शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने १२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान !

By संदीप शिंदे | Updated: March 20, 2023 16:31 IST

रबीतील पिकांसह फळबाग, भाजीपाल्यांना फटका

लातूर : जिल्ह्यातील अनेक भागात शुक्रवार व शनिवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीटीने झोडपून काढले. यात मोठ्या प्रमाणावर रबी हंगामातील पिके, फळबाग, भाजीपाल्यांचे नुकसान झाले. प्रशासनाकडून नुकसानीची पंचनामे करण्याचे काम वेगाने सुरु आहे. दरम्यान, आतापर्यंत ११ हजार ७९४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, पंचनाम्यानंतर अंतिम नुकसानीची स्थिती समोर येणार आहे.

जिल्ह्यातील अनेक भागात मागील दोन दिवस अवकाळी पाऊस व गारपीटीने रबी हंगामील गहू, ज्वारी, हरभरा, करडईसह आंबा, द्राक्षे, पपई, टरबूज, खरबूज यासह भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याशिवाय, या पावसात वीज पडून एका शेतकऱ्याचा तर ८ पशूधनाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या होत्या. तसेच त्यांनी प्रत्यक्ष रेणापूर व चाकूर तालुक्यात शेतावर जाऊन नुकसानीची पाहणी केली होती. जिल्हा प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम गतीने सुरु आहेत. दरम्यान, आतापर्यंत प्राथमिक अंदाजानुसार ११ हजार ७९४ हेेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाकडे आहे. यात जिरायत शेतीची १० हजार १३२ हेक्टर, बागायतीचे १ हजार २३३ तर ४२८ हेक्टरवरील फळपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज आहे.अवकाळी पावसात चाकूर तालुक्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर चाकूर तालुक्यात ३, देवणी १, निलंगा तालुक्यात ४ पशुधन दगावली आहेत.

निलंगा तालुक्यात सर्वाधिक नुकसान...अवकाळी पाऊस व गारपीने निलंगा तालुक्यात सर्वाधिक ४ हजार ८१५ हेक्टरवरील पिके, फळबागांचे नुकसान झाले आहे. तर औसा तालुक्यात आतापर्यंत प्राथमिक अंदाजानुसार काहीच नुकसान झालेली नसल्याची नोंद आहे. जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात ७० हेक्टर, चाकूर १७५ हेक्टर, देवणी २३३४, जळकोट २५, लातूर ८१५, रेणापूर ३१३७, उदगीर २२३ आणि शिरुर अनंताळ तालुक्यात २०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

संपकाळतही कर्मचारी पंचनाम्यासाठी शेतावर...जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी १४ मार्चपासून बेमुदत संपावर आहेत. मात्र, जिल्ह्यात शुक्रवार व शनिवारी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी पंचनाम्यासाठी जिल्हा प्रशासनला सहकार्य करण्याची भूमिका घेऊन शेतावर पाेहचले आहेत. नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम गतीने सुरु असून, एक ते दोन दिवसांत अंतिम अहवाल तयार होण्याची शक्यता असून, त्यानंतर शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

४२८ हेक्टरवरील फळबागांना फटका...अवकाळी पाऊस व गारपीटीने ४२८ हेक्टरवरील फळबागांना फटका बसला आहे. यामध्ये सर्वाधिक रेणापूर तालुक्यात १३३ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे. तर अहमदपूर तालुक्यात १२, देवणी ६३, जळकोट २५, निलंगा ८०, लातूर ६५, उदगीर २०, शिरुर अनंताळ तालुक्यात ३० हेक्टरवरील फळपिकांना अवकाळीने फटका दिला आहे. तसेच जिल्ह्यात १० हजार १३२ हेक्टरवरील जिरायती तर १ हजार २३३ हेक्टरवरील बागायती पिकांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीlaturलातूर