शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

जिल्ह्यात रोहयोच्या कामांना मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:17 IST

टंचाई निवारणासाठी कृती आराखडा लातूर : जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी पाणीपुरवठा विभागाच्या कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याअंतर्गत ...

टंचाई निवारणासाठी कृती आराखडा

लातूर : जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी पाणीपुरवठा विभागाच्या कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याअंतर्गत नवीन विंधन विहीर घेणे, विहीर, विंधन विहिरीचे अधिग्रहण करणे, टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, गाळ काढणे, प्रगतिपथावरील नळयोजनेची दुरुस्ती करणे, नवीन नळ योजना राबविणे आदी उपाययोजना राबविल्या जाणार आहे. ज्या गावात पाणीटंचाई आहे त्या ग्रामपंचायतीला पंचायत समिती स्तरावर प्रस्ताव सादर करावे लागणार असल्याचे टंचाई निवारण कक्षाच्या वतीने सांगण्यात आले.

जेवळी रस्त्याची दुरवस्था ; वाहनधारक त्रस्त

लातूर : तालुक्यातील जेवळी ते लातूर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त आहेत. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांच्या वतीने संबंधित विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

नवीन बांधकामांना आला वेग

लातूर : शहरासह नजीकच्या वसाहतीमध्ये नवीन बांधकामांना वेग आला आहे. हरंगूळ नाविम वसाहत परिसरात जलस्रोतांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने बांधकामे वेगात सुरू आहेत. लॉकडाऊनपासून अनेकांनी आपल्या प्लॉटवर बांधकाम करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बांधकामावर काम करणाऱ्या मजुरांच्या हाताला काम उपलब्ध झाले आहे.

मोकळ्या प्लॉटवर कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले

लातूर : शहरातील खाडगाव रोड परिसरात मोकळ्या प्लॉटवर कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. या परिसरात नियमित घंटागाडी येत नसल्याची नागरिकांची ओरड आहे. अनेकजण घंटागाडी नियमित येत नसल्याने रस्त्याच्या कडेला, मोकळ्या प्लॉटवर कचरा टाकत आहे. याकडे शहर महापालिकेच्या स्वच्छता विभागाने लक्ष देऊन, नियमित घंटागाडी सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

बंद असलेले सिग्नल सुरू करण्याची मागणी

लातूर : शहरातील काही चौकातील सिग्नल बंद आहेत. त्यामुळे वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सध्या लातूर जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली असल्याने अनेकजण सायंकाळी खरेदीसाठी बाहेर पडतात. मात्र, सिग्नल वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागत आहे. शहर वाहतूक शाखेने बंद असलेले सिग्नल तात्काळ सुरू करावेत, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.