शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
5
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
6
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
7
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
8
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
9
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
10
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
11
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
12
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
13
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
14
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
15
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
17
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
18
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
19
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
20
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

काेरोनामुळे अंध व्यक्तींसमोर अंधार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:16 IST

जिल्ह्यात जवळपास २ हजार २०० अंध व्यक्तींची नोंदणी आहे. अनेकजण उद्योग, व्यवसाय करीत आपली उपजीविका भागवितात. मात्र, गेल्या दीड ...

जिल्ह्यात जवळपास २ हजार २०० अंध व्यक्तींची नोंदणी आहे. अनेकजण उद्योग, व्यवसाय करीत आपली उपजीविका भागवितात. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे अनेक व्यवसाय संकटात आले आहेत. परिणामी, अंध व्यक्तीच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. शासनाने इतर घटकांना मदत केली आहे. मात्र, अंध व्यक्तींना कोणत्याच प्रकारची मदत करण्यात आलेली नाही. कोरोनाच्या या संकटकाळात काही अंध व्यक्तींना कोरोनाची लागण झाली यामध्ये यशस्वी उपचारानंतर बरेही झालेत. मात्र, लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे अंध व्यक्तींवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यांना शासनाने तात्काळ मदत करावी, अशी मागणी होत आहे.

आधार ही एकमेकांचाच...

कोरोनाच्या संकटापूर्वी नियमित हाताला काम मिळत होते. त्यामधून कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून हाताला काम नसल्याने आर्थिक संकट ओढवले आहे. शासनाने तात्काळ मदत करण्याची गरज आहे. - संदीप चोपडे, लातूर

कोरोनामुळे काम बंद आहे. हाताला काम नाही. मदत कोणाकडे मागणार. शासनाने इतर घटकांना ज्याप्रमाणे मदत केली त्याचप्रमाणे अंध व्यक्तींना मदत करण्याची गरज आहे. - मीरा चोपडे, लातूर

मी स्वत: गायक असल्याने गायनाचे कार्यक्रम करायचो. त्यातून आर्थिक उत्पन्न मिळत होते. मात्र, दीड वर्षांपासून सर्वच बाबींवर निर्बंध आले आहेत. परिणामी, गायनाचे कार्यक्रम झालेले नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा हा प्रश्न आहे. - जगन्नाथ जगताप, लातूर

कोरोना काळात मदतीची अपेक्षा...

जिल्ह्यात ५ ते ७ अंध व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली होती. यातील सर्वांनीच कोरोनावर यशस्वी मात केली आहे. कोरोनामुळे हाताला काम नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीत भर पडत आहे. त्यामुळे शासनाने अंध व्यक्तींना मदत करण्याची मागणी जिल्ह्यातील नागरिकांमधून होत आहे.

कोट...

शासनाने कोरोनाच्या संकटकाळात प्रत्येक घटकाला आर्थिक मदत केली आहे. मात्र, अंध बांधव मदतीपासून वंचित आहेत. संचारबंदीमुळे व्यवसायावर संकट आले आहेत. अनेक जण गायन, संगीत, तबलावादन यासारखे वर्ग घेऊन आपली उपजीविका भागवित असत. मात्र, सर्वच बाबीं बंद असल्याने आर्थिक स्त्रोत बंद झाले आहेत. त्यामुळे शासनाने अंध बांधवांची दखल घेत त्यांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी जिल्ह्यातील अंध बांधवांमधून होत आहे.