शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

सततच्या पावसाने टोमॅटोचे नुकसान, शेतकरी हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 11:15 IST

एका एकरात बाराशे ते दीड हजार कॅरेटपर्यंत टोमॅटोचे उत्पादन मिळत असे़. परंतु सततच्या पावसामुळे आता एकरी केवळ ३०० ते ४०० कॅरेट टोमॅटो निघत आहेत. त्यामुळे लागवडीसाठीचा खर्चही निघत नाही. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे वारंवार फवारणी करावी लागत आहे, असे टोमॅटो उत्पादक यांनी सांगितले़

किनगाव : सततच्या पावसामुळे रोगाचा प्रादुर्भाव होऊन रोपांना लगडलेले टोमॅटो गळू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे़. एका शेतकऱ्याने टोमॅटो लागवड करुन आतापर्यंत ६० हजारांचा खर्च केला़. मात्र, पदरी केवळ २० हजारांचेच उत्पादन पडले आहे़. परिणामी, भाजीपाला उत्पादक संकटात सापडले आहेत़.

अहमदपूर तालुक्यातील किनगाव व परिसरातील शेतकरी खरीप हंगामातील पिकांपेक्षा भाजीपाला उत्पादनावर अधिक भर देतात़. किनगाव मंडळात जवळपास ७० ते ८० हेक्टरवर टोमॅटोची लागवड केली जाते़. मात्र, वातावरणात बदल होऊन सततच्या पावसामुळे टोमॅटोवर करपा व अन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे़. त्यामुळे टोमॅटो रोपांची मुळे नासत असून रोपे उन्मळून पडत आहे. त्याचबरोबर रोपांना लागलेले टोमॅटोही गळून पडत आहेत़

एका एकरात बाराशे ते दीड हजार कॅरेटपर्यंत टोमॅटोचे उत्पादन मिळत असे़. परंतु सततच्या पावसामुळे आता एकरी केवळ ३०० ते ४०० कॅरेट टोमॅटो निघत आहेत. त्यामुळे लागवडीसाठीचा खर्चही निघत नाही. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे वारंवार फवारणी करावी लागत आहे, असे टोमॅटो उत्पादक बालाजी पवार यांनी सांगितले़

सततचा पाऊस, सूर्यप्रकाशाचा अभाव व वातावरणातील आर्द्रतेत वाढ झाल्याने बुरशीचा प्रादुर्भाव वाढला आहे़. शेतकऱ्यांनी शेतातील पाण्याचा निचरा होईल, अशी सोय करावी़, बुरशीनाशक व कीटकनाशकाची फवारणी करावी, असा सल्ला कृषी पर्यवेक्षक एस. बी. तांदळे यांनी दिला़

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीlaturलातूर