किसान समन्वय समितीच्या वतीने गांधी चौकात झालेल्या आंदोलनात ॲड. उदय गवारे, ॲड. विजय जाधव, ॲड. एकनाथ कवठेकर, विश्वंभर भोसले, बाळ होळीकर आदींनी सहभाग नोंदविला. केंद्र शासनाने बहुमताच्या जोरावर जुलमी कायदे केले. हे कायदे तत्काळ मागे घेण्यात यावेत, एमसपीच्या अंमलबजावणीसाठी स्वामिनाथन फार्मुला वापरण्यात यावा. तसेच कृषी कायदे मागे घेण्यासाठी विशेष अधिवेशन बोलविण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
लातूरात काँग्रेसची धरणे,शेतकऱ्यांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:59 IST