शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

सततच्या पावसाने टोमॅटोचे नुकसान, शेतकरी हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 11:15 IST

एका एकरात बाराशे ते दीड हजार कॅरेटपर्यंत टोमॅटोचे उत्पादन मिळत असे़. परंतु सततच्या पावसामुळे आता एकरी केवळ ३०० ते ४०० कॅरेट टोमॅटो निघत आहेत. त्यामुळे लागवडीसाठीचा खर्चही निघत नाही. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे वारंवार फवारणी करावी लागत आहे, असे टोमॅटो उत्पादक यांनी सांगितले़

किनगाव : सततच्या पावसामुळे रोगाचा प्रादुर्भाव होऊन रोपांना लगडलेले टोमॅटो गळू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे़. एका शेतकऱ्याने टोमॅटो लागवड करुन आतापर्यंत ६० हजारांचा खर्च केला़. मात्र, पदरी केवळ २० हजारांचेच उत्पादन पडले आहे़. परिणामी, भाजीपाला उत्पादक संकटात सापडले आहेत़.

अहमदपूर तालुक्यातील किनगाव व परिसरातील शेतकरी खरीप हंगामातील पिकांपेक्षा भाजीपाला उत्पादनावर अधिक भर देतात़. किनगाव मंडळात जवळपास ७० ते ८० हेक्टरवर टोमॅटोची लागवड केली जाते़. मात्र, वातावरणात बदल होऊन सततच्या पावसामुळे टोमॅटोवर करपा व अन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे़. त्यामुळे टोमॅटो रोपांची मुळे नासत असून रोपे उन्मळून पडत आहे. त्याचबरोबर रोपांना लागलेले टोमॅटोही गळून पडत आहेत़

एका एकरात बाराशे ते दीड हजार कॅरेटपर्यंत टोमॅटोचे उत्पादन मिळत असे़. परंतु सततच्या पावसामुळे आता एकरी केवळ ३०० ते ४०० कॅरेट टोमॅटो निघत आहेत. त्यामुळे लागवडीसाठीचा खर्चही निघत नाही. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे वारंवार फवारणी करावी लागत आहे, असे टोमॅटो उत्पादक बालाजी पवार यांनी सांगितले़

सततचा पाऊस, सूर्यप्रकाशाचा अभाव व वातावरणातील आर्द्रतेत वाढ झाल्याने बुरशीचा प्रादुर्भाव वाढला आहे़. शेतकऱ्यांनी शेतातील पाण्याचा निचरा होईल, अशी सोय करावी़, बुरशीनाशक व कीटकनाशकाची फवारणी करावी, असा सल्ला कृषी पर्यवेक्षक एस. बी. तांदळे यांनी दिला़

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीlaturलातूर