शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

साडेबारा हजार हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:25 IST

शिरूर अनंतपाळ : तालुक्यात १५ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने खरिपातील साडेबारा हजार हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. ...

शिरूर अनंतपाळ : तालुक्यात १५ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने खरिपातील साडेबारा हजार हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. कोवळी पिके दुपार धरू लागल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दुंडणीमुळे जमिनीतील ओलावा टिकून राहील म्हणून शेतकऱ्यांनी दुंडणीस सुरुवात केली आहे.

शिरूर अनंतपाळ तालुक्यात २८ हजार ३८४ हेक्टरवर खरिपाची पेरणी अपेक्षित आहे. मृगाच्या प्रारंभी पावसाने जोरदार हजेरी लावली. जूनमध्ये दोनदा पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी मृगातील पेरणी निरोगी असते, म्हणून पेरणीस प्रारंभ केला. बैलबारदाणा नसलेल्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरद्वारे पेरणी केली. २८ हजार ३८४ हेक्टरपैकी २० हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे.

पहिल्या टप्प्यात १२ हजार ६०२ हेक्टरवर तर दुसऱ्या टप्प्यात ७ हजार ४०० हेक्टरवर पेरणी झाली आहे. पहिल्या टप्प्यातील उगवलेली पिके दुपार धरू लागली आहेत. त्यामुळे साडेबारा हजार हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.

दिवसा ढग, रात्री चांदणे...

जूनमध्ये दोनदा पाऊस झाला; परंतु पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली आहे. दिवसभर ढगाळ वातावरण आणि रात्रीच्या वेळी टिपूर चांदणे पडत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. पहिल्या टप्प्यातील पिके कोमेजू लागली आहेत.

आतापर्यंत ९४ मिमी पाऊस...

शिरूर अनंतपाळ तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी ७५० मिमी आहे. पावसाळा सुरू होऊन जवळपास महिना उलटला, तरीही केवळ ९४ मिमी एवढा पाऊस झाला आहे.