शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; औसा-सोलापूर मार्गावर शिवसेनेचा रास्ता रोको

By संदीप शिंदे | Updated: September 27, 2023 18:52 IST

पावसाळा हंगाम संपत आला तरीही नदी, नाले, पाण्याचे स्त्रोत कोरडेच आहेत.

औसा : मराठवाड्यात पावसाने पाठ फिरविली असून, खरीपातील पिके हातची गेली आहेत. त्यामुळे दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी, २५ टक्के पिकविमा अग्रीम देण्यात यावा, या मागणीसाठी औसा-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील साई चौकात शिवसेनेच्या वतीने बुधवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

पावसाळा हंगाम संपत आला तरीही नदी, नाले, पाण्याचे स्त्रोत कोरडेच आहेत. पावसाची उघडीप असल्याने खरीपातील पिके हातची गेली आहेत. त्यामुळे वर्ष कसे काढणार असा शेतकऱ्यांसमोर प्रश्न आहे. शेतकऱ्यांना मदत देण्याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी ५० हजारांची मदत करावी, २५ टक्के आग्रीम द्यावा, शेतीसाठी आठ तास वीजपुरवठा करावा, चारा छावण्या उभाराव्यात आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलनात माजी आ. दिनकरराव माने, जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने, बजरंग जाधव, जयश्री उटगे, श्रीपाद कुलकर्णी, तानाजी सुरवसे, संजय उजळंबे, सचिन पवार आदींसह पदाधिकारी सहभागी होते.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरी