शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

औशात बारावीच्या विद्यार्थ्याची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 22:43 IST

पावसाने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने पित्याकडे शिक्षणाचा खर्च उचलण्याची क्षमता नसल्याच्या कारणावरून आर्थिक विवंचनेत अडकलेल्या बारावीतील श्रीधर श्रीकृष्ण पाटील या विद्यार्थ्याने औसा येथे बुधवारी दुपारी राहत्या खोलीवर गळफास घेऊन आत्महत्या केली.

औसा (जि. लातूर) : दुष्काळ अन् सततची नापिकी त्याचबरोबर परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने पित्याकडे शिक्षणाचा खर्च उचलण्याची क्षमता नसल्याच्या कारणावरून आर्थिक विवंचनेत अडकलेल्या बारावीतील श्रीधर श्रीकृष्ण पाटील या विद्यार्थ्याने औसा येथे बुधवारी दुपारी राहत्या खोलीवर गळफास घेऊन आत्महत्या केली.पोलिसांनी सांगितले, औसा तालुक्यातील बोरगाव (न.) येथील शेतकरी श्रीकृष्ण पाटील हे ऑटो चालक आहेत. त्यांना बोरगाव शिवारात दीड एकर शेतजमीन असून, मुलगा श्रीधर हा औसा येथील एका महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. दरम्यान, शिक्षणासाठी लागणा-या पैशाची तडजोड पित्याकडून होत नसल्याने श्रीधर पाटील हा आर्थिक विवंचनेत होता. दिवाळीच्या सुटीनिमित्त तो गावाकडेही गेला होता. पित्याकडे शिक्षणाचा खर्च, परीक्षा शुल्क, खासगी शिकवणीचे शुल्क आणि रूम भाड्यापोटी पैशाची मागणी केली होती.दरम्यान, पित्याकडे शैक्षणिक खर्चाचा भार उचलण्याची क्षमता राहिली नव्हती. दुष्काळ, सततची नापिकी अन् परतीच्या पावसामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. त्यावेळी पित्याने शिक्षणासाठी आपल्याकडे पैसे नाहीत, शिक्षणाचा खर्च उचलणे आता शक्य नसल्याचे सांगितले. यावेळी हताश झालेल्या श्रीधर पाटील या विद्यार्थ्याला पुढील शिक्षणाची समस्या भेडसावत होती. वडिलांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती तर शेतीत असलेले पीकही पावसामुळे संपुष्टात आले होते.दिवाळीची सुटी संपल्यानंतर श्रीधर हा औसा येथील हाशमी नगरमध्ये असलेल्या खोलीवर दाखल झाला. गावाकडून आल्यापासून त्याला शिक्षणाची चिंता सतावत होती. पित्यावर भार होऊ नये म्हणून त्याने बुधवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास राहत्या खोलीवर गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. याबाबत औसा पोलीस ठाण्यात दिलेल्या कुटुंबीयाच्या माहितीवरून नोंद करण्यात आली आहे. सायंकाळी उशिरा बोरगाव या गावी मृत श्रीधर पाटील याच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.