शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

जिल्हाधिकाऱ्यांनी जीवन प्राधिकरण, कंत्राटदाराला खडसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:20 IST

अहमदपूर येथील पाणीप्रश्न येत्या महिनाभरात सुरळीत न झाल्यास संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असा समजही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली ...

अहमदपूर येथील पाणीप्रश्न येत्या महिनाभरात सुरळीत न झाल्यास संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असा समजही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. लिंबोटी धरणावरुन १९ किलोमीटर पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, जलशुद्धीकरण केंद्राचे काम अद्यापही २५ टक्के शिल्लक राहिले आहे. त्याचबराेबर साठवण क्षमतेसाठी २१ लक्ष लिटर आणि ९ लाख ५० हजार लिटर क्षमतेच्या जलकुंभाचे बांधकामही सुरु आहे. या कामातील प्रगती समाधानकारत नसल्याचा अहवाल नगर परिषदेने दिला आहे. याबाबत आमदार बाबासाहेब पाटील यांनी थेट अहमदपूर शहराचा पाणी प्रश्न विधानसभेत उपस्थित केल्याने, यंत्रणा खडबडून जागी झाली. याबाबतची माहिती लपवली जात असल्याची तक्रार काही नगरसेवकांनी केली होती. याबाबत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, पाणीपुरवठा अभियंता गणेशपुरी, कंत्राटदार यांची बैठक घेतली. बैठकीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि कंत्राटदारास समाधानकारक उत्तर देता आले नाही. नगरपालिकेला अद्यापपर्यंत योजना हस्तांतरित झाली नाही. परिणामी, लवकर नगर परिषदेला ती हस्तांतरित करण्याबाबत खडसावले आहे. त्यातच ९ लाख ५० हजार लिटर क्षमतेच्या जलकुंभाचे काम, जलशुद्धीकरणाची इनलेट, आउटलेट जोडणे, नवीन जल शुद्ध करण्याचे काम पूर्ण करणे, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी एक महिन्याची डेडलाइन दिली आहे. एक महिन्यात काम पूर्ण न झाल्यास कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात येइल, असे सांगितले आहे. शहरात काही झोन मध्ये १० दिवसाआड पाणी तर काही झोन मध्ये तब्बल ४० ते ५३ दिवसाआड पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे नगरपरिषदेने नवीन पाइपलाईन टाकून नळजोडणी द्यावी, नागरिकांना नियमित व मुबलक पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.

कंत्राटदार जुमानत नसल्याची तक्रार...

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने वारंवार कंत्राटदारांना सूचना दिल्या आहेत. याबाबत त्यांच्या कामाचा वेग समाधानकारक नाही. याबाबी नगर परिषदेच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहेत. संबंधित कंत्राटदार जुमानत नसल्यची तक्रार आता समाेर आली आहे, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता कायंदे एस.व्ही. म्हणाले.

नळजोडणीसाठी प्रस्ताव प्रलंबित...

नवीन पाईपलाईनचे काम ९५ टक्के पूर्ण झाले असून, अहमदपूर येथील नागरिकांना नळ जोडणीसाठीचा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता, औरंगाबाद यांच्याकडे प्रलंबित आहे. तो प्रस्ताव मान्य होताच योजनेतील शिल्लक रकमेतून प्रत्येक नागरिकांना नळजोडणी दिली जणार आहे, असे अहमदपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे म्हणाले.