शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, रुग्णवाहिका बनल्या शोभेच्या वस्तू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 00:17 IST

औसा तालुक्यातील किल्लारी येथील ग्रामीण रुग्णालयात दोन रूग्णवाहिका उभ्या असूनसुद्धा केवळ चालक नसल्याने अपघातातील एका गंभीर जखमी रुग्णास खासगी वाहनाने लातूरला घेऊन जात असताना वाटेतच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली.

किल्लारी : औसा तालुक्यातील किल्लारी येथील ग्रामीण रुग्णालयात दोन रुग्णवाहिका उभ्या असूनसुद्धा केवळ चालक नसल्याने अपघातातील एका गंभीर जखमी रुग्णास खासगी वाहनाने लातूरला घेऊन जात असताना वाटेतच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. किल्लारीजवळील पेट्रोलपंपानजीक दोन दुचाकीचा अपघात सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास झाला होता. या प्रकरणी किल्लारी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.गंभीर जखमी झालेल्या अभिषेक अनिल कोहाळे याच्यावर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून लातूरला रेफर करण्यात आले होते. या ठिकाणी १०८ व १०२ अशा दोन रूग्णवाहिका असतानाही चालक नसल्याने खासगी वाहनाने लातूरला हलविण्यात आले. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. किल्लारी येथील उमरगा रोडवरील एका पेट्रोलपंपाजवळ दोन दुचाकीचा अपघात झाला. दुचाकी एमएच २४ एके ८३९ वर गुलाब व्यंकट पवार व अभिषेक अनिल कोहाळे हे किल्लारीपाटी जात होते. तर एमएच १३ एआर ४८२३ वर महादेव गिरी, महानंदा गिरी दोघे जण मुदगड एकोजीकडे जात असताना सुधीर बिराजदार यांच्या शेतानजीक अपघात झाला. यात गंभीर जखमी झालेल्या अभिषेक अनिल कोव्हाळे यांना ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून लातूरला रेफर करण्यात आले. मात्र, वाटेत मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी किल्लारी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा नोंद करण्यात आली आहे.चालक नसल्याने गैरसोयवैद्यकीय अधीक्षक डॉ. पाटील म्हणाल्या, कायमस्वरूपी चालक नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. १०८ रुग्णवाहिकेचे डॉ. प्रकाश शेलार म्हणाले, तांत्रिक अडचणीमुळे रुग्णवाहिका बंद आहे. डॉक्टर कमी असल्याने अडचण आहे. डॉक्टरची रिक्त जागा लवकरच भरण्यात येणार आहे.

टॅग्स :laturलातूरAccidentअपघात