शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

कोरोनाचा कोप; अंत्यविधीवर पालिकेचे 54 लाख रूपये खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:24 IST

लातूर : कोरोनाने जिल्ह्यात २ हजार २९७ व्यक्तींचा बळी घेतला आहे. यातील १ हजार ९४६ मयतांवर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ...

लातूर : कोरोनाने जिल्ह्यात २ हजार २९७ व्यक्तींचा बळी घेतला आहे. यातील १ हजार ९४६ मयतांवर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले असून, यासाठी मनपाला ५४ लाख ८२ हजारांचा खर्च आला आहे. पहिल्या लाटेत ५५४ आणि दुसऱ्या लाटेत १ हजार ३९२ मयत व्यक्तींवर मनपाच्या कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले आहेत.

विविध जाती धर्माच्या रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. १ जानेवारी ते ३१ मे या कालवधीत ९८४ पार्थिवाचे दहन करण्यात आले. तर १५६ जणांचा दफनविधी करण्यात आला. तर २८८ मृतदेह नातेवाईकांकडे हस्तांतरीत करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात झालेल्या सर्वच मयतांवर महानगरपालिकेच्या वतीने अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

महानगरपालिकेच्या आठ कर्मचाऱ्यांची टीम यासाठी कार्यरत आहे. १ जानेवारी ते ३१ मे या कालावधीत कोरोनाचा प्रकोप होता. याच कालावधीत सर्वाधिक मृत्यू झाले असून, यातील बहुतांश मयतांवर महानगरपालिकेच्या या कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले. त्यासाठी पहिल्या टप्प्यात १९ लाख ५ हजार तर दुसऱ्या टप्प्यात ३५ लाख ७७ हजार असा खर्च मनपाला झाला असून, दोन्ही लाटेत एकूण ५४ लाख ८२ हजार रुपयांचा खर्च मनपाने केला आहे. मनपाच्या स्वनिधीतून हा खर्च करण्यात आला असून, शासनाकडे खर्च मिळावा म्हणून मागणी करण्यात आली असल्याचे समजते.