शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

पीकविमा कंपन्या मालामाल, ६७१ काेटी भरले, मिळाले ११२ काेटी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:20 IST

लातूर : दरवर्षी विविध संकटाचा सामना करावा लागत असल्याने शेतकरी आपल्या पिकांचा विमा काढत असतात. २०२०-२१ मध्ये खरीप हंगामात ...

लातूर : दरवर्षी विविध संकटाचा सामना करावा लागत असल्याने शेतकरी आपल्या पिकांचा विमा काढत असतात. २०२०-२१ मध्ये खरीप हंगामात पीकविमा हप्त्यापोटी शेतकरी, राज्य आणि केंद्र सरकारने मिळून सुमारे ६७१ काेटी रूपये भरले हाेते. परंतु, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना नुकसान भपाई म्हणून केवळ ११२ काेटी रूपये मिळाले. परिणामी साडेचारशे ते पाचशे काेटींचा विमा कंपनीला फायदा झाला आहे.

वादळी वारे, अतिवृष्टी, पूर, दुष्काळ, राेगराई आदी कारणांमुळे खरीप हंगामातील पिकांचे माेठे नुकसान हाेते. अनेकवेळा काढणीला आलेली पिके वाया जातात. अशावेळी शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णपणे काेलमडून पडते. आर्थिक कणाच माेडल्यामुळे शेतकऱ्यांच्या डाेक्यावरील कर्जाचा बाेजा वाढत जाताे. यातून आत्महत्येसारखे टाेकाचे पाऊल उचलतात. दरम्यान, शेतकऱ्यांचे अर्थकारण माेडून पडू नये, यासाठी पिकांचा विमा उतरविला जाताे. यातून शंभर टक्के नुकसान भरून निघत नसले तरी किमान उत्पादन खर्च हाती पडताे. मागील काही वर्षांत विशेषकरून खरीप पिके काढणीला आली असताना नैसर्गिक संकटे ओढावतात. हा अनुभव लक्षात घेता शेतकरी आता आपी पिके विमा संरक्षित करण्याकडे वळले आहेत. हीच संधी साधत विमा कंपन्यांनीही आपले उखळ पांढरे करून घेऊ लागल्या आहेत. २०२०-२१ च्या खरीप हंगामात जिल्हाभरातील सुमारे १० लाख ४४ हजार २३२ अर्जदार शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा उतरविला हाेता. शेतकऱ्यांनी आपल्या हिस्स्यापाेटी ४९ काेटी ७४ लाख, राज्य शासनाच्या हिस्स्यापाेटी ३१६ कोटी आणि केंद्र सरकारने स्वताच्या हिस्स्यापाेटी ३०८ कोटी असे एकूण ६७१ कोटी रूपये विका कंपनीकडे भरले हाेते. प्रत्यक्ष भरपाई मात्र २ लाख २४ हजार ८४९ अर्जदार शेतकऱ्यांनाच मिळाली आहे. ही रक्कमही ११२ काेटी आहे. त्यामुळे या व्यवसायात शेतकरी ताेट्यात अन् विका कंपनी पाचशे ते साडेपाशे काेटींनी फायद्यात राहिली आहे. म्हणजेच शेतकरी नव्हे, तर विका कंपनी मालामाल झाली आहे. हे असेच सुरू राहिल्यास शेतकऱ्यांची विमा कंपन्यांवरील विश्वास नष्ट हाेण्यास फारसा अवधी लागणार नाही.

खरीप हंगाम २०२०-२१

पीकविमा लागवड क्षेत्र ५,८८,८४९ हेक्टर

एकूण जमा रक्कम ६७१ कोटी

एकूण पीक विमा मंजूर -१११.७२ लाख

प्रत्यक्ष शेतकर्यांनी भरलेले पैसे -४९.७४ लाख

राज्य सरकारने भरलेले पैसे -३१६ कोटी

केंद्र सरकारने भरलेले पैसे - ३०८ कोटी

विमा काढणारे शेतकरी -१०,४४,२३२

लाभार्थी शेतकरी - २२,४१,११४

आतापर्यंत वाटप केलेली रक्कम -१११.७२ कोटी

विमा भरुनही भरपाई नाही...

मागील वर्षी अतिवृष्टीने हाती काही लागलेच नाही. खरीप हंगामाचा पिकविमा काढला होता. मात्र, छदामही मिळालेला नाही. त्यामुळे विमा काढून पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. पिकाचे सरंक्षण म्हणून विमा काढला मात्र, शासनाच्या दूर्लक्षामुळे विमा मिळालेला नाही. कंपन्यानी विमा द्यावा. - अण्णासाहेब महामुनी