शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

लवकरच कृत्रिम भावनेसह संगणक प्रेमाने बोलणार - विजय भटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 12:33 IST

आजही विज्ञान आणि तंत्रज्ञानात जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता भारतात आहे़

ठळक मुद्देदेशात बहुपक्षीय राजकारणामुळे लोकशाही मजबूत होईल़राजकीय इच्छाशक्तीवर विज्ञान अन् प्रगती अवलंबून असते़

लातूर :  कृत्रिम बुद्धिमत्ता आपण अनुभवत आहोत़ लवकरच कृत्रिम भावनांसह संगणक तुमच्याशी प्रेमाने बोलेल, असे स्पष्ट करीत परम महासंगणकाचे जनक पद्मभूषण डॉ़ विजय भटकर यांनी भारतीय विज्ञानाची उज्ज्वल परंपरा विशद केली़ 

लातूर अर्बन बँक, माईर्स एमआयटी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बँकेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात विज्ञान व तंत्रज्ञान या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते मंगळवारी बोलत होते़ मंचावर माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, इस्त्रोचे डॉ़ आलोककुमार श्रीवास्तव,  प्रा़ राहुल कराड, निती आयोगाचे उन्नत पंडित, लातूर अर्बन बँकेचे चेअरमन प्रदीप राठी, माजी खा़डॉ़ गोपाळराव पाटील, ललिता भटकर, मिलिंद पांडे, रमेश कराड, दिलीप माने आदींची उपस्थिती होती़ यावेळी इस्त्रोचे वैज्ञानिक डॉ़ आलोककुमार श्रीवास्तव यांचा विज्ञान श्रेष्ठ अ‍ॅवॉर्ड देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी डॉ़ विजय भटकर म्हणाले, जगातील पहिले विद्यापीठ भारतात स्थापन झाले़  आजही विज्ञान आणि तंत्रज्ञानात जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता भारतात आहे़  मी कोणत्याच पक्षाचा नाही़ सर्वच पक्ष चांगले़ देशात बहुपक्षीय राजकारणामुळे लोकशाही मजबूत होईल़ त्याचे उत्तम उदाहरण महाराष्ट्र आहे़ राजकीय इच्छाशक्तीवर विज्ञान अन् प्रगती अवलंबून असते़

टॅग्स :scienceविज्ञानArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सlaturलातूर