शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

ढगाळ वातावरणाचा फटका; पिकांची काळजी घेण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:36 IST

गेल्या काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्याचा परिणाम रबीच्या पिकावर दिसून येत आहे. बदलत्या वातावरणाने अळी आणि ...

गेल्या काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्याचा परिणाम रबीच्या पिकावर दिसून येत आहे. बदलत्या वातावरणाने अळी आणि किडीचा प्रादुर्भाव होत आहे. यापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी किटकनाशकांची फवारणी करीत आहेत. रबीचे एकूण प्रस्तावीत २ लाख २७ हजार ९५१ हेक्टर क्षेत्र होते. मात्र तब्बल ३ लाख २० हजार ६२ हेक्टर क्षेत्रावर यंदा रबीचा पेरा झाला आहे. त्यापैकी २ लाख ४८ हजार ५१७ हेक्टरवर हरभरा हे पीक घेण्यात आले आहे. त्यापाठोपाठ ११ हजार ९८९ हेक्टरवर गहू, ज्वारी ३ हजार २९१ हेक्टर, करडईचा पेरा ४ हजार ८७६ हेक्टरवर घेण्यात आला आहे. सर्वाधिक कमी रबी ज्वारीचे क्षेत्र असून केवळ १५९ हेक्टरवर असल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे. जिल्ह्यात कापसाची लागवड अल्प आहे. त्यापाठोपाठ उसाचे पीकही घेतले जाते. खरिपात सोयाबीन आणि रबीत हरभरा पिकाला शेतकरी प्राधान्य देत आहेत.

ढगाळ वातावरणाने होईल किडीचा प्रादुर्भाव

रबीच्या हंगामात पाऊस झाला तर फारसा परिणाम होणार नाही. मात्र ढगाळ वातावरणामुळे कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढेल. त्यासाठी हरभरा, गहू, ज्वारी, करडई या पिकांवरील प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी फवारणीही केली पाहिजे.

रबीच्या हंगामात अशी घ्यावी पिकांची काळजी

सध्या ढगाळ वातावरण असल्याने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे बुरशी नाशकाची फवारणी आवश्यक आहे. कीड रोग नियंत्रणासाठी कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. शिवाय, शेतकऱ्यांनीही पिकांची काळजी घेण्याची गरज आहे.

फवारणी आवश्यक

ढगाळ वातावरणाचा हरभरा, गहू, ज्वारी, करडई पिकावर परिणाम होणार नाही. यासाठी शेतकऱ्यांनी किटकनाशकांची फवारणी करण्याची गरज आहे.

- दत्तात्रय गावसाने,

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी