शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने १२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान !

By संदीप शिंदे | Updated: March 20, 2023 16:31 IST

रबीतील पिकांसह फळबाग, भाजीपाल्यांना फटका

लातूर : जिल्ह्यातील अनेक भागात शुक्रवार व शनिवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीटीने झोडपून काढले. यात मोठ्या प्रमाणावर रबी हंगामातील पिके, फळबाग, भाजीपाल्यांचे नुकसान झाले. प्रशासनाकडून नुकसानीची पंचनामे करण्याचे काम वेगाने सुरु आहे. दरम्यान, आतापर्यंत ११ हजार ७९४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, पंचनाम्यानंतर अंतिम नुकसानीची स्थिती समोर येणार आहे.

जिल्ह्यातील अनेक भागात मागील दोन दिवस अवकाळी पाऊस व गारपीटीने रबी हंगामील गहू, ज्वारी, हरभरा, करडईसह आंबा, द्राक्षे, पपई, टरबूज, खरबूज यासह भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याशिवाय, या पावसात वीज पडून एका शेतकऱ्याचा तर ८ पशूधनाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या होत्या. तसेच त्यांनी प्रत्यक्ष रेणापूर व चाकूर तालुक्यात शेतावर जाऊन नुकसानीची पाहणी केली होती. जिल्हा प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम गतीने सुरु आहेत. दरम्यान, आतापर्यंत प्राथमिक अंदाजानुसार ११ हजार ७९४ हेेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाकडे आहे. यात जिरायत शेतीची १० हजार १३२ हेक्टर, बागायतीचे १ हजार २३३ तर ४२८ हेक्टरवरील फळपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज आहे.अवकाळी पावसात चाकूर तालुक्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर चाकूर तालुक्यात ३, देवणी १, निलंगा तालुक्यात ४ पशुधन दगावली आहेत.

निलंगा तालुक्यात सर्वाधिक नुकसान...अवकाळी पाऊस व गारपीने निलंगा तालुक्यात सर्वाधिक ४ हजार ८१५ हेक्टरवरील पिके, फळबागांचे नुकसान झाले आहे. तर औसा तालुक्यात आतापर्यंत प्राथमिक अंदाजानुसार काहीच नुकसान झालेली नसल्याची नोंद आहे. जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात ७० हेक्टर, चाकूर १७५ हेक्टर, देवणी २३३४, जळकोट २५, लातूर ८१५, रेणापूर ३१३७, उदगीर २२३ आणि शिरुर अनंताळ तालुक्यात २०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

संपकाळतही कर्मचारी पंचनाम्यासाठी शेतावर...जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी १४ मार्चपासून बेमुदत संपावर आहेत. मात्र, जिल्ह्यात शुक्रवार व शनिवारी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी पंचनाम्यासाठी जिल्हा प्रशासनला सहकार्य करण्याची भूमिका घेऊन शेतावर पाेहचले आहेत. नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम गतीने सुरु असून, एक ते दोन दिवसांत अंतिम अहवाल तयार होण्याची शक्यता असून, त्यानंतर शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

४२८ हेक्टरवरील फळबागांना फटका...अवकाळी पाऊस व गारपीटीने ४२८ हेक्टरवरील फळबागांना फटका बसला आहे. यामध्ये सर्वाधिक रेणापूर तालुक्यात १३३ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे. तर अहमदपूर तालुक्यात १२, देवणी ६३, जळकोट २५, निलंगा ८०, लातूर ६५, उदगीर २०, शिरुर अनंताळ तालुक्यात ३० हेक्टरवरील फळपिकांना अवकाळीने फटका दिला आहे. तसेच जिल्ह्यात १० हजार १३२ हेक्टरवरील जिरायती तर १ हजार २३३ हेक्टरवरील बागायती पिकांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीlaturलातूर