शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
3
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
4
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
5
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
6
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
7
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
8
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
9
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
10
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
11
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
12
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
13
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
14
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
15
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
16
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
17
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
18
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
19
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
20
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष

Corona Virus : लातूर जिल्ह्यात १७७ मुलांच्या आई-वडिलांचा कोरोनाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 19:56 IST

Corona Virus: सध्या कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांचा शोध सर्वेक्षणाच्या माध्यमातून गावोगावी घेतला जात आहे.

ठळक मुद्देमदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्नआई किंवा वडिलांचा मृत्यू झाल्यास ११०० रुपयांची मदत...

लातूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांनी आपली लहान मुले पाठीशी ठेवून जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे अशा बालकांच्या भविष्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यांना मदत व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्वेक्षण केले जात असून, आतापर्यंत आई किंवा वडील या दोघांपैकी एक जण गमावलेल्या १७७ मुलांचा शोध लागला आहे. यातील एका मुलाने आई-वडील दोघांनाही गमावले आहे.

जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत २ हजारांहून अधिक जणांचा बळी घेतला आहे. पहिल्या लाटेत ज्येष्ठांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक होते. तर दुसऱ्या लाटेत प्रौढांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढीस लागले आहे. परिणामी, अनेक बालकांनी आई किंवा वडील या दोघांपैकी एकाला गमावले आहे. पालक गमावलेल्या बालकांचे शिक्षण आणि संगोपन व्हावे, यासाठी महिला आणि बालविकास विभागाच्या वतीने सर्वेक्षण केले जात असून, आतापर्यंत १७७ बालके सापडली आहेत. यामध्ये एका मुलाने आई आणि वडील या दोघांनाही गमावलेले आहे. या बालकांना वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत शासनाच्या वतीने ११०० रुपयांची मदत केली जाणार आहे. तसेच शैक्षणिक आणि इतर बाबीसाठी मदत केली जाणार आहे.

आई किंवा वडिलांचा मृत्यू झाल्यास ११०० रुपयांची मदत...कोरोनामुळे आई किंवा वडिलांचा किंबहुना दोघांचाही मृत्यू झाला असल्यास अशा बालकांना महिला व बालविकास विभागाच्या बाल संगोपन योजनेतून मदत करण्यात येणार आहे. या योजनेतून ११०० रुपयांची मदत केली जाणार आहे. वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत बालकांना मदत दिली जाणार असून, त्यासाठी शाळेत नियमित उपस्थिती असणे बंधनकारक राहणार आहे.

या अनाथ मुलांचे सरकार करणार काय...सध्या कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांचा शोध सर्वेक्षणाच्या माध्यमातून गावोगावी घेतला जात आहे. यातून अनाथ आढळून येणाऱ्या मुलाची संपूर्ण कौटुंबिक माहिती एकत्रित केली जाणार आहे. ज्या मुलांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. राहण्यास घर नाही किंवा सांभाळ करणारेही कोणी नाही अशी परिस्थिती असेल तर त्या बालकास बाल समितीच्या माध्यमातून बालगृह, बालकाश्रमात ठेवले जाईल. पाठीशी कोणताही आर्थिक आधार नसल्यास शासनच या बालकांच्या पुनर्वसनाचा भार उचलण्याची शक्यता आहे.

शोध घेतला जात आहेराज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील पालक गमावलेल्या मुलांचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत १७७ बालकांचा शोध घेण्यात आला आहे. त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा मानस आहे. या सर्व बालकांची परिस्थिती, गरज लक्षात घेऊन मदत, पुनर्वसनाबाबत योग्य निर्णय घेतला जाईल.- वर्षा पवार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, लातूर.

कोरोनाने आई-बाबा हिरावलेल्यांची संख्यामुले - १००मुली - ७७