शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
१९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
4
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
5
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
6
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
8
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
9
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
10
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
11
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
12
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
13
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
14
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
15
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
17
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
18
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
19
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
20
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

औशात बारावीच्या विद्यार्थ्याची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 22:43 IST

पावसाने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने पित्याकडे शिक्षणाचा खर्च उचलण्याची क्षमता नसल्याच्या कारणावरून आर्थिक विवंचनेत अडकलेल्या बारावीतील श्रीधर श्रीकृष्ण पाटील या विद्यार्थ्याने औसा येथे बुधवारी दुपारी राहत्या खोलीवर गळफास घेऊन आत्महत्या केली.

औसा (जि. लातूर) : दुष्काळ अन् सततची नापिकी त्याचबरोबर परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने पित्याकडे शिक्षणाचा खर्च उचलण्याची क्षमता नसल्याच्या कारणावरून आर्थिक विवंचनेत अडकलेल्या बारावीतील श्रीधर श्रीकृष्ण पाटील या विद्यार्थ्याने औसा येथे बुधवारी दुपारी राहत्या खोलीवर गळफास घेऊन आत्महत्या केली.पोलिसांनी सांगितले, औसा तालुक्यातील बोरगाव (न.) येथील शेतकरी श्रीकृष्ण पाटील हे ऑटो चालक आहेत. त्यांना बोरगाव शिवारात दीड एकर शेतजमीन असून, मुलगा श्रीधर हा औसा येथील एका महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. दरम्यान, शिक्षणासाठी लागणा-या पैशाची तडजोड पित्याकडून होत नसल्याने श्रीधर पाटील हा आर्थिक विवंचनेत होता. दिवाळीच्या सुटीनिमित्त तो गावाकडेही गेला होता. पित्याकडे शिक्षणाचा खर्च, परीक्षा शुल्क, खासगी शिकवणीचे शुल्क आणि रूम भाड्यापोटी पैशाची मागणी केली होती.दरम्यान, पित्याकडे शैक्षणिक खर्चाचा भार उचलण्याची क्षमता राहिली नव्हती. दुष्काळ, सततची नापिकी अन् परतीच्या पावसामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. त्यावेळी पित्याने शिक्षणासाठी आपल्याकडे पैसे नाहीत, शिक्षणाचा खर्च उचलणे आता शक्य नसल्याचे सांगितले. यावेळी हताश झालेल्या श्रीधर पाटील या विद्यार्थ्याला पुढील शिक्षणाची समस्या भेडसावत होती. वडिलांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती तर शेतीत असलेले पीकही पावसामुळे संपुष्टात आले होते.दिवाळीची सुटी संपल्यानंतर श्रीधर हा औसा येथील हाशमी नगरमध्ये असलेल्या खोलीवर दाखल झाला. गावाकडून आल्यापासून त्याला शिक्षणाची चिंता सतावत होती. पित्यावर भार होऊ नये म्हणून त्याने बुधवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास राहत्या खोलीवर गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. याबाबत औसा पोलीस ठाण्यात दिलेल्या कुटुंबीयाच्या माहितीवरून नोंद करण्यात आली आहे. सायंकाळी उशिरा बोरगाव या गावी मृत श्रीधर पाटील याच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.