शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

"लाेकांची दिशाभूल करण्यासाठीच सध्या बेताल वक्तव्यांची मालिका"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 05:39 IST

लातुरात पत्रपरिषद : डाॅ. नीलम गाेऱ्हे यांचा आराेप

राजकुमार जोधळे/ लातूर

वक्तव्यातून मूळ विषयापासून लाेकांचे लक्ष विचलित करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. अशा वक्तव्यांची मालिका सध्या महाराष्ट्र अन् मराठी माणसांविराेधात सुरू आहे. यातूनच मराठी माणूस आणि महाराष्ट्राचे खच्चीकरण करण्यासाठी हे सर्व प्रयत्न सुरू असल्याचा आराेप विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गाेऱ्हे यांनी लातुरात रविवारी पत्रकार परिषदेत केला.

महात्मा ज्याेतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महाराष्ट्राबद्दल करण्यात आलेले वक्तव्य निषेधार्ह, आक्षेपार्ह आहेत. राज्यापालांबराेबर अनेकजण महाराष्ट्राच्या विराेधात जाणीवपूर्वक वक्तव्य करत आहेत का? अशी शंका आता यायला लागली आहे. राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली आहे. रामदेवबाबांनी केलेले व्यक्तव्य तमाम महिलांचा अवमान करणारे आहे. समाजमाध्यमातून जाणीवपूर्वकच समाजात तेढ निर्माण करणारे मेसेज, व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत. विखारी विचार प्रसारित करत जनतेची दिशाभूल केली जात आहे, असा आराेपही डाॅ. गाेऱ्हे यांनी केला. आमची भूमिका प्रबाेधनकारी हिंदुत्वाची आहे.

मराठी माणसांच्या खच्चीकरणाचा प्रयत्न...

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून साेलापूर आणि अक्कलकाेट आम्हाला द्या, अशी भूमिका मांडण्यात आली आहे, तर गुजरातकडून महाराष्ट्रातील प्रकल्प, उद्याेग पळविण्याचे षड्यंत्र रचले जात आहेत. यातून महाराष्ट्र आणि येथील मराठी माणसांना अस्थिर करण्याबराेबरच त्यांचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. गुजरात आणि कर्नाटकाकडून दबाव आणून अस्थिरता निर्माण केली जात आहे, असेही ते म्हणाले.

सर्वपक्षीय नेतृत्वांनी सीमाप्रश्न साेडवावा...

गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र-कर्नाटक राज्याचा सीमाप्रश्न प्रलंबित आहे. यातून मराठी माणसांविराेधात सतत कर्नाटकातील नेतृत्वाकडून बेतालपणे वक्तव्य केली जातात. शिवाय, वारंवार महाराष्ट्राला डिवचले जात आहे. हा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेतृत्वांनी संघटितपणे साेडविण्याची गरज आहे.

मुख्य विषयाला बगल देण्यासाठी आराेप...

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जाणीवपू्र्वक आराेप केले जात आहेत. यातून मूळ विषयावरील लक्ष विचलित करण्याचा विराेधकांचा प्रयत्न आहे. प्रक्षप्रमुखांना ठरवून लक्ष्य केले जात आहे. विराेधकांना राज्याच्या विकासापेक्षा यातून केवळ राजकारण करायचे आहे.

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेShiv Senaशिवसेनाlaturलातूर