शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

२०६ बालकांना बालसंगोपन योजनेचा हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:14 IST

लातूर: कोविड-१९ च्या अभूतपूर्व महामारीमुळे मृत्युमुखी पडलेल्या पालकांच्या शून्य ते १८ वयोगटातील बालकांच्या पाठीशी शासन व प्रशासन खंबीरपणे उभे ...

लातूर: कोविड-१९ च्या अभूतपूर्व महामारीमुळे मृत्युमुखी पडलेल्या पालकांच्या शून्य ते १८ वयोगटातील बालकांच्या पाठीशी शासन व प्रशासन खंबीरपणे उभे राहिले असून जिल्ह्यात गृहभेटी देऊन महामारीत पालक हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यात आला आहे. यात २०६ मुलांचे पालक मयत झाल्याचे निदर्शनास आले आहे. या बालकांना न्याय व कायदेशीर हक्क मिळवून दिले जाणार असून त्यांचे विविध योजनेतून संगोपन केले जात आहे.

२०६ पैकी ४ बालकांचे आई-वडील या महामारीत मयत झाले आहेत. तर २०२ बालकांच्या आई-वडील यापैकी एकाचे निधन झाले आहे. छत्र हरवल्याने बालकांच्या संगोपनाची जबाबदारी शासनाने घेतली आहे. त्यानुसार आतापर्यंत ५७ बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ मंजूर झाला असून, १५१ बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. आई-वडील दोन्ही गमावलेल्या जिल्ह्यातील चार बालकांना महिला व बाल विकास विभागाच्या निर्णयानुसार पाच लाखांची मुदत ठेव करण्याची कार्यवाही टास्क फोर्स मार्फत सुरू झाली आहे.

विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत मदत....

कोविडच्या पार्श्वभूमीवर विशेष अर्थसाह्य कार्यक्रमांतर्गत गृहभेटी करण्यात आल्या असून, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य वेतन योजनेअंतर्गत २८३ अर्ज घेण्यात आले. यापैकी १४९ अर्ज मंजूर करण्यात आले असून, त्यांनाही या योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

शासनाच्या या संस्थांकडून होणार संगोपन...

कोविड साथीच्या प्रादुर्भावामुळे मयत व्यक्तीच्या कुटुंबाला विशेष अर्थसहाय्य आणि पालक हरवलेल्या बालकांचे संगोपन करण्यासाठी शासनाच्या या संस्थांकडून मदत केली जात आहे. संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेतून मयत व्यक्तीच्या कुटुंबाला मदत केली जात आहे. तर पालक हरवलेल्या बालकांना बाल संगोपन योजना, शिशू गृह योजना, बालगृह योजना, शुभमंगल योजना आणि सामाजिक न्याय विभागाच्या योजनेतून संगोपन केले जाणार आहे. दरम्यान जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी या सर्व यंत्रणांची बैठक घेऊन तत्काळ संगोपन संदर्भात तसेच मयत व्यक्तीच्या कुटुंबाला मदत करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.