शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

उदगीर बाजार समितीत दहा दिवसांनंतर सौदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:15 IST

उदगीर : केंद्र सरकारने डाळीच्या किमती वाढत असल्याचे सांगत व्यापाऱ्यांना साठा मर्यादेचे निर्बंध लागू केले आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे ...

उदगीर : केंद्र सरकारने डाळीच्या किमती वाढत असल्याचे सांगत व्यापाऱ्यांना साठा मर्यादेचे निर्बंध लागू केले आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे राज्यातील बाजार समितीअंतर्गत व्यवहार करणाऱ्या कडधान्य व्यापाऱ्यांनी धान्य खरेदी बंद केली होती. दरम्यान, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी शासन निर्णय मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केल्याने अखेर व्यापाऱ्यांनी बंद मागे घेतला. त्यामुळे दहा दिवसांपासून बंद असलेला आडत बाजार बुधवारी सुरू झाला.

केंद्र सरकारने २ जुलैपासून व्यापाऱ्यांना शेतीमालाच्या कडधान्य साठवणुकीवर मर्यादा आणली आहे. कडधान्याची सर्वांत मोठी उलाढाल मराठवाड्यात लातूरनंतर उदगिरात होते. कच्च्या शेतमालाच्या उपलब्धतेमुळे उदगीर परिसरात ४० पेक्षा जास्त डाळीचे कारखाने आहेत. येथून देशाच्या कानाकोपऱ्यांत डाळीची विक्री होते. परंतु, केंद्राच्या नव्या निर्णयास विरोध दर्शवित राज्यातील बाजार समित्यांतील व्यापाऱ्यांनी हा अध्यादेश त्वरित मागे घ्यावा या मागणीसाठी व्यवहार बंद ठेवले होते.

दरम्यान, मंगळवारी मुंबईत राज्यातील विविध व्यापारी संघटनाचे पदाधिकारी व केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यात चर्चा झाली. अध्यादेश मागे घेणार नसल्याचे सांगितल्यामुळे व्यापाऱ्यांनी बंद मागे घेत असल्याचे सांगितले.

दुसऱ्या लॉकडाऊनच्या काळात डाळीचे दर किरकोळ बाजारात वाढले होते. त्यामुळे ग्राहकांतून संताप व्यक्त होत होता. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर व डाळीचे कारखाने सुरू झाल्यामुळे दर स्थिर आहेत. परंतु, केंद्र सरकारने २ जुलैला डाळवर्गीय धान्यात मोडणाऱ्या मूग वगळता तूर, उडीद, मसूर, हरभरा, आदी धान्याच्या साठवणुकीवर मर्यादा लागू केली आहे.

केंद्राच्या निर्णयाचा व्यापारावर परिणाम...

केंद्र सरकारने व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता साठा मर्यादा अध्यादेश काढला. ३० दिवसांच्या आत ज्यांच्याकडे अतिरिक्त साठा आहे, त्यांनी तो शेतमाल विक्री करावा, असे आदेश काढल्यामुळे व्यापाऱ्यांत खळबळ उडाली. या आदेशामुळे व्यापारी व शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. हा अध्यादेश मागे घ्यावा, म्हणून राज्यातील सर्व बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी खरेदी बंद ठेवली होती. दरम्यान, केंद्रीय मंत्र्यांनी अध्यादेश मागे घेण्यात येणार नसल्याचे सांगितल्यामुळे व्यापारी हतबल होत बंद मागे घेतल्याचे सांगितले. त्यामुळे आगामी काही दिवसांत उदगिरातील काही डाळीचे कारखाने शासनाच्या या निर्णयामुळे बंद पडतील, अशी भीती दालमिल असोसिएशनचे अध्यक्ष सुदर्शन मुंडे यांनी व्यक्त केली.