शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

कोरोना परतू लागताच गाव सोडले; कामासाठी पुन्हा मुंबई, पुणे गाठले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदपूर : कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर आपल्या गावाकडे आलेले अनेक कामगार नोकरीच्या ठिकाणी मुंबई-पुण्याकडे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदपूर : कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर आपल्या गावाकडे आलेले अनेक कामगार नोकरीच्या ठिकाणी मुंबई-पुण्याकडे परतत आहेत. पहिल्या लाटेत मुंबई, पुणे, हैदराबाद, निजामाबाद, नाशिक याठिकाणी काम करणारे कामगार गावी परतले होते. त्यामुळे तालुक्यातील गावे-वाडी माणसांनी गजबजून गेल्या होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अनेक कामगार नोकरीच्या ठिकाणी परतले असून, आपल्या कामावर हजर झाले आहेत. तालुक्यातील काळेगाव येथील ४० ग्रामस्थ परदेशातून आले होते. सौदी अरेबियामध्ये विविध प्रकारची कामे ते करत होते. मात्र, येथे आल्यानंतर परत जाण्यासाठी त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. व्हिसा ब्लॉक करण्यात आला असल्याचे या ग्रामस्थांनी सांगितले. ज्यांचे लसीकरणाचे दोन्ही डोस झाले आहेत, अशा दहाजणांना आपल्या कामाच्या ठिकाणी परतावे लागले आहे.

सर्वाधिक स्थलांतर मुंबईकडे...

मुंबई १३००

पुणे ७००

निजामाबाद १५०

हैदराबाद २००

सौदी अरेबिया ६०

सौदी अरेबियाहून काळेगाव येथील ६० कामगार आपल्या गावी आले होते. त्यांचे वेळेत लसीकरण न झाल्यामुळे काही कामगारांच्या हातचे कम गेले आहे. काही कामगार आता गावातच रोजगाराच्या शोधात आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोनामुळे अनेकांच्या हातचे काम गेले आहे. - अब्दुल शकूर जागीरदार, उपसरपंच, काळेगाव

गावात साडेसातशे लोकसंख्या असून, साडेतीनशेहून जास्त नागरिक पुणे, मुंबई याठिकाणी काम करतात. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे हे सर्व नोकरदार आपापल्या नोकरीच्या ठिकाणी गेले आहेत. अनेकांनी लसीकरण पूर्ण करुनच नोकरीचे ठिकाण गाठले आहे. - जगन्नाथ पुणे, सोनखेड

शिक्षणासाठी मुले विदेशात असणाऱ्यांना चिंता...

ज्या पालकांची मुले शिक्षणासाठी विदेशात आहेत, त्यांना चिंता वाटत आहे. आपल्या मुलांसोबत दररोज फोनवर संपर्क साधून तब्येतीची विचारपूस केली जात आहे. दरम्यान, मुले शिक्षणासाठी परदेशात असली तरी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने अनेकांना सुट्टीत मूळगावी येता आले नाही.