शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

कर्जमुक्ती मिळालेले शेतकरी नवीन पीक कर्जापासून वंचित; बँकांची मात्र उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:20 IST

लातूर : शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविली. या अंतर्गत जिल्ह्यात ५६ हजार ९४६ शेतकऱ्यांना ३३५ कोटी ...

लातूर : शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविली. या अंतर्गत जिल्ह्यात ५६ हजार ९४६ शेतकऱ्यांना ३३५ कोटी ४० लाखांची कर्जमाफी मिळाली आहे. परंतु, यातील बहुतांश शेतकरी योजनेचा लाभ मिळूनही पीक कर्जापासून वंचित आहेत.

कर्ज पुरवठा करण्याचे आदेश असतानाही राष्ट्रीयीकृत बँकांच्या उदासिनतेमुळे अनेक शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत. अनेकांचे बँक व्यवहार नियमित असतानाही कर्ज मिळाले नसल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे. जिल्ह्यात केवळ ५२ टक्क्यांपर्यंत कर्ज वाटप होत असल्याचे चित्र आहे.

कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाला. मात्र नवीन पीक कर्ज काही मिळाले नाही. खरीप गेला, आता रबी आला. बँकांच्या उदासीनतेमुळे कर्ज मिळत नाही.

- शेतकरी

कर्जमाफी झाल्यानंतर बँकेकडून बेबाकी घेतली. लगेच नवीन कर्जासाठी प्रस्ताव सादर केला. कागदपत्र पूर्ण असल्याने कर्ज मंजूर झाले.

- शेतकरी

कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना बँकांनी कर्ज पुरवठा करण्याचे आदेश आहेत. त्यानुसार अनेकांना पीक कर्ज उपलब्ध झाले आहे. ज्या शेतकऱ्यांना कर्ज मिळाले नाही, त्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यानुसार संबंधित बँकांना सूचना केल्या जात आहेत. उद्दिष्टपूर्ती करण्यासाठीही बँकांना वेळोवेळी सूचना केल्या जातात.

- समृत जाधव,

जिल्हा उपनिबंधक, लातूर