

लातूर : शहरातील खाडगाव रोड परिसरात मोकळ्या प्लॉटवर कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. या परिसरात नियमित घंटागाडी येत नसल्याची नागरिकांची ओरड आहे. अनेकजण घंटागाडी नियमित येत नसल्याने रस्त्याच्या कडेला, मोकळ्या प्लॉटवर कचरा टाकत आहे. याकडे शहर महापालिकेच्या स्वच्छता विभागाने लक्ष देऊन, नियमित घंटागाडी सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

बंद असलेले सिग्नल सुरू करण्याची मागणी

लातूर : शहरातील काही चौकातील सिग्नल बंद आहेत. त्यामुळे वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सध्या लातूर जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली असल्याने अनेकजण सायंकाळी खरेदीसाठी बाहेर पडतात. मात्र, सिग्नल वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागत आहे. शहर वाहतूक शाखेने बंद असलेले सिग्नल तात्काळ सुरू करावेत, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.