शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

पीकविमा कंपन्या मालामाल, ६७१ काेटी भरले, मिळाले ११२ काेटी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:20 IST

लातूर : दरवर्षी विविध संकटाचा सामना करावा लागत असल्याने शेतकरी आपल्या पिकांचा विमा काढत असतात. २०२०-२१ मध्ये खरीप हंगामात ...

लातूर : दरवर्षी विविध संकटाचा सामना करावा लागत असल्याने शेतकरी आपल्या पिकांचा विमा काढत असतात. २०२०-२१ मध्ये खरीप हंगामात पीकविमा हप्त्यापोटी शेतकरी, राज्य आणि केंद्र सरकारने मिळून सुमारे ६७१ काेटी रूपये भरले हाेते. परंतु, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना नुकसान भपाई म्हणून केवळ ११२ काेटी रूपये मिळाले. परिणामी साडेचारशे ते पाचशे काेटींचा विमा कंपनीला फायदा झाला आहे.

वादळी वारे, अतिवृष्टी, पूर, दुष्काळ, राेगराई आदी कारणांमुळे खरीप हंगामातील पिकांचे माेठे नुकसान हाेते. अनेकवेळा काढणीला आलेली पिके वाया जातात. अशावेळी शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णपणे काेलमडून पडते. आर्थिक कणाच माेडल्यामुळे शेतकऱ्यांच्या डाेक्यावरील कर्जाचा बाेजा वाढत जाताे. यातून आत्महत्येसारखे टाेकाचे पाऊल उचलतात. दरम्यान, शेतकऱ्यांचे अर्थकारण माेडून पडू नये, यासाठी पिकांचा विमा उतरविला जाताे. यातून शंभर टक्के नुकसान भरून निघत नसले तरी किमान उत्पादन खर्च हाती पडताे. मागील काही वर्षांत विशेषकरून खरीप पिके काढणीला आली असताना नैसर्गिक संकटे ओढावतात. हा अनुभव लक्षात घेता शेतकरी आता आपी पिके विमा संरक्षित करण्याकडे वळले आहेत. हीच संधी साधत विमा कंपन्यांनीही आपले उखळ पांढरे करून घेऊ लागल्या आहेत. २०२०-२१ च्या खरीप हंगामात जिल्हाभरातील सुमारे १० लाख ४४ हजार २३२ अर्जदार शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा उतरविला हाेता. शेतकऱ्यांनी आपल्या हिस्स्यापाेटी ४९ काेटी ७४ लाख, राज्य शासनाच्या हिस्स्यापाेटी ३१६ कोटी आणि केंद्र सरकारने स्वताच्या हिस्स्यापाेटी ३०८ कोटी असे एकूण ६७१ कोटी रूपये विका कंपनीकडे भरले हाेते. प्रत्यक्ष भरपाई मात्र २ लाख २४ हजार ८४९ अर्जदार शेतकऱ्यांनाच मिळाली आहे. ही रक्कमही ११२ काेटी आहे. त्यामुळे या व्यवसायात शेतकरी ताेट्यात अन् विका कंपनी पाचशे ते साडेपाशे काेटींनी फायद्यात राहिली आहे. म्हणजेच शेतकरी नव्हे, तर विका कंपनी मालामाल झाली आहे. हे असेच सुरू राहिल्यास शेतकऱ्यांची विमा कंपन्यांवरील विश्वास नष्ट हाेण्यास फारसा अवधी लागणार नाही.

खरीप हंगाम २०२०-२१

पीकविमा लागवड क्षेत्र ५,८८,८४९ हेक्टर

एकूण जमा रक्कम ६७१ कोटी

एकूण पीक विमा मंजूर -१११.७२ लाख

प्रत्यक्ष शेतकर्यांनी भरलेले पैसे -४९.७४ लाख

राज्य सरकारने भरलेले पैसे -३१६ कोटी

केंद्र सरकारने भरलेले पैसे - ३०८ कोटी

विमा काढणारे शेतकरी -१०,४४,२३२

लाभार्थी शेतकरी - २२,४१,११४

आतापर्यंत वाटप केलेली रक्कम -१११.७२ कोटी

विमा भरुनही भरपाई नाही...

मागील वर्षी अतिवृष्टीने हाती काही लागलेच नाही. खरीप हंगामाचा पिकविमा काढला होता. मात्र, छदामही मिळालेला नाही. त्यामुळे विमा काढून पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. पिकाचे सरंक्षण म्हणून विमा काढला मात्र, शासनाच्या दूर्लक्षामुळे विमा मिळालेला नाही. कंपन्यानी विमा द्यावा. - अण्णासाहेब महामुनी